शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
4
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
5
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
6
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
7
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
8
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
9
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
10
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
11
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
12
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
13
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
14
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
15
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
16
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
17
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
18
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
19
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
20
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...

बांबूबाबतचा निर्णय ग्रामसभा घेणार

By admin | Updated: April 4, 2015 00:50 IST

ज्या पेसा क्षेत्रामध्ये या हंगामात व वन विभागाच्या कार्यपध्दतीनुसार बांबू कापणी योग्य झाला आहे.

पेसा क्षेत्रातील : बांबू कापणी व विक्रीतून ग्रा.पं.च्या बँक खात्यात जमा होईल रक्कमगडचिरोली : ज्या पेसा क्षेत्रामध्ये या हंगामात व वन विभागाच्या कार्यपध्दतीनुसार बांबू कापणी योग्य झाला आहे. अशा विशेष क्षेत्राची तसेच गावांची व ग्रामपंचायतींची मुख्य वनसंरक्षक तसेच उपवनसंरक्षकांनी निवड करावी व या बाबतची माहिती तत्काळ मुख्य कार्यकारी अधिकारी यांना बीडीओंनी द्यावी, अनुसूचित क्षेत्रातील बांबू क्षेत्र असलेल्या गावातील ग्रामसभा आणि पंचायत कोणत्या पध्दतीने बांबूची कापणी व विक्री याची विल्हेवाट लावू इच्छिते यावर विचार विनिमय करण्यासाठी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्या-त्या ठिकाणी तत्काळ विशेष ग्रामसभेचे आयोजन करावे, असे निर्देश राज्याच्या ग्राम विकास विभागाने प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे बांबू कापणी व विक्रीचा निर्णय ग्रामसभेवर निर्भर राहणार आहे.या संदर्भात राज्याच्या ग्राम विकास विभागाने ३१ मार्च २०१५ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. या निर्णयामुळे गडचिरोली जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील १३०० गावातील ग्रामसभेला बांबू कापणी व विक्रीबाबतचे व्यवस्थापन करण्याची संधी मिळाली आहे. अनुसूचित (पेसा) क्षेत्रातील आदिवासींच्या हिताच्या व कल्याणाच्या दृष्टीने राज्यपालांनी १९ आॅगस्ट २०१४ रोजी घेतलेल्या अधिसूचने अन्वये महाराष्ट्र वन उत्पादन अधिनियम १९९७ मध्ये सूधारणा केली असून त्यानुसार अनुसूचित क्षेत्रात गौण वनोपजाच्या व्याख्येमध्ये सुधारणा केली आहे. यामध्ये बांबूचा समावेश केला आहे. त्यानुसार अनुसूचित क्षेत्रातील गौण वनोपजांची मालकी ग्रामसभा अथवा ग्रामपंचायतीकडे विहित करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वन विभागाकडून बांबूंची कापणी केली जात होती व त्यासाठी वन विभागाने एक प्रमाणित पध्दत निश्चित केलेली आहे. प्रथमताच वन विभागाकडून हे अधिकार काढून पंचायतीकडे देण्यात आलेले आहे. हा मोठा बदल आहे. बांबू कापणी व विक्री संदर्भात जिल्हास्तरीय मार्गदर्शन तक्रार निवारण समिती गठीत करण्यात येणार आहे. या समितीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी तर सहअध्यक्ष म्हणून मुख्य वनसंरक्षक राहणार आहेत. जि.प. सीईओ, उपवनसंरक्षक आदींचा सदस्य म्हणून समावेश राहिल. (स्थानिक प्रतिनिधी)ग्रामसभेपुढील पर्यायबांबूची कापणी व विक्री संदर्भात ग्रामसभेला ३१ मार्च २०१५ चे शासन निर्णयान्वये दोन पर्याय देण्यात आले आहे. या दोन पर्यायामधून एका पर्यायाची निवड ग्रामसभेला करायची आहे.वन विभागाच्या सेवा प्राप्त करून ग्रामसभा पेसा क्षेत्रातील बांबूची कापणी व विक्री करू शकते व यापासून येणारे उत्पन्न वन विभागाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या बँक खात्यावर जमा करणे बंधनकारक आहे.ग्रामसभा स्वत: आवश्यकतेनुसार संबंधित विभागाचे तांत्रिक सहाय्य घेऊन वन विभागाची कार्यपध्दती अनुसरून बांबूची कापणी व विक्री करू शकतात. यासाठी परंपरागत क्षेत्र व त्याची हद्द ग्रामसभा निश्चित करेल, अशी तरतूद आहे.