शहरं
Join us  
Trending Stories
1
दर गुरुवारी काय काम करतो हाफिज सईद?; लश्करच्या माजी दहशतवाद्याचा मोठा खुलासा
2
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
3
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
4
Fake News Alert : पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर वीज पुरवठा होणार खंडित? सरकारने लोकांना सांगितलं 'सत्य'
5
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
6
पाकिस्तानने खरंच भारताच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडलं का? सरकारकडून महत्त्वाचा खुलासा
7
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
8
"यांचं भलतंच युद्ध सुरु आहे", अमिताभ बच्चन यांचे ट्वीट बघून भडकले नेटकरी, हा काय प्रकार?
9
Narasimha Jayanti 2025: नृसिंह जयंतीनिमित्त जाणून घ्या १५०० वर्ष जुन्या नृसिंह मंदिराबद्दल!
10
भारतीय सैन्यानं केली पाकची फजिती; पत्रकार परिषदेत फोटो दाखवत खोट्या दाव्याची पोलखोल
11
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमाची घोषणा, पोस्टर पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "लाज वाटत नाही?"
12
आकाश डिफेन्स सिस्टमनं काढली PAKISTAN ची हवा, दुसरीकडे हे बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्सही सुस्साट 
13
Narasimha Jayanti 2025: 'नृसिंह म्हणजे समाजातून सिंहासारखा उभा ठाकलेला वीर!'-प.पू.आठवले शास्त्री
14
भारताच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, काय काय करतंय वाचाच 
15
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश
16
Vikram Gaikwad Death: राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन
17
India vs Pakistan : जीडीपी, जॉब आणि डेव्हलपमेंटमध्ये पाकिस्तानची दूरपर्यंत भारताशी तुलना नाही; पाहा 'ही' आकडेवारी
18
India Pakistan Tension : पाकिस्तानच्या मिसाईलचे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 
19
India Pakistan Tension : खेळ महत्त्वाचा; पण आधी देश! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा खास संदेश
20
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?

चार वर्षात जिल्ह्यातील निम्मे दूरध्वनी संच पडले बंद

By admin | Updated: December 8, 2014 22:34 IST

पाच वर्षांपूर्वी शहरातील व गावातील सर्व नागरिकांना खबरबात देणाऱ्या दूरध्वनी सेवेचा मोबाईल क्रांतीने घास घेतला असून दूरध्वनी संच बंद होण्याची संख्या झपाट्याने वाढली आहे. २०१० साली जिल्ह्यात

दिगांबर जवादे - गडचिरोलीपाच वर्षांपूर्वी शहरातील व गावातील सर्व नागरिकांना खबरबात देणाऱ्या दूरध्वनी सेवेचा मोबाईल क्रांतीने घास घेतला असून दूरध्वनी संच बंद होण्याची संख्या झपाट्याने वाढली आहे. २०१० साली जिल्ह्यात ८ हजार ८५४ दूरध्वनी जोडण्या होत्या. नोव्हेंबर २०१४ पर्यंत केवळ ४ हजार ८१६ जोडण्या चालू आहेत. दूरसंचार क्षेत्रात क्रांती निर्माण करण्याचे महत्त्वाचे पाऊल दूरध्वनी सेवेपासून सुरू झाले. दूरध्वनी सेवेचे फायदे नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर शहरासह ग्रामीण भागातही दूरध्वनी जोडण्यांची मागणी होऊ लागली होती. त्यामुळे शासनाने ग्रामीण भागातही दूरध्वनी सेवा सुरू केली. नागरिकही दूरध्वनी जोडणी घेण्यास विशेष पसंती दर्शवित होते. त्यामुळे शहरात प्रत्येक घरी व गावात किमान १० नागरिकांच्या घरी दूरध्वनीचा संच खणखणत होता. हा ध्वनी अचानक बंद होईल, अशी अपेक्षाही नव्हती. मात्र २००८ पासून खऱ्या मोबाईल क्रांतीला सुरूवात झाली. मोबाईल दूरध्वनीपेक्षा वापरण्यास अधिक सोयीस्कर व कमी खर्चाचेही असल्याने नागरिकांचा ओढा मोबाईलकडे वाढला. त्यानंतर मोबाईलमध्ये फोनसह इंटरनेट, आॅडीओ, व्हिडीओ, कॅमेरा आदी सुविधा कंपन्यांनी देण्याबरोबरच किंमतीही सामान्य नागरिकांच्या आवाक्यात आणल्या त्यामुळे मोबाईलची संख्या झपाट्याने वाढली. २०१० साली गडचिरोली जिल्ह्यात ८ हजार ८५४ लँडलाइन जोडण्यात होत्या. त्यांची संख्या प्रतीवर्षी जवळपास एक हजाराने घटत नोव्हेंबर २०१४ पर्यंत आता केवळ ४ हजार ८१६ जोडण्या शिल्लक आहेत. तर मोबाईलधारकांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. २०११ साली बीएसएनएलचे १ लाख ३६ हजार ५४६ मोबाईलधारक होते. ही संख्या वाढून सद्य:स्थितीत बीएसएनएलचे १ लाख ८० हजार ९२९ ग्राहक आहेत. वाढत्या मोबाईलच्या संख्येनेच लँडलाईनचा घास घेतला आहे. सद्य:स्थितीत लँडलाईन सेवा केवळ शासकीय, निमशासकीय व कंपन्यांची कार्यालये यांच्या पुरताच मर्यादित राहिली आहेत. प्रत्येक लँडलाईन जोडणीवर महिन्याचे १२० रूपये फिक्स चार्ज आकारले जाते. त्यावर केवळ ५० कॉल मोफत दिले जातात. त्या तुलनेत १२० रूपयाच्या मोबाईल रिचार्जमध्ये मोबाईलधारक किमान १०० मिनिटे बोलू शकतो. फिक्स चार्जमुळेही दूरध्वनी जोडण्या बंद होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. संपूर्ण देशात २००५ मध्ये ५ कोटी १ लाख ८० हजार जोडण्या होत्या. सप्टेंबर २०१४ पर्यंत ही संख्या २ कोटी ७४ लाख ५ हजार ९०१ एवढी राहिली आहे. सप्टेंबर या एका महिन्यात तब्बल १ लाख १७ हजार ३१९ दूरध्वनी जोडण्या बंद करण्यात आल्या आहेत.