चांभार्डासह परिसरात अमिर्झा विद्युत केंद्रातून वीज पुरवठा केला जाताे. आठवडाभरापासून सायंकाळच्या सुमारास वादळवारा सुटत आहे. वादळ-वारा सुटल्यानंतर लगेच वीज पुरवठा खंडित केला जाताे; मात्र केवळ चांभार्डा व अन्य गावांकडे जाणारी वीज खंडित केली जाते. याचवेळी परिसराच्या गावातील वीज पुरवठा सुरू असताे. अशा प्रकारचा दुजाभाव का केला जात आहे, असा सवालही नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे, रात्रीच्या सुमारास खंडित केलेला वीज पुरवठा दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत सुरळीत केला जात नाही. याचा त्रास गावातील नागरिकांना सहन करावा लागताे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन अमिर्झा केंद्रातील कर्मचाऱ्यांना निर्देश देऊन चांभार्डा व अन्य गावांत नियमित वीज पुरवठा करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी चांभार्डा येथील नागरिकांनी केली आहे.
अमिर्झा परिसरात वीज पुरवठा वारंवार खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:41 IST