शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

विकासासाठी शासन कटिबद्ध

By admin | Updated: May 26, 2017 02:25 IST

राज्य शासनाने केवळ अडीच वर्षात शेती क्षेत्रात सुमारे ४० हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. शाश्वत शेतीवर समृद्ध

संवाद यात्रा : देवराव होळी यांनी दिली पत्रपरिषदेत माहितीलोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : राज्य शासनाने केवळ अडीच वर्षात शेती क्षेत्रात सुमारे ४० हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. शाश्वत शेतीवर समृद्ध शेतकऱ्याच्या माध्यमातून बळीराजाला कर्जमुक्त करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजना त्यांना समजावून सांगण्यासाठी २५ ते २९ मे पर्यंत शिवार संवाद यात्रेचे आयोजन केले आहे, अशी माहिती आ. डॉ. देवराव होळी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. पंडित दीनदयाल यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त शिवार संवाद यात्रेचे आयोजन केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या व केंद्र सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संवाद यात्रा आयोजित केली आहे. अडीच वर्षांच्या कालावधीत सामान्य नागरिक, गरीब व्यक्ती यासाठी अनेक योजना शासनाने सुरू केल्या आहेत. महाराष्ट्र शासन शेती विकासाला प्राधान्य देत आहे. गडचिरोली जिल्ह्यात ४ हजार ५०० सिंचन विहिरींचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. जमीन समतोल करणे, तलाव व बोडीकरणाचे काम हाती घेणे, जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबविणे, गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कृषी महोत्सव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बांबू क्षेत्राचा विकास, मनरेगामार्फत विविध योजना, फिरते पशु चिकित्सालय, मेंढी पालनाला प्रोत्साहन, शेतीमालाचे योग्य विपनण, फलोत्पादनाचा विकास, उन्नत शेती आदी योजना राबविल्या जात आहेत. शेतकऱ्यांना मोफत बियाणे, खते, कीटकनाशकांचाही पुरवठा केला जात असल्याची माहिती दिली. पत्रकार परिषदेला जि. प. अध्यक्ष योगीता भांडेकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रामेश्वर सेलुकर, भाजयुमो जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, महिला अध्यक्ष माधवी पेशट्टीवार, जि. प. सदस्य प्रा. रमेश बारसागडे, न. पं. चे गट नेता प्रशांत येगलोपवार, साईनाथ बुरांडे, माजी उपसभापती केशव भांडकेर, रवी बोमनवार, अनिल कुनघाडकर, आनंद गण्यारपवार, परितोष मंडल, श्रावण सोनटक्के आदी उपस्थित होते.