शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

गडचिरोलीची मिरची राज्याची सीमा ओलांडून थेट चीनमध्ये

By दिलीप दहेलकर | Updated: March 30, 2023 11:35 IST

तडका महाग : किलोमागे ५० रुपयांनी दरवाढ, उत्पादकांना होतोय फायदा

गडचिराेली : लाल मिरचीचे भाव यंदा तडकल्याने सामान्यांच्या जिभेला चांगलाच चटका लागला आहे. सर्वच वाणाच्या लाल मिरचीच्या भावात किलाेमागे ५० ते ६० रुपयांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र व आंध्र प्रदेशातील मिरचीची निर्यात विदेशात हाेत असल्याने भाव वाढले आहेत.

उन्हाळा लागताच मार्च व एप्रिल महिन्यात गृहिणी वर्षभर पुरेल एवढ्या मिरचीची एकदाच खरेदी करून मसाला बनवितात. मात्र यंदा अवकाळी पावसाचे संकट मिरची उत्पादकावर आले. ऐन मिरचीचे पीक हाती येण्याच्या ताेंडावर अवकाळी पावसाने तडाखा दिला. मिरचीच्या उत्पादनात घट झाल्याने यंदा मिरचीच्या भावात वाढ झाली आहे. गडचिराेली येथे रविवारी भरलेल्या आठवडी बाजारात मिरची व्यापाऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून वस्तुस्थिती जाणून घेतली असता, सर्वच प्रकारच्या मिरचीचे दर यंदा वाढल्याचे त्यांनी सांगितले.

मिरचीचे उत्पादन महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, पंजाब, ओरिसा तसेच इतर प्रांतात हाेते. मात्र ऐन मिरची ताेडणीच्या काळात अवकाळी पाऊस बरसल्याने याचा परिणाम उत्पादनावर हाेऊन उत्पादन घटले. परिणामी बाजारपेठेत यंदा मिरचीचे भाव तडकले आहेत.

ही आहेत भाववाढीची कारणे

  • अवकाळी पावसाचा मिरचीला जाेरदार तडाखा बसला. उत्पादन घटले.
  • आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक भागात मिरचीचा तुटवडा.
  • शेतकरी व व्यापारी माेठ्या प्रमाणात मिरचीची निर्यात परदेशात करीत आहेत.
  • मसाला कारखानदार व एक्सपाेर्टची मागणी वाढली.

 

चीनमध्ये चालली मिरची

चीन देशामध्ये तेथील सरकार सर्वसामान्यांना नाममात्र दरात सवलतीमध्ये सरकारी स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून मिरची उपलब्ध करून देत आहेत. यासाठी चीनमध्ये तीन ते चार प्रदेशांतून मिरची निर्यात हाेत आहे. विशेष करून महाराष्ट्र व आंध्र प्रदेशातील मिरचीची निर्यात चीन देशात हाेत आहे. याचाच परिणाम भाववाढीवर झाला आहे.

असे आहेत मिरचीचे दर

  • मालेवाडा (गावठी मिरची) - २७० रुपये किलाे
  • इंजेवारी (गावठी मिरची) - २७०
  • झिंगी मिरची - २३०
  • नंदिता मिरची - २२०
  • तेजा मिरची - २४०
  • शिकाऊ मिरची - २३०

अवकाळी पावसामुळे मिरची उत्पादनावर परिणाम झाला आहे. शिवाय महाराष्ट्र व आंध्र प्रदेशातील मिरचीची चीनमध्ये निर्यात हाेत आहे. त्यामुळे यंदा मिरचीच्या भावात किलाेमागे ५० ते ६० रुपयांची वाढ झाली आहे.

- मयूर कावळे, मिरची व्यापारी

मिरची ही जीवनावश्यक वस्तू आहे. यंदा मिरचीचे भाव वाढल्याने त्याचा परिणाम संपूर्ण बाजारावर हाेत आहे. उत्पन्न गतवर्षी इतके आहे. मात्र महागाई वाढल्याने जमाखर्चाचा मेळ बसत नसल्याचे दिसत आहे.

- वर्षा बारसागडे, गृहिणी

आम्ही दरवर्षी उन्हाळ्यात एप्रिल महिन्यात वर्षभराची मिरची एकदाच खरेदी करताे. यंदा मिरची खरेदी करावयाची आहे. बाजारात भाजीपाला खरेदी करताना सहज चाैकशी केली असता, गतवर्षीच्या तुलनेत यंदा मिरचीचे भाव वाढल्याचे समजले. भाव कमी हाेतात काय, यासाठी काही दिवस प्रतीक्षा करण्याचा विचार आहे. त्यानंतरच मिरचीची खरेदी करू.

- राेशनी मेश्राम, गृहिणी

टॅग्स :MarketबाजारGadchiroliगडचिरोलीagricultureशेती