शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
3
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
4
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
5
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
6
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
7
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
8
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
9
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
10
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
11
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
12
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
13
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
14
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
15
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
16
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
17
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
18
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
19
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
20
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास

अहीर यांच्याकडून मोठी आशा

By admin | Updated: November 10, 2014 22:43 IST

गडचिरोली या मागास जिल्ह्यात केंद्र सरकारशी संबंधीत अनेक प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात रविवारी हंसराज अहीर यांचा समावेश झाला. त्यांच्याकडे रसायने आणि खते

प्रलंबित समस्या मार्गी लावतील : रेल्वे, केंद्राशी संबंधित प्रकल्प रखडलेगडचिरोली : गडचिरोली या मागास जिल्ह्यात केंद्र सरकारशी संबंधीत अनेक प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात रविवारी हंसराज अहीर यांचा समावेश झाला. त्यांच्याकडे रसायने आणि खते या मंत्रालयाचा कारभार आहे. त्यांच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्याला न्याय मिळेल, अशी आशा या जिल्ह्यातील जनतेला आहे. गडचिरोली हा देशातील २५ अतिमागास जिल्ह्यात समाविष्ट असलेला जिल्हा आहे. या जिल्ह्यात रेल्वे मार्गाच्या विस्तारीकरणाचे काम मागील १५-२० वर्षांपासून रखडले आहे. वडसा-गडचिरोली हा रेल्वे मार्ग निर्माण करण्यात यावा, अशी मागणी या भागातील जनतेची आहे. खासदार अहीर हे दोन वेळा गडचिरोली-चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून निवडून आले आहेत. अहीर यांच्या या लोकसभा क्षेत्रात गडचिरोली व अहेरी हे विधानसभा मतदार संघ त्यावेळी समाविष्ट होते. त्यांना या भागातील समस्यांची जाण आहे. वेळोवेळी त्यांनी खासदार म्हणून या जिल्ह्यातील अनेक प्रश्न संसदेत मांडले आहेत.बल्लारपूर-आष्टी-आलापल्ली-सुरजागड हा रेल्वे मार्ग मंजूर करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी आपल्या कार्यकाळात केली होती. या मार्गाच्या सर्वेक्षण कामाला अद्याप सुरूवात झालेली नाही. चेन्ना हा मोठा सिंचन प्रकल्प वनकायद्याच्या अडचणीमुळे रखडलेला आहे. अहीर आता केंद्रीय मंत्री झाल्यामुळे त्यांनी चेन्ना प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी या भागातील जनतेची व शेतकऱ्यांची आहे. गडचिरोली जिल्ह्यात ओबीसींच्या प्रलंबित प्रश्नांना घेऊन अहीर यांनी वेळोवेळी आक्रमक भूमिका घेतली होती. काही महिन्यांपूर्वी गडचिरोली येथे ओबीसी संघटनेच्यावतीने आमरण उपोषण आपल्या प्रलंबित प्रश्नांबाबत करण्यात आले होते. त्यावेळीही खासदार अहीर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या समजून घेतल्या. आता अहीर यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून मागासवर्गीय (ओबीसींचे) प्रश्न मार्गी लावावे, ओबीसींचे कमी झालेले आरक्षण पूर्ववत करून द्यावे, अशी मागणी आहे.गडचिरोली जिल्ह्यात रसायन व खत उद्योग उभे करण्याबाबतही अहीर यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी या भागातील जनतेने केली आहे. या भागात पूर्वी देसाईगंज येथे खत कारखाना होता. तो बंद पडला आहे. त्यामुळे नवा खत कारखाना सुरू करण्यासाठीही अहीर यांनी राज्यात गडचिरोलीचा विचार करावा, अशी मागणी या जिल्ह्यातील नागरिकांनी केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)