शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आयएएस प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 22:42 IST

शासनामार्फत वेगवेगळे उपक्रम तयार करताना आयएएस अधिकाऱ्यांनी लोकांच्या गरजा समजून घेतल्या पाहिजे. लोकांच्या गरजेनुसार आरोग्य संसद, ....

ठळक मुद्देअभय बंग यांचे आवाहन : लोकांच्या गरजेनुसार उपक्रम राबवा

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : शासनामार्फत वेगवेगळे उपक्रम तयार करताना आयएएस अधिकाऱ्यांनी लोकांच्या गरजा समजून घेतल्या पाहिजे. लोकांच्या गरजेनुसार आरोग्य संसद, दारूमुक्तीची लोकचळवळ व इतर उपक्रम राबविले पाहिजे, असे आवाहन समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी केले.उत्तराखंडच्या मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी येथे डॉ. अभय बंग यांच्या मार्गदर्शनपर भाषणाचे आयोजन २२ मार्च रोजी करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.ग्रामीण आणि आदिवासी समाजाच्या सामुदायिक सहभागातून सर्च(शोधग्राम) संस्थेच्या माध्यमातून गडचिरोली येथे राबविलेल्या उपक्रमांची माहिती सांगतानाच आयएएस अधिकाºयांच्या शिक्षणासाठी याचा कसा उपयोग होईल याविषयी त्यांनी माहिती दिली. लोकांच्या आरोग्याच्या गरजा काय आहेत, त्यांना विश्वासात घेऊन त्या कशा ओळखाव्या यासाठी सर्च(शोधग्राम) द्वारे सुरु करण्यात आलेल्या ‘आरोग्य संसद’ या कार्यक्रमाची माहिती त्यांनी प्रशिक्षणार्थ्यांना दिली. ‘आरोग्यदूत’ या नावाने गावातील व्यक्तीला आरोग्य कार्यकर्ता म्हणून प्रशिक्षित करून गावांमध्ये आरोग्यसेवा आणि बालमृत्यू कमी करण्यासाठी सर्चने सुरु केलेल्या उपक्रमाची माहिती त्यांनी दिली. दारू व तंबाखूचे व्यसन ही ग्रामीण भागात मोठी समस्या आहे. गडचिरोली जिल्ह्यातही ही समस्या मोठ्या प्रमाणावर होती. पण लोकचळवळीतून गडचिरोली जिल्हा दारू व तंबाखूमुक्त व्हावा यासाठी १९८८ पासून प्रयत्न सुरु केले. त्यामुळे जिल्ह्यात १९९३ साली दारूबंदी झाल्याचे डॉ. बंग यांनी यावेळी सांगितले. आता मुक्तिपथ या नावाने जिल्हाव्यापी अभियान सुरु आहे. यांतर्गत ६७ गावे दारू व तंबाखूमुक्त झाली असून ६४१ गावांनी दारूविक्री बंदीचा ठराव घेतल्याचे त्यांनी सांगितले.