शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन कायदेशीर सल्ला मिळणार

By admin | Updated: October 8, 2016 01:57 IST

देशात डिजिटल इंडियाच्या माध्यमातून माहिती क्षेत्रात क्रांती आणण्याचा प्रयत्न केंद्र शासन करीत आहे.

गडचिरोली : देशात डिजिटल इंडियाच्या माध्यमातून माहिती क्षेत्रात क्रांती आणण्याचा प्रयत्न केंद्र शासन करीत आहे. त्याअनुषंगाने देशातील प्रत्येक गावांना आॅनलाईन सेवेशी जोडले जात आहे. गडचिरोली जिल्ह्यालाही या सेवेने जोडले जात असून तब्बल १२७ केंद्र जिल्ह्यात कार्यान्वित करण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून देश व राज्यभरातील नामांकित वकिलांकडून नागरिकांना आॅनलाईन कायदशीर सल्ला मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे सूत्र हाती घेतल्यानंतर त्यांनी डिजिटल इंडियाचा नारा दिला. त्या दिशेने त्यांनी प्रयत्नही सुरू केले. प्रत्येक गाव, ग्रामपंचायत व नागरिकांना आॅनलाईन सेवेशी जोडण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने अनेक प्रयत्न केले जात आहेत. याशिवाय विविध तांत्रिक संस्थांकडून आॅनलाईन सेवेचे केंद्र गावागावात स्थापन केले जात आहे. यानंतरही केंद्र शासनाने विकासामध्ये आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. ग्रामीण भारताच्या माहिती प्रसार तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठा बदल करण्यात आला असून लोकांना कायदेशिर सल्ला आॅनलाईनद्वारे मिळावा, या उद्देशाने देशभरात सीएससी केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. प्राप्त माहितीनुसार सद्य:स्थितीत देशभरात दोन लाख सीएससी केंद्र (कॉमन सर्व्हिस सेंटर) कार्यान्वित करण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना आॅनलाईन कायदशीर माहिती सहज उपलब्ध होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातही या सेवेचे १२७ केंद्र कार्यान्वित करण्यात आले असून या केंद्राच्या माध्यमातून दुर्गम व अतिदुर्गम भागातील नागरिकांना देश व राज्यभरातील अनुभवी वकिलांकडून कायदेशीर सल्ला मिळणार आहे. केंद्र सरकारच्या या उपक्रमाची अंमलबजावणी राज्य सरकारकडून केली जात आहे. महाराष्ट्रात सदर उपक्रम ‘आपले सरकार केंद्र’ या नावाने कार्यान्वित करण्यात येत आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षलग्रस्त आदिवासीबहुल, दुर्गम व अतिदुर्गम भागात सदर सीएससी केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. सदर सेवेअंतर्गत ज्या लोकांना अनुभवी वकील मंडळीकडून कायदेशीर सल्ला घ्यावयाचा आहे, त्यांना आपल्या समस्येबाबत नोंदणी करून त्यासोबत आवश्यक दस्तावेज सादर करावे लागणार आहे. त्यानंतर संबंधित वकील या समस्या वा प्रकरणाचा सखोल अभ्यास करून संबंधित नागरिकांना आवश्यक तो कायदेशीर सल्ला आॅनलाईनरित्या देणार आहेत. लोकांसाठी फायदेशीर व्यवस्था ४डिजीटल इंडियाच्या ग्रामीण भागात माहिती तंत्रज्ञानात मोठा बदल करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानानुसार गडचिरोली जिल्ह्यात सीएससी केंद्र कार्यान्वित करण्यात आले असल्याने गावातील नागरिकांना त्यांच्या समस्येवर अनुभवी वकिलांकडून गावातच कायदेशीर सल्ला मिळणार आहे. देसाईगंज तालुक्याच्या गुरनोली ग्रामपंचायतमध्ये फोनद्वारा सदर सेवा जोडण्यात येणार असून इंटरनेटच्या माध्यमातून ही सेवा उपलब्ध होणार आहे, अशी माहिती गुरनोली ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजन खुणे यांनी दिली आहे. वकिलांच्या महागड्या शुल्कातून होणार सुटका ४न्यायालयीन प्रकरण नको रे बाबा... अशी समज ग्रामीण भागातील अनेक नागरिकांमध्ये आहे. याचे कारण न्यायालयीन प्रकरणाचा वर्षानुवर्षे निकाल लागत नसल्याने ग्रामीण भागातील अनेक सर्वसामान्य नागरिक न्यायालयाच्या चकरा मारून त्रस्त होतात. याशिवाय आपली समस्या न्यायालयीन प्रकरणाच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी वकिलांना महागडे शुल्क द्यावे लागते. कित्येक वर्ष वकिलांकडे पैशाचा भरणा करावा लागतो. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील अनेक सर्वसामान्य नागरिक न्यायालयीन प्रकरणामुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत. मात्र केंद्र व राज्य सरकारने आता सीएससी केंद्र स्थापन केल्याने नागरिकांना आपल्या समस्येवर कायदेशीर सल्ला अनुभवी वकिलांकडून मोफत मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांची वकिलांच्या महागड्या शुल्कांपासून पूर्णत: मुक्तता होणार आहे.