शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
2
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
3
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
4
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
5
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
6
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
7
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोड्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
8
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
9
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
10
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
11
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
12
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
13
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
15
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
16
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
17
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
18
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
19
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
20
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
Daily Top 2Weekly Top 5

आयएएस प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 22:42 IST

शासनामार्फत वेगवेगळे उपक्रम तयार करताना आयएएस अधिकाऱ्यांनी लोकांच्या गरजा समजून घेतल्या पाहिजे. लोकांच्या गरजेनुसार आरोग्य संसद, ....

ठळक मुद्देअभय बंग यांचे आवाहन : लोकांच्या गरजेनुसार उपक्रम राबवा

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : शासनामार्फत वेगवेगळे उपक्रम तयार करताना आयएएस अधिकाऱ्यांनी लोकांच्या गरजा समजून घेतल्या पाहिजे. लोकांच्या गरजेनुसार आरोग्य संसद, दारूमुक्तीची लोकचळवळ व इतर उपक्रम राबविले पाहिजे, असे आवाहन समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी केले.उत्तराखंडच्या मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी येथे डॉ. अभय बंग यांच्या मार्गदर्शनपर भाषणाचे आयोजन २२ मार्च रोजी करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.ग्रामीण आणि आदिवासी समाजाच्या सामुदायिक सहभागातून सर्च(शोधग्राम) संस्थेच्या माध्यमातून गडचिरोली येथे राबविलेल्या उपक्रमांची माहिती सांगतानाच आयएएस अधिकाºयांच्या शिक्षणासाठी याचा कसा उपयोग होईल याविषयी त्यांनी माहिती दिली. लोकांच्या आरोग्याच्या गरजा काय आहेत, त्यांना विश्वासात घेऊन त्या कशा ओळखाव्या यासाठी सर्च(शोधग्राम) द्वारे सुरु करण्यात आलेल्या ‘आरोग्य संसद’ या कार्यक्रमाची माहिती त्यांनी प्रशिक्षणार्थ्यांना दिली. ‘आरोग्यदूत’ या नावाने गावातील व्यक्तीला आरोग्य कार्यकर्ता म्हणून प्रशिक्षित करून गावांमध्ये आरोग्यसेवा आणि बालमृत्यू कमी करण्यासाठी सर्चने सुरु केलेल्या उपक्रमाची माहिती त्यांनी दिली. दारू व तंबाखूचे व्यसन ही ग्रामीण भागात मोठी समस्या आहे. गडचिरोली जिल्ह्यातही ही समस्या मोठ्या प्रमाणावर होती. पण लोकचळवळीतून गडचिरोली जिल्हा दारू व तंबाखूमुक्त व्हावा यासाठी १९८८ पासून प्रयत्न सुरु केले. त्यामुळे जिल्ह्यात १९९३ साली दारूबंदी झाल्याचे डॉ. बंग यांनी यावेळी सांगितले. आता मुक्तिपथ या नावाने जिल्हाव्यापी अभियान सुरु आहे. यांतर्गत ६७ गावे दारू व तंबाखूमुक्त झाली असून ६४१ गावांनी दारूविक्री बंदीचा ठराव घेतल्याचे त्यांनी सांगितले.