शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
3
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
4
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
5
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
6
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
7
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
8
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
9
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
10
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
11
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
12
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
13
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
14
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
15
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
16
फायद्याची गोष्ट! स्टील-अ‍ॅल्युमिनियम की लोखंड? स्वयंपाकासाठी कोणती भांडी सर्वात बेस्ट?
17
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
18
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
19
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
20
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश

नेटवर्कअभावी ऑनलाईन शिक्षणाचा खेळखंडोबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:25 IST

मागीलवर्षी काही अटी-शर्ती ठेवून प्रत्येक शाळा व्यवस्थापन समितीला शाळा सुरू करण्याचा अधिकार दिला होता. पण या शैक्षणिक वर्षात अजूनपर्यंत ...

मागीलवर्षी काही अटी-शर्ती ठेवून प्रत्येक शाळा व्यवस्थापन समितीला शाळा सुरू करण्याचा अधिकार दिला होता. पण या शैक्षणिक वर्षात अजूनपर्यंत प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून शाळा सुरू करण्याच्या हालचाली शासनाकडून दिसत नाहीत. त्यामुळे इयत्ता १ ते ४ वर्गामधील विद्यार्थ्यांचे पालक अधिकच चिंतातुर झाल्याचे चित्र दिसत आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर शासनाने अनलॉकची घोषणा केली होती. पण लोकांची वाढती गर्दी पाहता, कोरोनाचा प्रभाव वाढेल या भीतीने शासनाने जुनेच नियम लागू केले आहेत. परिणामी माध्यमिक व प्राथमिक शाळा सुरू होण्यावर सध्या तरी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शासन निर्देशानुसार काही शाळांनी ऑनलाईन शिक्षणाचे वर्ग सुरू केले आहेत. शाळेकडून दिलेल्या वेळेवर हे वर्ग सुरू होत असले तरी, घरी असलेल्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. चामोर्शी तालुक्यात शेतकरी, शेतमजूर, कारागीर आणि इतर मजूर वर्गाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. काहींचे तर हातावर पोट आहे. त्यात सध्या पालकांच्या हाताला काम नसल्याने संसाराची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यातच स्मार्ट फोन आणि त्यात इंटरनेट घेण्याचा खर्च कसा करावा, हा प्रश्न आहे. या ऑनलाईन शिक्षणात अनेक अडचणी मुलांना येत आहेत. त्या फक्त प्रत्यक्ष शाळेतच सोडवल्या जाऊ शकतात. त्यामुळे शिक्षकही आता शाळा सुरू होण्याची आतुरतेने वाट बघत आहेत. जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचे लक्ष आता शासनाच्या निर्देशाकडे लागले आहे.

बाॅक्स

१ ते ४ वर्गाच्या शाळा प्रत्यक्ष सुरू करण्याची मागणी

मागीलवर्षी २३ नाेव्हेंबरपासून टप्प्या-टप्प्याने शाळा सुरू केलेल्या होत्या. पण या टप्प्यामध्ये इयत्ता १ ते ४ च्या वर्गांचा समावेश नव्हता. त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून जिल्ह्यातील शेकडो इयत्ता १ ते ४ च्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत शाळेचे तोंड सुध्दा बघितलेले नाही. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा पाया प्रत्यक्ष वर्गामध्येच मजबूत होत असतो. पण या वर्गातील विद्यार्थी शााळेमध्ये कधी येतील, याचे उत्तर मात्र कुणाकडेच नाही. त्यामुळे लवकरात लवकर इयत्ता १ ते ४ वर्गांच्या शाळा प्रत्यक्ष सुरू करण्याची मागणी पालकवर्गातून होत आहे.

(बॉक्स)

या आहेत अडचणी...

एक तर ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांकडे स्मार्ट मोबाईल नाही. त्यामुळे परिसरातील काही विद्यार्थी एकत्र येऊन हे ऑनलाईन शिक्षण घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. वर्ग सुरू झाल्यानंतर मध्येच नेटवर्क गेल्यास विद्यार्थी बुचकळ्यात पडतात, तर कधी सुरुवातीपासूनच नेटवर्क राहत नसल्याने सुरू होणारा ऑनलाईन वर्ग दिसण्यास अडचण निर्माण होत आहे. वर्ग सुरू झाला तर शिक्षकांचा आवाज मध्येच गायब होतो. दोन-चार विद्यार्थी एकत्र दिसल्याने त्यांच्या गोंधळात या ऑनलाईन शिक्षणाचा खेळखंडोबा होत आहे.