शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
2
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
3
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
4
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
5
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
6
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
7
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
8
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
9
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
10
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
11
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
12
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
13
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
14
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
15
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
16
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
17
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
18
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
19
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
20
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील

हरित सेना बस आलापल्लीत दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2017 01:28 IST

वृक्ष लागवडीबाबत जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हरीत सेना बस तयार केली असून

वृक्ष लागवडीबाबत जनजागृती : पालकमंत्र्यांनी दाखविली हिरवी झेंडी आलापल्ली : वृक्ष लागवडीबाबत जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हरीत सेना बस तयार केली असून सदर बस बुधवारी आलापल्लीत दाखल झाली. सदर बसला पुढच्या प्रवासासाठी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी हिरवी झेंडी दाखविली. पुढील तीन वर्षात ५० कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र शासनाने ठेवले आहे. सदर उपक्रम तीन टप्प्यात राबविला जाणार आहे. १ ते ७ जुलै २०१७ या कालावधीत वन विभाग, ग्राम पंचायत मिळून ४ कोटी वृक्षांची लागवड करणार आहे व इतर विभाग ७५ लाख वृक्ष लावणार आहेत. २०१८ मध्ये १३ कोटी व २०२१ मध्ये ३३ कोटी वृक्ष लागवडीचे ध्येय ठरविण्यात आले आहे. वृक्ष लागवडीचे महत्त्व नागरिकांना कळावे व नागरिकांनी स्वत:हून वृक्ष लागवड करण्यासाठी पुढाकार घ्यावा, यासाठी त्यांच्यामध्ये जनजागृती करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. शासनाने हरीत सेना (ग्रीन आर्मी) ही बस तयार केली आहे. ही बस प्रत्येक जिल्ह्यात जाऊन हरीत सेना प्रतिनिधींची नोंदणी करणार आहे. बसच्या मागच्या बाजूस मोठी एलईडी टीव्ही लावण्यात आली आहे. या एलईडी टीव्हीच्या माध्यमातून पर्यावरण जनजागृतीची माहिती दिली जात आहे. गाडीच्या आतील भाग वातानुकुलीत असून २० एलईडी टीव्ही लावण्यात आल्या आहेत. वन विभाग महाराष्ट्र शासन असे लिहिलेली पांढऱ्या शुभ्र रंगाची बस आलापल्लीत दाखल होताच सदर बस पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. बस आल्यानंतर पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी वन विभागाचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. आलापल्लीवरून सदर बस पुढच्या प्रवासासाठी निघाली. (प्रतिनिधी)