शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: मतमोजणीला सुरूवात; सुरुवातीच्या कलांमध्ये NDA आघाडीवर
2
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावे उघड
3
दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना कडक इशारा; मास्टरमाईंड डॉ. उमरचे पुलवामातील घर IED स्फोटकांनी उडवले!
4
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
5
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
6
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
7
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
8
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
9
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
10
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
11
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
12
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
13
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
14
डाॅक्टरसाहेब, मधुमेह होऊच नये, यासाठी काय करावे? चाळिशीनंतर करा नियमित तपासणी
15
आता झोपडीधारकाची संमती गरजेची नाही, झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी सलग ५० एकर क्षेत्रावर होणार समूह पुनर्विकास
16
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
17
यंदाचा कुंभमेळा पाच पट अधिक मोठा, ५,६५८ कोटींच्या कामांचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमिपूजन
18
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
19
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
20
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
Daily Top 2Weekly Top 5

धान्य साठवणुकीचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 00:09 IST

आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत खरेदी केलेले धान्य सुरक्षित राहावे, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे नियोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देआधारभूत धान खरेदी : ७३ हजार क्विंटल क्षमतेची गोदामे उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत खरेदी केलेले धान्य सुरक्षित राहावे, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे नियोजन करण्यात आले आहे. सुमारे ७३ हजार क्विंटल साठवणुकीची क्षमता असलेले गोदाम उपलब्ध करून दिले जाणार आहे.गडचिरोली जिल्ह्यात महाराष्टÑ स्टेट को-आॅपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडची बिगर आदिवासी क्षेत्रात मुख्य अभिकर्ता म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. गडचिरोली धान खरेदी केंद्राअंतर्गत पाच हजार क्विंटल धान्य साठवणुकीची क्षमता असलेले गोदाम आहे. आरमोरी येथे तीन हजार क्विंटल साठवणूक क्षमतेचे गोदाम आहे. त्याचबरोबर देसाईगंज येथे १० हजार क्विंटल, चामोर्शी येथील डीएमओ गोदामाची क्षमता पाच हजार क्विंटल, येनापूर येथील गोदामाची क्षमता १० हजार क्विंटल, आष्टी येथील गोदामाची क्षमता १० हजार क्विंटल, चामोर्शी तालुक्यातील सुभाषग्राम येथील वन समितीच्या गोदामाची क्षमता तीन हजार क्विंटल, विवेकानंदपूर येथील गोदाम २० हजार क्विंटल, मथुरानगर येथील गोदाम १ हजार ५०० क्विंटल, गणपूर येथील गोदाम १ हजार ५०० क्विंटल, घोट येथील गोदामाची क्षमता २ हजार ५०० क्विंटल एवढी आहे. या सर्व गोदामांची एकूण क्षमता ७३ हजार क्विंटल एवढी आहे.धान्याची खरेदी केल्यानंतर भरडाईसाठी काही कालावधी लागत असल्याने या कालावधीत धान्य सुरक्षित असणे आवश्यक आहे. अन्यथा सदर धान्य पावसाच्या पाण्यात भिजण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत नियोजन करण्यात येत आहे. प्रत्येक खरेदी केंद्राच्या जवळपासचे गोदाम धान्य साठवणुकीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. सद्य:स्थितीत जिल्हाभरात पावसाचा जोर सुरू आहे. अशातच १६ आॅक्टोबरपासून धान खरेदीला सुरुवात होणार आहे. खरेदी केलेले धान्य भिजू नये, शेतकरी व शासनाचे सुद्धा नुकसान होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे नियोजन केले आहे.चार वर्षांपूर्वी झाले होते कोट्यवधींचे नुकसान४चार वर्षांपूर्वी आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेले कोट्यवधी रूपयांचे धान्य पावसाच्या पाण्यात भिजले होते. शेतकºयांकडून खरेदी केलेले धान्य खरेदी केंद्राच्या परिसरातच ठेवण्यात आले होते. काही ठिकाणचे धान्य कुजून उग्र वास येत होता. या घटनेची पुनर्रावृत्ती होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने यावर्षी अगदी सुरुवातीलाच गोदामांचे नियोजन केले असल्याचे दिसून येत आहे. नियोजनानुसार मात्र धान्याची उचल होऊन ते तत्काळ गोदामामध्ये पोहोचणे आवश्यक आहे. कधीकधी वाहनाअभावी वाहतुकीस अडथळा होत असल्याचा अनुभव आहे.