शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
3
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
4
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
5
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
6
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
7
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
8
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
9
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
10
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
11
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
12
बापमाणूस! पत्नीच्या मृत्यूनंतर चिमुकल्या लेकीला सोबत घेऊन बाबा करतोय काम, पाणावले डोळे
13
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
14
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
15
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
16
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
17
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
18
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
19
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
20
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय

आयएएस प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 22:42 IST

शासनामार्फत वेगवेगळे उपक्रम तयार करताना आयएएस अधिकाऱ्यांनी लोकांच्या गरजा समजून घेतल्या पाहिजे. लोकांच्या गरजेनुसार आरोग्य संसद, ....

ठळक मुद्देअभय बंग यांचे आवाहन : लोकांच्या गरजेनुसार उपक्रम राबवा

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : शासनामार्फत वेगवेगळे उपक्रम तयार करताना आयएएस अधिकाऱ्यांनी लोकांच्या गरजा समजून घेतल्या पाहिजे. लोकांच्या गरजेनुसार आरोग्य संसद, दारूमुक्तीची लोकचळवळ व इतर उपक्रम राबविले पाहिजे, असे आवाहन समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी केले.उत्तराखंडच्या मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी येथे डॉ. अभय बंग यांच्या मार्गदर्शनपर भाषणाचे आयोजन २२ मार्च रोजी करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.ग्रामीण आणि आदिवासी समाजाच्या सामुदायिक सहभागातून सर्च(शोधग्राम) संस्थेच्या माध्यमातून गडचिरोली येथे राबविलेल्या उपक्रमांची माहिती सांगतानाच आयएएस अधिकाºयांच्या शिक्षणासाठी याचा कसा उपयोग होईल याविषयी त्यांनी माहिती दिली. लोकांच्या आरोग्याच्या गरजा काय आहेत, त्यांना विश्वासात घेऊन त्या कशा ओळखाव्या यासाठी सर्च(शोधग्राम) द्वारे सुरु करण्यात आलेल्या ‘आरोग्य संसद’ या कार्यक्रमाची माहिती त्यांनी प्रशिक्षणार्थ्यांना दिली. ‘आरोग्यदूत’ या नावाने गावातील व्यक्तीला आरोग्य कार्यकर्ता म्हणून प्रशिक्षित करून गावांमध्ये आरोग्यसेवा आणि बालमृत्यू कमी करण्यासाठी सर्चने सुरु केलेल्या उपक्रमाची माहिती त्यांनी दिली. दारू व तंबाखूचे व्यसन ही ग्रामीण भागात मोठी समस्या आहे. गडचिरोली जिल्ह्यातही ही समस्या मोठ्या प्रमाणावर होती. पण लोकचळवळीतून गडचिरोली जिल्हा दारू व तंबाखूमुक्त व्हावा यासाठी १९८८ पासून प्रयत्न सुरु केले. त्यामुळे जिल्ह्यात १९९३ साली दारूबंदी झाल्याचे डॉ. बंग यांनी यावेळी सांगितले. आता मुक्तिपथ या नावाने जिल्हाव्यापी अभियान सुरु आहे. यांतर्गत ६७ गावे दारू व तंबाखूमुक्त झाली असून ६४१ गावांनी दारूविक्री बंदीचा ठराव घेतल्याचे त्यांनी सांगितले.