शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
3
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
4
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
5
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
6
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
7
एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
8
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
9
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
10
घरची कामं करा अन् फिट राहा; केर काढा, लादी पुसा, कपडे धुवा... पाहा किती कॅलरी होतात बर्न?
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
12
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
13
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
14
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
15
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
16
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
17
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
18
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...
19
चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली
20
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...

जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी शेळ्या़, मेंढ्यांचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:38 IST

शेतकरी दरवर्षी खरीप - रब्बी पीक निघाल्यावर शेतजमिनीची दुरुस्ती करीत असतात त्यामुळे जमिनीच्या वरच्या स्तरात पहिल्या वर्षी सुपीकता कमी ...

शेतकरी दरवर्षी खरीप - रब्बी पीक निघाल्यावर शेतजमिनीची दुरुस्ती करीत असतात त्यामुळे जमिनीच्या वरच्या स्तरात पहिल्या वर्षी सुपीकता कमी असते. ती सुपीकता टिकून राहावी यासाठी जमिनीला सेंद्रिय खतच चांगले असते असा शेतकऱ्यांचा समज आहे. शेतकरी पुढील हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतात शेणखत टाकत असतात मात्र बैलबंडीअभावी बरेच शेतकरी शेणखत टाकण्याकडे दुर्लक्ष करीत असतात. शेणखत टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टर हा साधनांचा वापर करीत असतात सध्या प्रति ट्रॅक्टर ५०० रुपये असे खत टाकण्याचे भाडे आहे त्यामुळे काही मोजकेच शेतकरी शेणखत जमिनीत टाकत असतात . त्याऐवजी रासायनिक खत वापरून पीक घेत असतात. रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे जमिनीची पोत बिघडत चालली असून केवळ एकच पीक शेतजमीन चांगले येऊ शकते. दुबार पीक घ्यायचे झाले तर पुन्हा खताचा वापर करावा लागतो; मात्र सेंद्रिय खत जमिनीची सुपीकता व पीक निरोगी ठेवण्यासाठी अधिक महत्त्वाचे काम करीत असते. त्यामुळे शेतकरी शेतात शेळ्या - मेंढ्यांचा कळप बसवत असतात. दरम्यान, आता परजिल्ह्यातील मेंढपाळ शेतातील पीक निघाल्यावर ग्रामीण भागात डेरेदाखल हाेत असतात व ते जवळपास चार महिने राहत असतात. शेतात कोणतेही पीक राहत नसल्याने या कालावधीत चराईसाठी जागा उपलब्ध होत असते . त्यामुळे मेंढपाळ दिवसभर चराई झाल्यावर सायंकाळी ज्या शेतमालक शेतात कळप बसवितात त्या ठिकाणी शेळ्या-मेंढ्याचा कळप बसवत असतात यासाठी शेतकरी मेंढपाळांना शेळ्या व मेंढ्याच्या संख्येवर त्यांना मोबदला पैसे व धानाच्या स्वरूपात देत असतात.यासाठी शेतकरी कळप बसवण्यासाठी मेंढपाळांना मनधरणी करीत असतात. याबाबत मेंढपाळ यांना विचारणा केली असता उन्हाळ्यात हंगामी स्वरूपात रोजगार यामुळे प्राप्त होत असतो यातूनच चार पैसे कमाई होते व शेळ्या व मेंढ्यांची देखभाल होत असते. एवढ्या संख्येत असलेल्या शेळ्या मेंढ्यांना घरी गोठा बांधून ठेवणे शक्य नसते त्यामुळे चार महिने उत्पन्न मिळते व मेंढ्यांची काळजी घेणेही सोपे जाते असे त्यांनी सांगितले. सध्या रासायनिक खतांचे भाव गगनाला भिडले असल्याने शेतकऱ्यांचा दरवर्षी पीक लागवड खर्च वाढत चालला आहे. त्या तुलनेत उत्पादन होत नसल्याने शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी दरवर्षी कर्ज घ्यावे लागत असते. त्यामुळे शेतकरी खताची बचत व्हावी व पीक भरघाेस यावे यासाठी शेतात शेळ्या व मेंढ्यांचे कळप बसवत आहेत.

बाॅक्स

खताचे ट्रॅक्टर भाडे ७०० रुपये

शेतकरी पुढील हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतात शेणखत टाकत असतात मात्र बैलबंडीअभावी बरेच शेतकरी शेणखत टाकण्याकडे दुर्लक्ष करीत असतात. शेणखत टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टर या साधनांचा वापर करीत असतात. सध्या प्रति ट्रॅक्टर ७०० रुपये असे खत टाकण्याचे भाडे आहे. खत टाकणीसाठी बरेच पैसे लागत असल्याने काही मोजकेच शेतकरी शेणखत जमिनीत टाकत असतात. रासायनिक खताचा वापर अधिक केला जाताे.