शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मावर बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
4
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
5
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
6
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
7
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
8
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
9
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
10
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
11
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
12
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
13
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
14
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
15
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
16
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
17
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
18
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
19
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
20
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही

जिल्हा विकासासाठी चार हजार कोटींचा निधी प्रस्तावित

By admin | Updated: October 12, 2015 01:45 IST

डावी उजवी विचारसरणी या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यासाठी केंद्र शासनाने सुमारे ३ हजार ९४२ कोटी रूपये प्रस्तावित केले ...

पत्रकार परिषद : अशोक नेते यांची माहिती एटापल्ली/सिरोंचा/आलापल्ली : डावी उजवी विचारसरणी या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यासाठी केंद्र शासनाने सुमारे ३ हजार ९४२ कोटी रूपये प्रस्तावित केले असून काही दिवसात मंजुरी मिळताच विकासकामांना सुरूवात होईल, अशी माहिती खासदार अशोक नेते यांनी एटापल्ली, सिरोंचा, आलापल्ली येथे रविवारी आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान दिली.केंद्र शासनाने सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत चांगल्या योजना सुरू केल्या आहेत. या योजनांची माहिती घेऊन योजनांचा लाभ घेतल्यास विकासाची दारे मोकळी होण्यास मदत होईल. गडचिरोली जिल्ह्यात पाच सिंचन बंधारे मंजूर करून घेतले आहेत. चिचडोह येथील सिंचन योजनेचे काम ७५ टक्के पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात लहान-लहान उद्योग सुरू होणार असून सर्वांना रोजगार उपलब्ध होणार आहे. डावी उजवी विचारसरणीचा शिकार गडचिरोली जिल्हा बनला आहे. ही विचारसरणी ज्या जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे त्या जिल्ह्यांचा विकास रखडला आहे. ही बाब लक्षात घेऊन केंद्र शासनाने या जिल्ह्यांसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्याचे धोरण अवलंबिले आहे. या अंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला ३ हजार ९४२ कोटी रूपये उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यातून विकास कामे होण्यास फार मोठी मदत होईल. सुरजागड प्रकल्प चालू झाला तर आष्टी येथे २०० ते ३०० एकर जागा खरेदी करून प्रकल्प सुरू केला जाईल. मात्र कोणत्याही परिस्थितीत सुरजागड प्रकल्प बाहेर जिल्ह्यात जाऊ दिल्या जाणार नाही, अशी माहिती दिली. पत्रकार परिषदेला बाबुराव कोहळे, रविंद्र ओल्लालवार, विनोद आकनपल्लीवार आदी उपस्थित होते.