शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

ऑनलाइन एज्युकेशनने बिघडविले हस्ताक्षर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:34 IST

व्यापारी, छाेटे-माेठे व्यावसायिक, नाेकरदार, शेतकरी, शेतमजूर यांना काेराेनाचा चांगलाच फटका बसला आहे. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग वाढू नये, यासाठी सर्वत्र ...

व्यापारी, छाेटे-माेठे व्यावसायिक, नाेकरदार, शेतकरी, शेतमजूर यांना काेराेनाचा चांगलाच फटका बसला आहे. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग वाढू नये, यासाठी सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली. परिणामी सर्व शाळा, महाविद्यालये लाॅकडाऊन झाले. याचा फटका विद्यार्थ्यांना बसून त्याचा परिणाम शिक्षणावर झाला. नाेव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नववी ते बारावी आणि जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात सहावी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले हाेते. मात्र काेराेनाने पुन्हा डाेके वर काढले. परिणामी शाळा पुन्हा बंद झाल्या. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी ऑनलाइन शिक्षण हाती घेण्यात आले आहे. याला विद्यार्थी व पालकांकडून शहरी भागात बऱ्यापैकी प्रतिसाद मिळू लागला. मात्र ऑनलाइन शिक्षणामुळे बहुतांश विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर बिघडले. लिहिण्याची गतीही कमी झाल्याचे दिसून येत आहे.

बाॅक्स .....

विद्यार्थ्यांनाे हे करा.....

१) माेबाइलमध्ये अधिकाधिक वेळ गुंतून राहिल्याने ताणतणाव निर्माण हाेताे. त्यासाठी ऑनलाइन अभ्यास झाल्यानंतर सुंदर-सुंदर गाेष्टींचे व सामान्य ज्ञान असलेल्या पुस्तकाचे वाचन करावे. त्यानंतर शुद्धलेखनाचा सराव करावा.

२) लक्ष केंद्रित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी ध्यान करावे. त्यामुळे तुम्हाला चांगले वाटेल आणि हस्ताक्षरही चांगले हाेतील.

३) विद्यार्थ्याने वेळेचा अपव्यय न करता मिळालेल्या वेळेचा सदुपयाेग करावा. नियमित लेखन, सराव आवश्यक आहे. ताे केल्यास विद्यार्थ्यांच्या लेखनाची गती वाढेल.

काेट ......

मराठी विषयाचे तज्ज्ञ म्हणतात

माेबाइलमधून दिलेले प्रश्न साेडविण्याकरिता विद्यार्थ्यांना वारंवार थांबावे लागते. त्यामुळे त्यांच्या लेखनाची गती कमी झाली आहे. शाळा सुरू असताना शिक्षकांनी सांगितलेले मुद्दे विद्यार्थी पटापट वहीत लिहून घ्यायचे. मात्र आता त्यांच्या लेखनाची सवय तुटली आहे. त्यामुळे त्यांचा तणाव वाढला आहे. यावर उपाययाेजना म्हणून शुद्धलेखनाचा सराव आवश्यक आहे. - करमचंद भाेयर, शिक्षक

काेट ....

आता अभ्यासात खंड पडला आहे. ऑनलाइन शिक्षण सुरू असले तरी सुंदर हस्ताक्षर काढण्यासाठी नियमित लिहिण्याचा सराव विद्यार्थ्यांनी करायलाच हवा. त्यासाठी बेसिक स्ट्राेकची सराव करावा. वाचन हा विषय गंभीर आहे. लाॅकडाऊनमध्ये लहान मुलांचा वाचन करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पालकांनी मुला-मुलींना दरराेज लिखानाची सवय लावावी.

- विलास म्हस्के, शिक्षक

काेट ...

काेराेनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद झाल्या. विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू झाले. ऑनलाइन शिक्षण झाल्यावर प्राप्त झालेले प्रश्न विद्यार्थी साेडवितात. माेबाइलमध्ये पाहून लिहीत असल्याने त्यांना खूप वेळ लागताे. पूर्वीपेक्षा त्यांचे अक्षरही आता बिघडले असल्याचे दिसून येत आहे.

- ममता बाेरकुटे, पालक

काेट ...

काेराेनामुळे शाळा बंद झाल्या. माेबाइलच्या माध्यमातून शिक्षण सुरू असल्याने स्माॅर्टफाेन उपलब्ध करून दिला. आता माझा मुलगा सतत माेबाइलवर व्यस्त असताे. ऑनलाइन क्लास सुरू झाला आहे, असे सांगताे. माेबाइलमध्ये पाहून ते वहीत लिहिताे. त्याच्या चेहऱ्यावर उत्साह दिसत नाही. ताणतणाव दिसताे. काही मुलांना डाेळ्यांचे विकारही जडत असल्याचे दिसून येत आहे. काेराेना लाॅकडाऊनच्या काळात ही विद्यार्थ्यांना नंबरचा चष्माही लागला आहे. - अनिल वाघरे, पालक