शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
3
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
4
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
5
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
6
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
7
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
8
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
9
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
11
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
12
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
13
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
14
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
15
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
16
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
17
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
18
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
19
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
20
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
Daily Top 2Weekly Top 5

अहीर यांच्याकडून मोठी आशा

By admin | Updated: November 10, 2014 22:43 IST

गडचिरोली या मागास जिल्ह्यात केंद्र सरकारशी संबंधीत अनेक प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात रविवारी हंसराज अहीर यांचा समावेश झाला. त्यांच्याकडे रसायने आणि खते

प्रलंबित समस्या मार्गी लावतील : रेल्वे, केंद्राशी संबंधित प्रकल्प रखडलेगडचिरोली : गडचिरोली या मागास जिल्ह्यात केंद्र सरकारशी संबंधीत अनेक प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात रविवारी हंसराज अहीर यांचा समावेश झाला. त्यांच्याकडे रसायने आणि खते या मंत्रालयाचा कारभार आहे. त्यांच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्याला न्याय मिळेल, अशी आशा या जिल्ह्यातील जनतेला आहे. गडचिरोली हा देशातील २५ अतिमागास जिल्ह्यात समाविष्ट असलेला जिल्हा आहे. या जिल्ह्यात रेल्वे मार्गाच्या विस्तारीकरणाचे काम मागील १५-२० वर्षांपासून रखडले आहे. वडसा-गडचिरोली हा रेल्वे मार्ग निर्माण करण्यात यावा, अशी मागणी या भागातील जनतेची आहे. खासदार अहीर हे दोन वेळा गडचिरोली-चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून निवडून आले आहेत. अहीर यांच्या या लोकसभा क्षेत्रात गडचिरोली व अहेरी हे विधानसभा मतदार संघ त्यावेळी समाविष्ट होते. त्यांना या भागातील समस्यांची जाण आहे. वेळोवेळी त्यांनी खासदार म्हणून या जिल्ह्यातील अनेक प्रश्न संसदेत मांडले आहेत.बल्लारपूर-आष्टी-आलापल्ली-सुरजागड हा रेल्वे मार्ग मंजूर करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी आपल्या कार्यकाळात केली होती. या मार्गाच्या सर्वेक्षण कामाला अद्याप सुरूवात झालेली नाही. चेन्ना हा मोठा सिंचन प्रकल्प वनकायद्याच्या अडचणीमुळे रखडलेला आहे. अहीर आता केंद्रीय मंत्री झाल्यामुळे त्यांनी चेन्ना प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी या भागातील जनतेची व शेतकऱ्यांची आहे. गडचिरोली जिल्ह्यात ओबीसींच्या प्रलंबित प्रश्नांना घेऊन अहीर यांनी वेळोवेळी आक्रमक भूमिका घेतली होती. काही महिन्यांपूर्वी गडचिरोली येथे ओबीसी संघटनेच्यावतीने आमरण उपोषण आपल्या प्रलंबित प्रश्नांबाबत करण्यात आले होते. त्यावेळीही खासदार अहीर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या समजून घेतल्या. आता अहीर यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून मागासवर्गीय (ओबीसींचे) प्रश्न मार्गी लावावे, ओबीसींचे कमी झालेले आरक्षण पूर्ववत करून द्यावे, अशी मागणी आहे.गडचिरोली जिल्ह्यात रसायन व खत उद्योग उभे करण्याबाबतही अहीर यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी या भागातील जनतेने केली आहे. या भागात पूर्वी देसाईगंज येथे खत कारखाना होता. तो बंद पडला आहे. त्यामुळे नवा खत कारखाना सुरू करण्यासाठीही अहीर यांनी राज्यात गडचिरोलीचा विचार करावा, अशी मागणी या जिल्ह्यातील नागरिकांनी केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)