शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

ई लिलावातून ग्रा.पं. ला अधिक उत्पन्न शक्य

By admin | Updated: October 8, 2016 01:59 IST

तेंदू आणि बांबूमधून अधिक उत्पादन मिळवायचे असेल तर ग्रामपंचायतींनी ई लिलाव पद्धतीचा स्वीकार

गडचिरोली : तेंदू आणि बांबूमधून अधिक उत्पादन मिळवायचे असेल तर ग्रामपंचायतींनी ई लिलाव पद्धतीचा स्वीकार केला पाहिजे, याबाबत ग्रामपंचायतस्तरावर चर्चा घडविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी केले. पेसा ग्रामपंचायमधील वनउपज व्यवस्थापन संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कक्षात बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल, अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड, सहाय्यक जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोेफा, मोहन हिराबाई हिरालाल आदी उपस्थित होते. पेसा अंतर्गत मागील हंगामात ग्रामपंचायतींना तेंदू आणि बांबू लिलावातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक उत्पादन मिळाले. मात्र हे लिलाव स्थानिकस्तरावर होत आहे. यात अधिक पारदर्शकता यावी आणि मोठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी ई टेंडरच्या माध्यमातून संपूर्ण देशातील खरेदीदारांना सहभागी करून घेता येणे शक्य आहे. स्पर्धा वाढल्यास ग्रामपंचायतीचे उत्पादन वाढेल. यासाठी जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायतींनी सहमती दर्शविली होती. या खरेदी-विक्री व्यवहारावर ग्रामपंचायतीचे पूर्ण नियंत्रण असावे, यासाठी ग्रामकोषातून पैसे काढताना तीन जणांच्या स्वाक्षरीची सक्ती करण्याची गरज आहे. याबाबत बँकांनाही अवगत करून देण्याची गरज असल्याचे नायक यावेळी म्हणाले.