शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

निम्म्या गावाला नळयाेजनेचे पाणी मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:35 IST

वैरागड येथे पाणीपुरवठ्यासाठी लगतच्या वैलाेचना नदीवरून जवळपास ४० वर्षांपूर्वी पाणीपुरवठा नळयाेजना कार्यान्वित करण्यात आली. सुरुवातीला गावातील लाेकसंख्या कमी असल्याने ...

वैरागड येथे पाणीपुरवठ्यासाठी लगतच्या वैलाेचना नदीवरून जवळपास ४० वर्षांपूर्वी पाणीपुरवठा नळयाेजना कार्यान्वित करण्यात आली. सुरुवातीला गावातील लाेकसंख्या कमी असल्याने व माेजकेच नळकनेक्शन असल्याने नागरिकांच्या फारशा तक्रारी नव्हत्या. परंतु, गेल्या १० वर्षांत गावाची लाेकसंख्या व कनेक्शन वाढले. तेव्हापासून वैरागड येथील पाण्याचे संकट गडद झाले. वाढती लाेकसंख्या व पाण्याची मागणी या कारणांमुळे गावातील नळयोजना कुचकामी ठरू लागली. अर्ध्याअधिक गावाला पाणी मिळत नसल्याने पाण्यासाठी गावकऱ्यांची पायपीट सुरू आहे. वैरागड येथील नळयोजनेची विहीर वैलोचना नदीकाठावर आहे. ज्या ठिकाणी योजनेची विहीर आहे, त्या परिसरातील काही शेतकरी उन्हाळी धान पिकासाठी खड्डे करून शेतीसाठी पाणी शोषून घेतात. त्यामुळे नळयोजनेच्या विहिरीत जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांपासून पाणीसाठा कमी होतो. विहिरीत पाणीसाठा होत नाही, त्यामुळे तीन हजार लीटर क्षमतेची पाण्याची टाकी पूर्ण भरली जात नाही. परिणामी, गावात पाणीवितरण व्यवस्था बरोबर होत नाही. सध्या गावातील निम्म्या नळधारक कुटुंबांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याने त्यांना बाहेरच्या विहिरींवरून पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने याेग्य उपाययाेजना कराव्या, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

बाॅक्स

नवीन आराखड्याचे भिजत घाेंगडे

वैरागड येथे ३०-४० वर्षांपूर्वी कार्यान्वित जुन्या योजनेचा अपुरा पाणीपुरवठा व गावातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता येथे गोरजाई डोहावर वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. वाढीव पाणीपुरवठा योजनेचा प्रारूप आराखडादेखील मंजूर तयार असताना योजनेचे भिजते घोंगडे आहे. येथील पाणीटंचाईची समस्या सोडवण्यासाठी जुनी योजना कायम ठेवून नवीन वाढीव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करणे, हा एकमेव पर्याय आहे. मात्र, येथील पदाधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे वैरागडची पाणीसमस्या कायम आहे.

===Photopath===

140421\14gad_1_14042021_30.jpg

===Caption===

वैरागड येथील जुन्या पाणीपुरवठा याेजनेची विहीर.