शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

गडचिरोलीची मिरची राज्याची सीमा ओलांडून थेट चीनमध्ये

By दिलीप दहेलकर | Updated: March 30, 2023 11:35 IST

तडका महाग : किलोमागे ५० रुपयांनी दरवाढ, उत्पादकांना होतोय फायदा

गडचिराेली : लाल मिरचीचे भाव यंदा तडकल्याने सामान्यांच्या जिभेला चांगलाच चटका लागला आहे. सर्वच वाणाच्या लाल मिरचीच्या भावात किलाेमागे ५० ते ६० रुपयांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र व आंध्र प्रदेशातील मिरचीची निर्यात विदेशात हाेत असल्याने भाव वाढले आहेत.

उन्हाळा लागताच मार्च व एप्रिल महिन्यात गृहिणी वर्षभर पुरेल एवढ्या मिरचीची एकदाच खरेदी करून मसाला बनवितात. मात्र यंदा अवकाळी पावसाचे संकट मिरची उत्पादकावर आले. ऐन मिरचीचे पीक हाती येण्याच्या ताेंडावर अवकाळी पावसाने तडाखा दिला. मिरचीच्या उत्पादनात घट झाल्याने यंदा मिरचीच्या भावात वाढ झाली आहे. गडचिराेली येथे रविवारी भरलेल्या आठवडी बाजारात मिरची व्यापाऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून वस्तुस्थिती जाणून घेतली असता, सर्वच प्रकारच्या मिरचीचे दर यंदा वाढल्याचे त्यांनी सांगितले.

मिरचीचे उत्पादन महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, पंजाब, ओरिसा तसेच इतर प्रांतात हाेते. मात्र ऐन मिरची ताेडणीच्या काळात अवकाळी पाऊस बरसल्याने याचा परिणाम उत्पादनावर हाेऊन उत्पादन घटले. परिणामी बाजारपेठेत यंदा मिरचीचे भाव तडकले आहेत.

ही आहेत भाववाढीची कारणे

  • अवकाळी पावसाचा मिरचीला जाेरदार तडाखा बसला. उत्पादन घटले.
  • आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक भागात मिरचीचा तुटवडा.
  • शेतकरी व व्यापारी माेठ्या प्रमाणात मिरचीची निर्यात परदेशात करीत आहेत.
  • मसाला कारखानदार व एक्सपाेर्टची मागणी वाढली.

 

चीनमध्ये चालली मिरची

चीन देशामध्ये तेथील सरकार सर्वसामान्यांना नाममात्र दरात सवलतीमध्ये सरकारी स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून मिरची उपलब्ध करून देत आहेत. यासाठी चीनमध्ये तीन ते चार प्रदेशांतून मिरची निर्यात हाेत आहे. विशेष करून महाराष्ट्र व आंध्र प्रदेशातील मिरचीची निर्यात चीन देशात हाेत आहे. याचाच परिणाम भाववाढीवर झाला आहे.

असे आहेत मिरचीचे दर

  • मालेवाडा (गावठी मिरची) - २७० रुपये किलाे
  • इंजेवारी (गावठी मिरची) - २७०
  • झिंगी मिरची - २३०
  • नंदिता मिरची - २२०
  • तेजा मिरची - २४०
  • शिकाऊ मिरची - २३०

अवकाळी पावसामुळे मिरची उत्पादनावर परिणाम झाला आहे. शिवाय महाराष्ट्र व आंध्र प्रदेशातील मिरचीची चीनमध्ये निर्यात हाेत आहे. त्यामुळे यंदा मिरचीच्या भावात किलाेमागे ५० ते ६० रुपयांची वाढ झाली आहे.

- मयूर कावळे, मिरची व्यापारी

मिरची ही जीवनावश्यक वस्तू आहे. यंदा मिरचीचे भाव वाढल्याने त्याचा परिणाम संपूर्ण बाजारावर हाेत आहे. उत्पन्न गतवर्षी इतके आहे. मात्र महागाई वाढल्याने जमाखर्चाचा मेळ बसत नसल्याचे दिसत आहे.

- वर्षा बारसागडे, गृहिणी

आम्ही दरवर्षी उन्हाळ्यात एप्रिल महिन्यात वर्षभराची मिरची एकदाच खरेदी करताे. यंदा मिरची खरेदी करावयाची आहे. बाजारात भाजीपाला खरेदी करताना सहज चाैकशी केली असता, गतवर्षीच्या तुलनेत यंदा मिरचीचे भाव वाढल्याचे समजले. भाव कमी हाेतात काय, यासाठी काही दिवस प्रतीक्षा करण्याचा विचार आहे. त्यानंतरच मिरचीची खरेदी करू.

- राेशनी मेश्राम, गृहिणी

टॅग्स :MarketबाजारGadchiroliगडचिरोलीagricultureशेती