शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
2
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
3
‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?
4
खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
5
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
6
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
7
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
8
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
9
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२१,३४१ चं फिक्स व्याज, गॅरंटीसह मिळणार परतावा
10
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
11
Video : हवेत टक्कर अन् काही सेकंदात जमिनीवर कोसळले हेलिकॉप्टर! अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद
12
चांदी जैसा रंग है तेरा...! 'ही' छैल छबेली चांदी फक्त भाव खात चालली आहे...
13
"युक्रेन शांतता चर्चा ९५% यशस्वी, पण..." झेलेन्स्की-ट्रम्प यांच्यात काय चर्चा झाली? हा महत्वाचा मुद्दा अद्यापही लटकूनच
14
रशियन सैन्यातील १० भारतीयांचा युद्धात मृत्यू; भावाचा शोध घेणाऱ्या तरुणाचा खळबळजनक दावा
15
आजचे राशीभविष्य २९ डिसेंबर २०२५ : या राशीला आज लॉटरी लागणार, शेअर्समध्ये पण...
16
१ महिन्यात ३ चतुर्थींचा अद्भूत योग; २०२६ मध्ये किती अन् कधी विनायक-संकष्टी तिथी? यादीच पाहा
17
एआयच्या निमित्ताने अदानींसोबतच पवार कुटुंब एकाच व्यासपीठावर; शरद पवार यांचे अदानींकडून कौतुक
18
मुंबई महापालिकेत काँग्रेस-वंचित युती; इतर महापालिकांचा निर्णय स्थानिक पातळीवर; वंचित ६२ जागा लढवणार, अकोल्यात मात्र वेटिंग
19
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
20
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
Daily Top 2Weekly Top 5

शेतीसाठी ‘अच्छे दिन’

By admin | Updated: July 1, 2014 01:29 IST

पूर्व विदर्भाच्या गडचिरोली जिल्ह्यातील मुख्य पीक म्हणजे धान. मात्र गेल्या काही वर्षांत गडचिरोलीच्या पीक पॅटर्नमध्ये कमालीचे बदल झाले असून याचा परिणाम जिल्ह्याचे कृषी उत्पादन वाढण्यावर झाला आहे.

दिन विशेष : जिल्ह्याच्या कृषी उत्पादनात प्रचंड वाढगडचिरोली : पूर्व विदर्भाच्या गडचिरोली जिल्ह्यातील मुख्य पीक म्हणजे धान. मात्र गेल्या काही वर्षांत गडचिरोलीच्या पीक पॅटर्नमध्ये कमालीचे बदल झाले असून याचा परिणाम जिल्ह्याचे कृषी उत्पादन वाढण्यावर झाला आहे. ही कृषी विकासाच्या क्षेत्रातील अग्रगण्य क्रांतीच असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. २०१३-१४ या वर्षात जिल्ह्याच्या कृषी क्षेत्रात पीक पध्दतीत बदल झाले आहे. खरीप हंगामात कापसाचे क्षेत्र ५ हजार २८३ हेक्टरने वाढले आहे. पूर्वी ५ हजार हेक्टर क्षेत्र होते आता ते १० हजार २८३ हेक्टरवर गेले आहे. खरीप व रब्बी हंगामात मका संकरीत वाणाचे क्षेत्र २७९९ हेक्टर होते. लाखोळी क्षेत्रातही लक्षणीय वाढ झाली असून हे क्षेत्र ७ हजार १५६ हेक्टर झाले आहे. भाजीपाला क्षेत्रही २ हजार २८६ हेक्टर झाले आहे. हळद पिकाची लागवड ५६ हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. ही गडचिरोली जिल्ह्याच्या कृषी क्षेत्रातील विकासाची नांदी आहे. दुबार पिकाखालील क्षेत्रही ११ हजार ६ हेक्टरने वाढले आहे. पूर्वी हे क्षेत्र २४ हजार ७५२ हेक्टर होते आता ते ३५ हजार ७५८ झाले आहेत तर उन्हाळी पिकाखालील क्षेत्रही ३ हजार ८७ हेक्टरने वाढले असून २ हजार २१ वरून ५ हजार १०८ वर गेले आहे. भाताखालील क्षेत्रामध्येही १४ हजार हेक्टरची वाढ होऊन संकरीत भाताचे क्षेत्र २ हजार ४०० हेक्टरवर आले आहे. भाताचे उत्पादकताही हेक्टरी ३९० किलोने वाढली आहे. पूर्वी १ हजार १४४ किलो हेक्टर असलेली उत्पादकता आता १ हजार ५३२ किलो हेक्टर झाली आहे.जिल्ह्यातील एकूण भात उत्पादनातही ८० हजार ८०० मॅट्रीक टनाची वाढ झाली आहे. उत्पादकता आता २ लाख ५५ हजार ८०० मेट्रीक टन इतकी झाली आहे. वाढीव उत्पादनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना १०१ कोटी रूपयाचा लाभ झालेला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)