शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
2
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
3
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
4
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
5
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
6
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
7
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
8
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
10
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
11
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
12
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
13
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
14
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
15
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
16
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
17
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
18
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
19
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
20
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

नक्षली सावटात हरवले गडचिरोलीचे पर्यटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2015 01:05 IST

जिल्ह्यात ४० वर अधिक पर्यटन स्थळे आहेत. भारतात कुठे नव्हे ती प्रचंड वनसंपदा व वन्यजीव तसेच वन औषधी या जिल्ह्यात आहे.

पर्यटन दिन विशेष : पाहण्यासारखे बरेच काही असूनही पर्यटकांचा पाय मात्र वळत नाही; सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे गडचिरोली : जिल्ह्यात ४० वर अधिक पर्यटन स्थळे आहेत. भारतात कुठे नव्हे ती प्रचंड वनसंपदा व वन्यजीव तसेच वन औषधी या जिल्ह्यात आहे. एकट्या जंगलाच्या भरवशावर इको पर्यटन होऊ शकते. परंतु १९८० पासून या जिल्ह्यात नक्षली चळवळीचा उद्रेक झाल्याने राज्य व देशाच्या अनेक भागातून महाराष्ट्रात येणाऱ्या पर्यटकांचा पाय गडचिरोलीच्या मातीकडे वळत नाही. त्यामुळे या भागातील पर्यटन केवळ कागदावरच आहे. गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळांमध्ये मार्र्कंडा, हेमलकसा, आवलमरी, टिप्पागड, सिरोंचा, खोब्रामेंढा, काशीबेल कुनघाडा, ग्लोरी आॅफ फॉरेस्ट, लख्खामेंढा, डोंगरमेंढा, बिनागुंडा, कोलामार्का, भामरागडचे लाकडाचे रेस्ट हाऊस, भंडारेश्वर मंदिर, वैरागड किल्ला, हत्तीकॅम्प कमलापूर, भवरागड, मेंढालेखा, चंद्राखंडी पहाडी, सोमनूर संगम यांचा समावेश आहे. याशिवाय अनेक महत्त्वाच्या वनस्पती प्रजाती जंगलात आहे. चपराळा अभयारण्यातही भटकंती करण्याला प्रचंड वाव आहे. ज्यांना जंगल सफारी करायची असेल त्यांच्यासाठी हिवाळ्याच्या दिवसात प्रचंड चांगले वातावरण आहे. प्रदूषण नसल्याने निसर्ग पर्यटनाला प्रचंड वाव या ठिकाणी आहे. या सर्व बाबी असतानाही पर्यटन विकासाच्या दृष्टीने आजवर कोणत्याही उपाययोजना झाल्या नाही. किमान आठवडाभर पर्यटकाला या भागात फिरण्यासारखे प्रचंड वातावरण व स्थळ असताना यादृष्टीने आजवर कधीही प्रयत्न झाले नाही. केवळ नक्षलवाद्यांची दहशत हा एकमेव अडसर पर्यटकांना जिल्ह्यात येण्यासाठी नाही. तर पर्यटनासाठी लागणाऱ्या या आवश्यक सोयीसुविधाही उपलब्ध नसल्याने या जिल्ह्याच्या पर्यटनाविषयी कमालीची उदासीनता दिसून येते. या बाबतचे चित्र बदलविण्याची गरज आहे. त्या दृष्टीने पाऊल अद्यापही टाकल्या गेलेले नाही. (जिल्हा प्रतिनिधी)