शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
5
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
6
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
7
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
8
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
9
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
10
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
11
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
12
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
13
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
14
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
15
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
16
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
17
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
19
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
20
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर

जिल्ह्याला नवी ओळख देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:48 IST

शांतता असेल तर समृद्धी यायला वेळ लागत नाही. पर्यटनाच्या दृष्टीने जिल्हयात खूप मोठा वाव आहे.

ठळक मुद्दे गृह राज्यमंत्र्यांची ग्वाही : वन उत्पादनांवर आधारित उद्योगातून रोजगार वाढीस प्राधान्य देणार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शांतता असेल तर समृद्धी यायला वेळ लागत नाही. पर्यटनाच्या दृष्टीने जिल्हयात खूप मोठा वाव आहे. यासाठी नक्षलवाद्यांचा बिमोड करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि गडचिरोली जिल्ह्याची नवी ओळख निर्माण करण्यासाठी शासन कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन गृह (ग्रामीण) तसेच वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी गुरूवारी येथे केले.गुरूवारी गडचिरोली दौºयावर आले असताना ना.केसरकर यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त जिल्ह्यांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर पोलीस महासंचालक कनकरत्नम, पोलीस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे, जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक तसेच पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, गोंदियाचे पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल, सहाय्यक जिल्हाधिकारी बिपिन इटनकर, कार्यकारी अभियंता कुंभार, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर व इतर प्रमुख पोलीस अधिकारी उपस्थित होते.यावेळी पत्रकारांशी बोलताना केसरकर म्हणाले, तालुक्याच्या ठिकाणी राहणाºया पोलिस कर्मचाºयांच्या निवासस्थानाचा प्रश्न सोडविणे, तसेच या जिल्हयात धानशेती प्रामुख्याने होते. याच सोबत वनउत्पादनावर आधारित उद्योगातून या भागासाठी उपजिविकेचे साधन वाढविणे याला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.सदर बैठकीनंतर शिवसेना नेते असलेल्या ना.केसरकर यांची विश्रामगृहात स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांनी व पदाधिकाºयांनी भेट घेऊन संवाद साधला. यावेळी जिल्ह्यात शिवसेनेला बळकटी द्या, अशा सूचना त्यांनी केल्या.अत्याधुनिक सुविधांनी युक्त आंतरराज्य समन्वय सभागृहाचे उद्घाटनगडचिरोलीतील पोलीस विश्रामगृहाच्या परिसरात बांधण्यात आलेल्या अांतरराज्य समन्वय सभागृहाचे उद्घाटन ना.केसरकर यांच्या हस्ते झाले. या सभागृहाच्या माध्यमातून लगतच्या तेलंगना आणि छत्तीसगड राज्यातील चार जिल्हे तसेच नजीकच्या चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यातील अधिकाºयांना संपर्कव समन्वय राखणे शक्य होणार आहे. उत्तम व्यवस्था असणाºया या वातानुकूलित सभागृहातून लगतच्या सर्व नक्षलग्रस्त जिल्हयातील अधिकाºयांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.या कार्यक्रमास सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक टी.शेखर, अपर पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, सीआरपीएफच्या १९२ बटालियनचे कमांडंन्ट के. एस. खुराणा हेसुद्धा उपस्थित होते. या समन्वय सभागृहाचे आरेखण व अंतर्गत सजावटीचे काम श्वेता बालाजी यांनी केली आहे. या सभागृहात अधिकाºयांना वाय-फाय सुविधा देखील उपलब्ध राहणार आहे.शहिदांच्या परिवारिक अडचणी ऐकायावेळी ना.केसरकर यांनी शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांच्या समस्यांची माहिती जाणून घेतली. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर किमान दोन महिन्यात बैठक घेण्यात यावी, अशा सूचना त्यांनी पोलीस अधिकाºयांना दिल्या. शहीद कुटुंबीयांप्रती शासन संवेदनशील असून त्यांच्या समस्यांची सोडवणूक करण्यास सर्वोच्च प्राथमिकता देऊ असे ते म्हणाले.अधिकारी-कर्मचाºयांचा गौरवगेल्या वर्षभरात ज्यांनी पोलीस कारवाईत यश मिळविले अशा पोलीस अधिकारी व कर्मचाºयांचा रोख पुरस्कार व प्रमाणपत्र देऊन गृहराज्यमंत्री केसरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सर्व उपविभागीय पोलिस अधिकाºयांशी व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे त्यांनी चर्चा केली.