शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

जंगल न तोडता रोजगार मिळवा अगरबत्ती व वीटभट्टी प्रकल्प सुरू

By admin | Updated: May 17, 2014 23:41 IST

जिल्ह्यात जंगल असेपर्यंत आपली उपजीविका कायम आहे. जंगल धोक्यात आल्यास सर्वच धोक्यात येईल. त्यामुळे जंगल न तोडता रोजगार उपलब्ध करून घ्यावा,

प्रधान वन सचिवांचे आवाहन

चामोर्शी : जिल्ह्यात जंगल असेपर्यंत आपली उपजीविका कायम आहे. जंगल धोक्यात आल्यास सर्वच धोक्यात येईल. त्यामुळे जंगल न तोडता रोजगार उपलब्ध करून घ्यावा, यासाठी वनविभाग सहाय्य करेल, असे प्रतिपादन राज्याचे प्रधान वनसचिव प्रविण परदेशी यांनी केले. चामोर्शी येथे अगरबत्ती व वीटभट्टी प्रकल्पाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. संयुक्त वनव्यवस्थापन समिती व वनपरिक्षेत्र चामोर्शी यांच्या संयुक्त विद्यमाने अगरबत्ती व वीटभट्टी प्रकल्प शनिवारी सुरू करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोली वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक टी. एस. के. रेड्डी होते. प्रमुख अतिथी म्हणून चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी एम. देवेंद्रसिंह, उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, शुक्ला, उपविभागी वनाधिकारी बावनकर, पाटील, तिरपुडे, जि. प. सदस्य नामदेव सोनटक्के उपस्थित होते. दरवर्षी शासनाला सव्वाशे कोटीचे उत्पन्न जिल्ह्यातील वनातून मिळते. दरवर्षी ५० कोटी मजुरी व ५० कोटी बोनस तेंदू हंगामातून दिला जातो. जिल्ह्यात ७ हजार ५०० गॅसचे वितरण करण्यात आले. पुन्हा ८५ हजार सुधारित चुली वाटप करण्यात येणार आहेत, अशी माहिती टी. एस. के. रेड्डी यांनी दिली. यावेळी २२ गावातील समितीच्या अध्यक्षांसोबत प्रधान सचिवांनी संवाद साधला. दरम्यान वनकर्मचारी व समित्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच बांबूहस्तकला कारागिरांना कीट देण्यात आले. संचालन वनपरिक्षेत्राधिकारी शंकर गाजलवार तर आभार सिद्धार्थ मेश्राम यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)