शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी शेळ्या़, मेंढ्यांचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:38 IST

शेतकरी दरवर्षी खरीप - रब्बी पीक निघाल्यावर शेतजमिनीची दुरुस्ती करीत असतात त्यामुळे जमिनीच्या वरच्या स्तरात पहिल्या वर्षी सुपीकता कमी ...

शेतकरी दरवर्षी खरीप - रब्बी पीक निघाल्यावर शेतजमिनीची दुरुस्ती करीत असतात त्यामुळे जमिनीच्या वरच्या स्तरात पहिल्या वर्षी सुपीकता कमी असते. ती सुपीकता टिकून राहावी यासाठी जमिनीला सेंद्रिय खतच चांगले असते असा शेतकऱ्यांचा समज आहे. शेतकरी पुढील हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतात शेणखत टाकत असतात मात्र बैलबंडीअभावी बरेच शेतकरी शेणखत टाकण्याकडे दुर्लक्ष करीत असतात. शेणखत टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टर हा साधनांचा वापर करीत असतात सध्या प्रति ट्रॅक्टर ५०० रुपये असे खत टाकण्याचे भाडे आहे त्यामुळे काही मोजकेच शेतकरी शेणखत जमिनीत टाकत असतात . त्याऐवजी रासायनिक खत वापरून पीक घेत असतात. रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे जमिनीची पोत बिघडत चालली असून केवळ एकच पीक शेतजमीन चांगले येऊ शकते. दुबार पीक घ्यायचे झाले तर पुन्हा खताचा वापर करावा लागतो; मात्र सेंद्रिय खत जमिनीची सुपीकता व पीक निरोगी ठेवण्यासाठी अधिक महत्त्वाचे काम करीत असते. त्यामुळे शेतकरी शेतात शेळ्या - मेंढ्यांचा कळप बसवत असतात. दरम्यान, आता परजिल्ह्यातील मेंढपाळ शेतातील पीक निघाल्यावर ग्रामीण भागात डेरेदाखल हाेत असतात व ते जवळपास चार महिने राहत असतात. शेतात कोणतेही पीक राहत नसल्याने या कालावधीत चराईसाठी जागा उपलब्ध होत असते . त्यामुळे मेंढपाळ दिवसभर चराई झाल्यावर सायंकाळी ज्या शेतमालक शेतात कळप बसवितात त्या ठिकाणी शेळ्या-मेंढ्याचा कळप बसवत असतात यासाठी शेतकरी मेंढपाळांना शेळ्या व मेंढ्याच्या संख्येवर त्यांना मोबदला पैसे व धानाच्या स्वरूपात देत असतात.यासाठी शेतकरी कळप बसवण्यासाठी मेंढपाळांना मनधरणी करीत असतात. याबाबत मेंढपाळ यांना विचारणा केली असता उन्हाळ्यात हंगामी स्वरूपात रोजगार यामुळे प्राप्त होत असतो यातूनच चार पैसे कमाई होते व शेळ्या व मेंढ्यांची देखभाल होत असते. एवढ्या संख्येत असलेल्या शेळ्या मेंढ्यांना घरी गोठा बांधून ठेवणे शक्य नसते त्यामुळे चार महिने उत्पन्न मिळते व मेंढ्यांची काळजी घेणेही सोपे जाते असे त्यांनी सांगितले. सध्या रासायनिक खतांचे भाव गगनाला भिडले असल्याने शेतकऱ्यांचा दरवर्षी पीक लागवड खर्च वाढत चालला आहे. त्या तुलनेत उत्पादन होत नसल्याने शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी दरवर्षी कर्ज घ्यावे लागत असते. त्यामुळे शेतकरी खताची बचत व्हावी व पीक भरघाेस यावे यासाठी शेतात शेळ्या व मेंढ्यांचे कळप बसवत आहेत.

बाॅक्स

खताचे ट्रॅक्टर भाडे ७०० रुपये

शेतकरी पुढील हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतात शेणखत टाकत असतात मात्र बैलबंडीअभावी बरेच शेतकरी शेणखत टाकण्याकडे दुर्लक्ष करीत असतात. शेणखत टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टर या साधनांचा वापर करीत असतात. सध्या प्रति ट्रॅक्टर ७०० रुपये असे खत टाकण्याचे भाडे आहे. खत टाकणीसाठी बरेच पैसे लागत असल्याने काही मोजकेच शेतकरी शेणखत जमिनीत टाकत असतात. रासायनिक खताचा वापर अधिक केला जाताे.