शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

शेतीसाठी ‘अच्छे दिन’

By admin | Updated: July 1, 2014 01:29 IST

पूर्व विदर्भाच्या गडचिरोली जिल्ह्यातील मुख्य पीक म्हणजे धान. मात्र गेल्या काही वर्षांत गडचिरोलीच्या पीक पॅटर्नमध्ये कमालीचे बदल झाले असून याचा परिणाम जिल्ह्याचे कृषी उत्पादन वाढण्यावर झाला आहे.

दिन विशेष : जिल्ह्याच्या कृषी उत्पादनात प्रचंड वाढगडचिरोली : पूर्व विदर्भाच्या गडचिरोली जिल्ह्यातील मुख्य पीक म्हणजे धान. मात्र गेल्या काही वर्षांत गडचिरोलीच्या पीक पॅटर्नमध्ये कमालीचे बदल झाले असून याचा परिणाम जिल्ह्याचे कृषी उत्पादन वाढण्यावर झाला आहे. ही कृषी विकासाच्या क्षेत्रातील अग्रगण्य क्रांतीच असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. २०१३-१४ या वर्षात जिल्ह्याच्या कृषी क्षेत्रात पीक पध्दतीत बदल झाले आहे. खरीप हंगामात कापसाचे क्षेत्र ५ हजार २८३ हेक्टरने वाढले आहे. पूर्वी ५ हजार हेक्टर क्षेत्र होते आता ते १० हजार २८३ हेक्टरवर गेले आहे. खरीप व रब्बी हंगामात मका संकरीत वाणाचे क्षेत्र २७९९ हेक्टर होते. लाखोळी क्षेत्रातही लक्षणीय वाढ झाली असून हे क्षेत्र ७ हजार १५६ हेक्टर झाले आहे. भाजीपाला क्षेत्रही २ हजार २८६ हेक्टर झाले आहे. हळद पिकाची लागवड ५६ हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. ही गडचिरोली जिल्ह्याच्या कृषी क्षेत्रातील विकासाची नांदी आहे. दुबार पिकाखालील क्षेत्रही ११ हजार ६ हेक्टरने वाढले आहे. पूर्वी हे क्षेत्र २४ हजार ७५२ हेक्टर होते आता ते ३५ हजार ७५८ झाले आहेत तर उन्हाळी पिकाखालील क्षेत्रही ३ हजार ८७ हेक्टरने वाढले असून २ हजार २१ वरून ५ हजार १०८ वर गेले आहे. भाताखालील क्षेत्रामध्येही १४ हजार हेक्टरची वाढ होऊन संकरीत भाताचे क्षेत्र २ हजार ४०० हेक्टरवर आले आहे. भाताचे उत्पादकताही हेक्टरी ३९० किलोने वाढली आहे. पूर्वी १ हजार १४४ किलो हेक्टर असलेली उत्पादकता आता १ हजार ५३२ किलो हेक्टर झाली आहे.जिल्ह्यातील एकूण भात उत्पादनातही ८० हजार ८०० मॅट्रीक टनाची वाढ झाली आहे. उत्पादकता आता २ लाख ५५ हजार ८०० मेट्रीक टन इतकी झाली आहे. वाढीव उत्पादनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना १०१ कोटी रूपयाचा लाभ झालेला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)