शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

हातपंपाचे पाणी पोहोचले घरांत

By admin | Updated: August 5, 2014 23:26 IST

आंध्रप्रदेशात गडचिरोली मॉडेल म्हणून नावारूपास आलेली दुहेरी पंप योजना गडचिरोली जिल्ह्यात अत्यंत यशस्वीपणे राबविली जात आहे. या योजनेने ग्रामीण भागातील महिलांच्या डोक्यावरील माठाचे

गडचिरोली : आंध्रप्रदेशात गडचिरोली मॉडेल म्हणून नावारूपास आलेली दुहेरी पंप योजना गडचिरोली जिल्ह्यात अत्यंत यशस्वीपणे राबविली जात आहे. या योजनेने ग्रामीण भागातील महिलांच्या डोक्यावरील माठाचे ओझे कमी केले आहे. आजमितीस जिल्ह्यात सुमारे ४०१ योजनांपैकी ३०० योजना सुरू आहेत तर काहींचे बांधकाम सुरू आहेत. ५० ते १०० लोकवस्ती असलेल्या गावाला मोठ्या नळ योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा करणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही. शासनाने पाणी पुरवठा योजना सुरू केली तरी ती चालविणे ग्रामपंचायतीच्या आवाक्याबाहेरचे होते. त्यामुळे १०० लोकवस्तीपर्यंतच्या गावात नळ योजना नसल्याने गाववासीयांना प्रचंड पाण्याच्या दुष्काळाचा सामना करावा लागत होता. पाण्याने भरलेले हंडे वाहण्यासाठीच महिलांची बरीच शक्ती खर्च होत होती. या अडचणीवर मात करण्यासाठी शासनाद्वार हातपंपावरच मोटारपंप बसवून मोटारपंपाच्या सहाय्याने सदर पाणी टाकीत टाकण्यात येते. त्यानंतर टाकीतील पाणी सभोवतालच्या नागरिकांच्या घरापर्यंत नळाद्वारे पोहचविण्यात येते. एकंदरीतच ही योजना मोठ्या नळ योजनेप्रमाणेच कार्य करते. ही योजना कार्यान्वीत करण्यासाठी फक्त २.५ लाख रूपये खर्च येतो. हा सर्व खर्च राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत भागविण्यात येत आहे. गडचिरोली जिल्ह्यात ही योजना २००८-०९ पासून राबविण्यात येत आहे. जवळपास ही योजना ३०० गावांमध्ये यशस्वीपणे सुरू आहे. तर १०० गावांमध्ये या योजनेचे काम प्रगतीपथावर आहेत. ५ वर्षापर्यंत देखभाल व दुरूस्तीचा खर्च कंत्राटदाराकडे सोपविण्यात आला आहे. ज्या गावातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. त्या महिलांच्या घरापर्यंत दुहेरी पंप योजनेद्वारे पाणी पोहचले आहे. याचा आनंदही महिला व नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे. ही योजना यशस्वी होईल की नाही या विषयी ग्रामस्थ शांसक असल्याने सुरूवातीला ही योजना राबविण्यास ग्रामपंचायती तयार नव्हत्या. मात्र याचे फायदे लक्षात आल्यानंतर ही योजना सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतींमध्ये फार मोठ्या प्रमाणात स्पर्धा असल्याचे दिसून येत आहे. यासाठी लहान पंप वापरला जात असल्याने यासाठी विद्युत बिलही कमी येते, सदर बिल भरणे ग्रामपंचायतीला सहज शक्य होणे हेच खरे या योजनेचे यश असल्याचे अधिकारी व गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. (नगर प्रतिनिधी)