शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी शेळ्या़, मेंढ्यांचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:38 IST

शेतकरी दरवर्षी खरीप - रब्बी पीक निघाल्यावर शेतजमिनीची दुरुस्ती करीत असतात त्यामुळे जमिनीच्या वरच्या स्तरात पहिल्या वर्षी सुपीकता कमी ...

शेतकरी दरवर्षी खरीप - रब्बी पीक निघाल्यावर शेतजमिनीची दुरुस्ती करीत असतात त्यामुळे जमिनीच्या वरच्या स्तरात पहिल्या वर्षी सुपीकता कमी असते. ती सुपीकता टिकून राहावी यासाठी जमिनीला सेंद्रिय खतच चांगले असते असा शेतकऱ्यांचा समज आहे. शेतकरी पुढील हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतात शेणखत टाकत असतात मात्र बैलबंडीअभावी बरेच शेतकरी शेणखत टाकण्याकडे दुर्लक्ष करीत असतात. शेणखत टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टर हा साधनांचा वापर करीत असतात सध्या प्रति ट्रॅक्टर ५०० रुपये असे खत टाकण्याचे भाडे आहे त्यामुळे काही मोजकेच शेतकरी शेणखत जमिनीत टाकत असतात . त्याऐवजी रासायनिक खत वापरून पीक घेत असतात. रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे जमिनीची पोत बिघडत चालली असून केवळ एकच पीक शेतजमीन चांगले येऊ शकते. दुबार पीक घ्यायचे झाले तर पुन्हा खताचा वापर करावा लागतो; मात्र सेंद्रिय खत जमिनीची सुपीकता व पीक निरोगी ठेवण्यासाठी अधिक महत्त्वाचे काम करीत असते. त्यामुळे शेतकरी शेतात शेळ्या - मेंढ्यांचा कळप बसवत असतात. दरम्यान, आता परजिल्ह्यातील मेंढपाळ शेतातील पीक निघाल्यावर ग्रामीण भागात डेरेदाखल हाेत असतात व ते जवळपास चार महिने राहत असतात. शेतात कोणतेही पीक राहत नसल्याने या कालावधीत चराईसाठी जागा उपलब्ध होत असते . त्यामुळे मेंढपाळ दिवसभर चराई झाल्यावर सायंकाळी ज्या शेतमालक शेतात कळप बसवितात त्या ठिकाणी शेळ्या-मेंढ्याचा कळप बसवत असतात यासाठी शेतकरी मेंढपाळांना शेळ्या व मेंढ्याच्या संख्येवर त्यांना मोबदला पैसे व धानाच्या स्वरूपात देत असतात.यासाठी शेतकरी कळप बसवण्यासाठी मेंढपाळांना मनधरणी करीत असतात. याबाबत मेंढपाळ यांना विचारणा केली असता उन्हाळ्यात हंगामी स्वरूपात रोजगार यामुळे प्राप्त होत असतो यातूनच चार पैसे कमाई होते व शेळ्या व मेंढ्यांची देखभाल होत असते. एवढ्या संख्येत असलेल्या शेळ्या मेंढ्यांना घरी गोठा बांधून ठेवणे शक्य नसते त्यामुळे चार महिने उत्पन्न मिळते व मेंढ्यांची काळजी घेणेही सोपे जाते असे त्यांनी सांगितले. सध्या रासायनिक खतांचे भाव गगनाला भिडले असल्याने शेतकऱ्यांचा दरवर्षी पीक लागवड खर्च वाढत चालला आहे. त्या तुलनेत उत्पादन होत नसल्याने शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी दरवर्षी कर्ज घ्यावे लागत असते. त्यामुळे शेतकरी खताची बचत व्हावी व पीक भरघाेस यावे यासाठी शेतात शेळ्या व मेंढ्यांचे कळप बसवत आहेत.

बाॅक्स

खताचे ट्रॅक्टर भाडे ७०० रुपये

शेतकरी पुढील हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतात शेणखत टाकत असतात मात्र बैलबंडीअभावी बरेच शेतकरी शेणखत टाकण्याकडे दुर्लक्ष करीत असतात. शेणखत टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टर या साधनांचा वापर करीत असतात. सध्या प्रति ट्रॅक्टर ७०० रुपये असे खत टाकण्याचे भाडे आहे. खत टाकणीसाठी बरेच पैसे लागत असल्याने काही मोजकेच शेतकरी शेणखत जमिनीत टाकत असतात. रासायनिक खताचा वापर अधिक केला जाताे.