शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

सरकारी आस्थापनात कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर भार वाढला

By admin | Updated: October 20, 2016 02:32 IST

२६ आॅगस्ट १९८२ ला अस्तित्वात आलेल्या गडचिरोली जिल्हा निर्मितीला ३४ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे.

पदभरती करा : वित्तमंत्र्यांशी राज्य कर्मचारी महासंघाच्या अध्यक्षांची चर्चागडचिरोली : २६ आॅगस्ट १९८२ ला अस्तित्वात आलेल्या गडचिरोली जिल्हा निर्मितीला ३४ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. मागील २५ वर्षांपासून जिल्ह्यात अडीच हजारांवर पदे रिक्त आहेत. जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत महत्त्वाच्या ठिकाणीही पदे रिक्त असल्याने संपूर्ण यंत्रणेचा भार कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर येऊन ठेपला आहे.गडचिरोली जिल्ह्यात राज्य शासनाच्या एकूण ७२ आस्थापना आहेत. यात सर्व वर्गाचे मिळून २३ हजार ६२३ पदे मंजूर आहेत. त्यापैकी २१ हजार २१० पदे भरलेली आहेत. २ हजार ४१३ पदे रिक्त आहेत. म्हणजे १०.२१ टक्के पदे मागील २५ वर्षापासून रिक्त आहेत. परंतु अजुनपर्यंत कोणत्याही सरकारला गडचिरोलीचे रिक्त पदे भरता आलेले नाही. विद्यमान भाजप सरकारही रिक्त पदे भरण्याच्या प्रश्नावर उदासीन असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला. त्यावेळी याबाबत सरकार गांभिर्याने विचार करेल, असे आश्वासन दिले होते. शिवाय गडचिरोलीच्या रिक्त पदांबाबत महाराष्ट्र शासन स्वतंत्र धोरणही निश्चित करेल, असे त्यांनी सांगितले होते. मात्र त्यानंतरही आता ही परिस्थिती बदलेली नाही. त्यामुळे कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडे अनेक पदाचे पदभार देण्यात आले आहे. एका कर्मचाऱ्यावर दोन ते तीन कर्मचाऱ्यांच्या कामाचा भार आहे. राज्य सरकारने गडचिरोली जिल्ह्यातील पदभरती करण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले यांनी राज्याचे वित्त नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व राज्याचे प्रधान सचिव स्वाधीन क्षत्रिय तसेच ग्रामीण विकास मंत्रालयाच्या सचिवांची भेट घेऊन त्यांच्याकडे केली. (जिल्हा प्रतिनिधी)गडचिरोलीच्या नोकर भरतीवर वित्त विभागाची टाचआघाडी सरकारच्या काळात नोकर भरतीवर बंदी घालण्यात आली होती. मात्र नंदूरबार, गडचिरोलीसारख्या जिल्ह्यांना या बंदीतून वगळण्यात आले होते. विद्यमान राज्य सरकारने नोकर भरतीवर बंदीच घातली आहे. अर्थमंत्रालयाने तसा आदेशही काढला आहे. यात गडचिरोलीचाही समावेश आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात रिक्त पदांची संख्या पाहू जाता गडचिरोलीसाठी संपूर्ण राज्याचा निकष लावणे योग्य ठरत नाही. याचा फेरविचार राज्य सरकारने करण्याची गरज आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.मुख्यमंत्री विदर्भाचे आहेत, अर्थमंत्री विदर्भाचे आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील रिक्त पदांचा प्रश्न घेऊन मागील काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र राज्य कर्मचारी महासंघाच्या वतीने आपण वित्तमंत्र्यांची भेट घेतली. त्यांना काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात गडचिरोलीच्या नोकर भरतीवर बंदी नव्हती, ही बाब निदर्शनास आणून दिली व गडचिरोलीत नोकर भरती होणे आवश्यक आहे. रिक्त पदे भरल्या गेल्याशिवाय प्रशासन गतिमान होणार नाही, असे निदर्शनास आणून दिले. याबाबत तोडगा निघावा, अशी विनंतीही मंत्रीमहोदयांना करण्यात आली. - उमेशचंद्र चिलबुले, राज्य अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कर्मचारी महासंघ.