शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन कायदेशीर सल्ला मिळणार

By admin | Updated: October 8, 2016 01:57 IST

देशात डिजिटल इंडियाच्या माध्यमातून माहिती क्षेत्रात क्रांती आणण्याचा प्रयत्न केंद्र शासन करीत आहे.

गडचिरोली : देशात डिजिटल इंडियाच्या माध्यमातून माहिती क्षेत्रात क्रांती आणण्याचा प्रयत्न केंद्र शासन करीत आहे. त्याअनुषंगाने देशातील प्रत्येक गावांना आॅनलाईन सेवेशी जोडले जात आहे. गडचिरोली जिल्ह्यालाही या सेवेने जोडले जात असून तब्बल १२७ केंद्र जिल्ह्यात कार्यान्वित करण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून देश व राज्यभरातील नामांकित वकिलांकडून नागरिकांना आॅनलाईन कायदशीर सल्ला मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे सूत्र हाती घेतल्यानंतर त्यांनी डिजिटल इंडियाचा नारा दिला. त्या दिशेने त्यांनी प्रयत्नही सुरू केले. प्रत्येक गाव, ग्रामपंचायत व नागरिकांना आॅनलाईन सेवेशी जोडण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने अनेक प्रयत्न केले जात आहेत. याशिवाय विविध तांत्रिक संस्थांकडून आॅनलाईन सेवेचे केंद्र गावागावात स्थापन केले जात आहे. यानंतरही केंद्र शासनाने विकासामध्ये आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. ग्रामीण भारताच्या माहिती प्रसार तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठा बदल करण्यात आला असून लोकांना कायदेशिर सल्ला आॅनलाईनद्वारे मिळावा, या उद्देशाने देशभरात सीएससी केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. प्राप्त माहितीनुसार सद्य:स्थितीत देशभरात दोन लाख सीएससी केंद्र (कॉमन सर्व्हिस सेंटर) कार्यान्वित करण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना आॅनलाईन कायदशीर माहिती सहज उपलब्ध होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातही या सेवेचे १२७ केंद्र कार्यान्वित करण्यात आले असून या केंद्राच्या माध्यमातून दुर्गम व अतिदुर्गम भागातील नागरिकांना देश व राज्यभरातील अनुभवी वकिलांकडून कायदेशीर सल्ला मिळणार आहे. केंद्र सरकारच्या या उपक्रमाची अंमलबजावणी राज्य सरकारकडून केली जात आहे. महाराष्ट्रात सदर उपक्रम ‘आपले सरकार केंद्र’ या नावाने कार्यान्वित करण्यात येत आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षलग्रस्त आदिवासीबहुल, दुर्गम व अतिदुर्गम भागात सदर सीएससी केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. सदर सेवेअंतर्गत ज्या लोकांना अनुभवी वकील मंडळीकडून कायदेशीर सल्ला घ्यावयाचा आहे, त्यांना आपल्या समस्येबाबत नोंदणी करून त्यासोबत आवश्यक दस्तावेज सादर करावे लागणार आहे. त्यानंतर संबंधित वकील या समस्या वा प्रकरणाचा सखोल अभ्यास करून संबंधित नागरिकांना आवश्यक तो कायदेशीर सल्ला आॅनलाईनरित्या देणार आहेत. लोकांसाठी फायदेशीर व्यवस्था ४डिजीटल इंडियाच्या ग्रामीण भागात माहिती तंत्रज्ञानात मोठा बदल करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानानुसार गडचिरोली जिल्ह्यात सीएससी केंद्र कार्यान्वित करण्यात आले असल्याने गावातील नागरिकांना त्यांच्या समस्येवर अनुभवी वकिलांकडून गावातच कायदेशीर सल्ला मिळणार आहे. देसाईगंज तालुक्याच्या गुरनोली ग्रामपंचायतमध्ये फोनद्वारा सदर सेवा जोडण्यात येणार असून इंटरनेटच्या माध्यमातून ही सेवा उपलब्ध होणार आहे, अशी माहिती गुरनोली ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजन खुणे यांनी दिली आहे. वकिलांच्या महागड्या शुल्कातून होणार सुटका ४न्यायालयीन प्रकरण नको रे बाबा... अशी समज ग्रामीण भागातील अनेक नागरिकांमध्ये आहे. याचे कारण न्यायालयीन प्रकरणाचा वर्षानुवर्षे निकाल लागत नसल्याने ग्रामीण भागातील अनेक सर्वसामान्य नागरिक न्यायालयाच्या चकरा मारून त्रस्त होतात. याशिवाय आपली समस्या न्यायालयीन प्रकरणाच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी वकिलांना महागडे शुल्क द्यावे लागते. कित्येक वर्ष वकिलांकडे पैशाचा भरणा करावा लागतो. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील अनेक सर्वसामान्य नागरिक न्यायालयीन प्रकरणामुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत. मात्र केंद्र व राज्य सरकारने आता सीएससी केंद्र स्थापन केल्याने नागरिकांना आपल्या समस्येवर कायदेशीर सल्ला अनुभवी वकिलांकडून मोफत मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांची वकिलांच्या महागड्या शुल्कांपासून पूर्णत: मुक्तता होणार आहे.