शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

हरित सेना बस आलापल्लीत दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2017 01:28 IST

वृक्ष लागवडीबाबत जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हरीत सेना बस तयार केली असून

वृक्ष लागवडीबाबत जनजागृती : पालकमंत्र्यांनी दाखविली हिरवी झेंडी आलापल्ली : वृक्ष लागवडीबाबत जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हरीत सेना बस तयार केली असून सदर बस बुधवारी आलापल्लीत दाखल झाली. सदर बसला पुढच्या प्रवासासाठी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी हिरवी झेंडी दाखविली. पुढील तीन वर्षात ५० कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र शासनाने ठेवले आहे. सदर उपक्रम तीन टप्प्यात राबविला जाणार आहे. १ ते ७ जुलै २०१७ या कालावधीत वन विभाग, ग्राम पंचायत मिळून ४ कोटी वृक्षांची लागवड करणार आहे व इतर विभाग ७५ लाख वृक्ष लावणार आहेत. २०१८ मध्ये १३ कोटी व २०२१ मध्ये ३३ कोटी वृक्ष लागवडीचे ध्येय ठरविण्यात आले आहे. वृक्ष लागवडीचे महत्त्व नागरिकांना कळावे व नागरिकांनी स्वत:हून वृक्ष लागवड करण्यासाठी पुढाकार घ्यावा, यासाठी त्यांच्यामध्ये जनजागृती करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. शासनाने हरीत सेना (ग्रीन आर्मी) ही बस तयार केली आहे. ही बस प्रत्येक जिल्ह्यात जाऊन हरीत सेना प्रतिनिधींची नोंदणी करणार आहे. बसच्या मागच्या बाजूस मोठी एलईडी टीव्ही लावण्यात आली आहे. या एलईडी टीव्हीच्या माध्यमातून पर्यावरण जनजागृतीची माहिती दिली जात आहे. गाडीच्या आतील भाग वातानुकुलीत असून २० एलईडी टीव्ही लावण्यात आल्या आहेत. वन विभाग महाराष्ट्र शासन असे लिहिलेली पांढऱ्या शुभ्र रंगाची बस आलापल्लीत दाखल होताच सदर बस पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. बस आल्यानंतर पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी वन विभागाचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. आलापल्लीवरून सदर बस पुढच्या प्रवासासाठी निघाली. (प्रतिनिधी)