शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
3
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
4
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
5
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
6
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
7
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
8
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
9
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
10
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
11
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
12
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!
13
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
14
"क्लर्कची नोकरी जाते, तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची का नाही?"; PM मोदी भ्रष्टाचार विरोधी विधेयकावर काय बोलले?
15
“शेतकरी कर्जमाफी फाइलवर सही करण्यास फडणवीस-शिंदे-पवारांच्या हाताला लकवा मारला आहे का?”: सपकाळ
16
नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!
17
“RSS बंदी असलेली संघटना आहे का?”; CM फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर
18
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
19
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स
20
"त्यांना लीड भूमिका केलेल्याच मुली हव्या असतात...", अमृता देशमुखने सांगितलं टीव्ही मालिकांचं कटू सत्य

चार वर्षात जिल्ह्यातील निम्मे दूरध्वनी संच पडले बंद

By admin | Updated: December 8, 2014 22:34 IST

पाच वर्षांपूर्वी शहरातील व गावातील सर्व नागरिकांना खबरबात देणाऱ्या दूरध्वनी सेवेचा मोबाईल क्रांतीने घास घेतला असून दूरध्वनी संच बंद होण्याची संख्या झपाट्याने वाढली आहे. २०१० साली जिल्ह्यात

दिगांबर जवादे - गडचिरोलीपाच वर्षांपूर्वी शहरातील व गावातील सर्व नागरिकांना खबरबात देणाऱ्या दूरध्वनी सेवेचा मोबाईल क्रांतीने घास घेतला असून दूरध्वनी संच बंद होण्याची संख्या झपाट्याने वाढली आहे. २०१० साली जिल्ह्यात ८ हजार ८५४ दूरध्वनी जोडण्या होत्या. नोव्हेंबर २०१४ पर्यंत केवळ ४ हजार ८१६ जोडण्या चालू आहेत. दूरसंचार क्षेत्रात क्रांती निर्माण करण्याचे महत्त्वाचे पाऊल दूरध्वनी सेवेपासून सुरू झाले. दूरध्वनी सेवेचे फायदे नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर शहरासह ग्रामीण भागातही दूरध्वनी जोडण्यांची मागणी होऊ लागली होती. त्यामुळे शासनाने ग्रामीण भागातही दूरध्वनी सेवा सुरू केली. नागरिकही दूरध्वनी जोडणी घेण्यास विशेष पसंती दर्शवित होते. त्यामुळे शहरात प्रत्येक घरी व गावात किमान १० नागरिकांच्या घरी दूरध्वनीचा संच खणखणत होता. हा ध्वनी अचानक बंद होईल, अशी अपेक्षाही नव्हती. मात्र २००८ पासून खऱ्या मोबाईल क्रांतीला सुरूवात झाली. मोबाईल दूरध्वनीपेक्षा वापरण्यास अधिक सोयीस्कर व कमी खर्चाचेही असल्याने नागरिकांचा ओढा मोबाईलकडे वाढला. त्यानंतर मोबाईलमध्ये फोनसह इंटरनेट, आॅडीओ, व्हिडीओ, कॅमेरा आदी सुविधा कंपन्यांनी देण्याबरोबरच किंमतीही सामान्य नागरिकांच्या आवाक्यात आणल्या त्यामुळे मोबाईलची संख्या झपाट्याने वाढली. २०१० साली गडचिरोली जिल्ह्यात ८ हजार ८५४ लँडलाइन जोडण्यात होत्या. त्यांची संख्या प्रतीवर्षी जवळपास एक हजाराने घटत नोव्हेंबर २०१४ पर्यंत आता केवळ ४ हजार ८१६ जोडण्या शिल्लक आहेत. तर मोबाईलधारकांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. २०११ साली बीएसएनएलचे १ लाख ३६ हजार ५४६ मोबाईलधारक होते. ही संख्या वाढून सद्य:स्थितीत बीएसएनएलचे १ लाख ८० हजार ९२९ ग्राहक आहेत. वाढत्या मोबाईलच्या संख्येनेच लँडलाईनचा घास घेतला आहे. सद्य:स्थितीत लँडलाईन सेवा केवळ शासकीय, निमशासकीय व कंपन्यांची कार्यालये यांच्या पुरताच मर्यादित राहिली आहेत. प्रत्येक लँडलाईन जोडणीवर महिन्याचे १२० रूपये फिक्स चार्ज आकारले जाते. त्यावर केवळ ५० कॉल मोफत दिले जातात. त्या तुलनेत १२० रूपयाच्या मोबाईल रिचार्जमध्ये मोबाईलधारक किमान १०० मिनिटे बोलू शकतो. फिक्स चार्जमुळेही दूरध्वनी जोडण्या बंद होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. संपूर्ण देशात २००५ मध्ये ५ कोटी १ लाख ८० हजार जोडण्या होत्या. सप्टेंबर २०१४ पर्यंत ही संख्या २ कोटी ७४ लाख ५ हजार ९०१ एवढी राहिली आहे. सप्टेंबर या एका महिन्यात तब्बल १ लाख १७ हजार ३१९ दूरध्वनी जोडण्या बंद करण्यात आल्या आहेत.