शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

धान्य साठवणुकीचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 00:09 IST

आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत खरेदी केलेले धान्य सुरक्षित राहावे, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे नियोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देआधारभूत धान खरेदी : ७३ हजार क्विंटल क्षमतेची गोदामे उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत खरेदी केलेले धान्य सुरक्षित राहावे, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे नियोजन करण्यात आले आहे. सुमारे ७३ हजार क्विंटल साठवणुकीची क्षमता असलेले गोदाम उपलब्ध करून दिले जाणार आहे.गडचिरोली जिल्ह्यात महाराष्टÑ स्टेट को-आॅपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडची बिगर आदिवासी क्षेत्रात मुख्य अभिकर्ता म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. गडचिरोली धान खरेदी केंद्राअंतर्गत पाच हजार क्विंटल धान्य साठवणुकीची क्षमता असलेले गोदाम आहे. आरमोरी येथे तीन हजार क्विंटल साठवणूक क्षमतेचे गोदाम आहे. त्याचबरोबर देसाईगंज येथे १० हजार क्विंटल, चामोर्शी येथील डीएमओ गोदामाची क्षमता पाच हजार क्विंटल, येनापूर येथील गोदामाची क्षमता १० हजार क्विंटल, आष्टी येथील गोदामाची क्षमता १० हजार क्विंटल, चामोर्शी तालुक्यातील सुभाषग्राम येथील वन समितीच्या गोदामाची क्षमता तीन हजार क्विंटल, विवेकानंदपूर येथील गोदाम २० हजार क्विंटल, मथुरानगर येथील गोदाम १ हजार ५०० क्विंटल, गणपूर येथील गोदाम १ हजार ५०० क्विंटल, घोट येथील गोदामाची क्षमता २ हजार ५०० क्विंटल एवढी आहे. या सर्व गोदामांची एकूण क्षमता ७३ हजार क्विंटल एवढी आहे.धान्याची खरेदी केल्यानंतर भरडाईसाठी काही कालावधी लागत असल्याने या कालावधीत धान्य सुरक्षित असणे आवश्यक आहे. अन्यथा सदर धान्य पावसाच्या पाण्यात भिजण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत नियोजन करण्यात येत आहे. प्रत्येक खरेदी केंद्राच्या जवळपासचे गोदाम धान्य साठवणुकीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. सद्य:स्थितीत जिल्हाभरात पावसाचा जोर सुरू आहे. अशातच १६ आॅक्टोबरपासून धान खरेदीला सुरुवात होणार आहे. खरेदी केलेले धान्य भिजू नये, शेतकरी व शासनाचे सुद्धा नुकसान होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे नियोजन केले आहे.चार वर्षांपूर्वी झाले होते कोट्यवधींचे नुकसान४चार वर्षांपूर्वी आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेले कोट्यवधी रूपयांचे धान्य पावसाच्या पाण्यात भिजले होते. शेतकºयांकडून खरेदी केलेले धान्य खरेदी केंद्राच्या परिसरातच ठेवण्यात आले होते. काही ठिकाणचे धान्य कुजून उग्र वास येत होता. या घटनेची पुनर्रावृत्ती होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने यावर्षी अगदी सुरुवातीलाच गोदामांचे नियोजन केले असल्याचे दिसून येत आहे. नियोजनानुसार मात्र धान्याची उचल होऊन ते तत्काळ गोदामामध्ये पोहोचणे आवश्यक आहे. कधीकधी वाहनाअभावी वाहतुकीस अडथळा होत असल्याचा अनुभव आहे.