शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

एटापल्लीच्या वनउद्यानाला दोन कोटी रुपये द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:41 IST

वन विभाग भामरागडअंतर्गत वनपरिक्षेत्र एटापल्ली यांच्याकडून एटापल्ली शहरापासून अर्ध्या किमी अंतरावर एटापल्ली-कसनसूर या मुख्य मार्गावर दहा वर्षांपूर्वी तत्कालीन ...

वन विभाग भामरागडअंतर्गत वनपरिक्षेत्र एटापल्ली यांच्याकडून एटापल्ली शहरापासून अर्ध्या किमी अंतरावर एटापल्ली-कसनसूर या मुख्य मार्गावर दहा वर्षांपूर्वी तत्कालीन अधिकाऱ्यांनी वनउद्यान उभारले, या उद्यानात विविध जातींची शेकडो झाडे लावण्यात आली. ते अधिकारी असेपर्यंत दोन-तीन वर्षे वनउद्यानांची देखरेख व्यवस्थित झाली. या उद्यानामुळे एटापल्ली शहरातील लहान मुले, वृद्ध नागरिक कुटुंबासह फिरायला जात असत. या उद्यानामुळे या जागेवर अतिक्रमण झाले नाही.

त्यानंतर राठोड नामक अधिकारी एटापल्लीत आले. त्यांनी या उद्यानाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले व काम न करता उद्यानांचा निधी हडप केला, असा आराेप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला. उद्यानांची आजची स्थिती अत्यंत वाईट आहे. उद्यानाचे तारेचे कुंपण पूर्णपणे टुटले आहे. दिवसभर मोकाट जनावरे उद्यानात फिरल्याने लावण्यात आलेले शेकडो जिवंत झाडे करपून गेली. वनविभागाचे लक्ष नसल्याने या उद्यानात अतिक्रमण वाढत आहे. या उद्यानाला पुनर्जीवित व सुसज्ज करणे, सोंदर्यीकरण करणे, वॉल कंपाउंड, खेळण्याचे साहित्य इतर कामे करण्याकरिता २ कोटी रुपये मंजूर झाल्यास आर्कषक असे वनउद्यान तयार होईल, यात शेकडो झाडे नव्याने लावता येतील, तसेच अतिक्रमण थांबेल व एटापल्लीसह तालुक्यातील नागरिकांना या उद्यानाचा लाभ घेता येणार आहे, असे निवेदनात म्हटले आहे. याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख (शहर) मनीष दुर्गे, शहरप्रमुख राहुल आदे, राघव सुलवावार, प्रसाद दासरवार, संजय जानकी, महेंद्र सुलवावार, निहाल कुंभारे आदी हजर होते.