शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
2
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
3
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
4
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
5
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
6
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
7
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
8
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
9
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
10
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
12
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
13
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
14
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
15
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
16
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
17
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
18
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
19
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
20
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ

नक्षली सावटात हरवले गडचिरोलीचे पर्यटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2015 01:05 IST

जिल्ह्यात ४० वर अधिक पर्यटन स्थळे आहेत. भारतात कुठे नव्हे ती प्रचंड वनसंपदा व वन्यजीव तसेच वन औषधी या जिल्ह्यात आहे.

पर्यटन दिन विशेष : पाहण्यासारखे बरेच काही असूनही पर्यटकांचा पाय मात्र वळत नाही; सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे गडचिरोली : जिल्ह्यात ४० वर अधिक पर्यटन स्थळे आहेत. भारतात कुठे नव्हे ती प्रचंड वनसंपदा व वन्यजीव तसेच वन औषधी या जिल्ह्यात आहे. एकट्या जंगलाच्या भरवशावर इको पर्यटन होऊ शकते. परंतु १९८० पासून या जिल्ह्यात नक्षली चळवळीचा उद्रेक झाल्याने राज्य व देशाच्या अनेक भागातून महाराष्ट्रात येणाऱ्या पर्यटकांचा पाय गडचिरोलीच्या मातीकडे वळत नाही. त्यामुळे या भागातील पर्यटन केवळ कागदावरच आहे. गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळांमध्ये मार्र्कंडा, हेमलकसा, आवलमरी, टिप्पागड, सिरोंचा, खोब्रामेंढा, काशीबेल कुनघाडा, ग्लोरी आॅफ फॉरेस्ट, लख्खामेंढा, डोंगरमेंढा, बिनागुंडा, कोलामार्का, भामरागडचे लाकडाचे रेस्ट हाऊस, भंडारेश्वर मंदिर, वैरागड किल्ला, हत्तीकॅम्प कमलापूर, भवरागड, मेंढालेखा, चंद्राखंडी पहाडी, सोमनूर संगम यांचा समावेश आहे. याशिवाय अनेक महत्त्वाच्या वनस्पती प्रजाती जंगलात आहे. चपराळा अभयारण्यातही भटकंती करण्याला प्रचंड वाव आहे. ज्यांना जंगल सफारी करायची असेल त्यांच्यासाठी हिवाळ्याच्या दिवसात प्रचंड चांगले वातावरण आहे. प्रदूषण नसल्याने निसर्ग पर्यटनाला प्रचंड वाव या ठिकाणी आहे. या सर्व बाबी असतानाही पर्यटन विकासाच्या दृष्टीने आजवर कोणत्याही उपाययोजना झाल्या नाही. किमान आठवडाभर पर्यटकाला या भागात फिरण्यासारखे प्रचंड वातावरण व स्थळ असताना यादृष्टीने आजवर कधीही प्रयत्न झाले नाही. केवळ नक्षलवाद्यांची दहशत हा एकमेव अडसर पर्यटकांना जिल्ह्यात येण्यासाठी नाही. तर पर्यटनासाठी लागणाऱ्या या आवश्यक सोयीसुविधाही उपलब्ध नसल्याने या जिल्ह्याच्या पर्यटनाविषयी कमालीची उदासीनता दिसून येते. या बाबतचे चित्र बदलविण्याची गरज आहे. त्या दृष्टीने पाऊल अद्यापही टाकल्या गेलेले नाही. (जिल्हा प्रतिनिधी)