शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

टीपी देण्यास वन विभागाची टाळाटाळ

By admin | Updated: July 5, 2017 01:17 IST

आष्टी परिसरातील धन्नूर, चौडमपल्ली, चपराळा, चंदनखेडी, रामनगट्टा, सिंगमपल्ली, ठाकरी, कुनघाडा, मार्र्कंडा, इल्लूर या गावातील नागरिकांनी यावर्षी स्वत:हून तेंदूपत्ता संकलन केले.

लाखोंचा तेंदूपत्ता पडून : चपराळा अभयारण्यांतर्गत येणाऱ्या गावातील नागरिकांचा संघर्षलोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : आष्टी परिसरातील धन्नूर, चौडमपल्ली, चपराळा, चंदनखेडी, रामनगट्टा, सिंगमपल्ली, ठाकरी, कुनघाडा, मार्र्कंडा, इल्लूर या गावातील नागरिकांनी यावर्षी स्वत:हून तेंदूपत्ता संकलन केले. मात्र तेंदूपत्त्याच्या वाहतुकीसाठी वन विभागाने टीपी देण्यास नकार दिला असल्याने लाखो रूपयांचा तेंदूपत्ता गावातच पडून आहे. वन हक्क कायद्यानुसार धन्नूर, चौडमपल्ली, चपराळा, चंदनखेडी, रामनगट्टा, सिंगमपल्ली, ठाकरी, कुनघाडा, इल्लूर, मार्र्कंडा रै. या गावांना जमिनीचे पट्टे देण्यात आले आहेत. त्याचबरोबर धन्नूर व चंदनखेडी या दोन गावाला ९० हेक्टरचा सामुहिक वनदावा मंजूर केला आहे. तसेच ही सर्व गावे पेसा कायद्यांतर्गत येत असल्याने वनोपज गोळा करून ती विक्री करण्याचे अधिकार ग्रामसभांना देण्यात आले आहेत. त्यानुसार या गावातील गावकऱ्यांनी यावर्षी तेंदू संकलन केले. त्यावेळी वन विभाग व गावकरी यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता. या ठिकाणी अभयारण्य असल्याचे कारण सांगून वन विभागाने तेंदूपत्ता संकलन करू देण्यास नकार दिला होता. आता टीपी देण्यास टाळाटाळ केली जात आहे. गावकरी, जिल्हाधिकारी व वन विभागाचे अधिकारी यांची बैठक पार पडली. या बैठकीत टीपी देण्याच्या सूचना केल्या. मात्र अजूनपर्यंत टीपी दिली नाही. त्यामुळे लाखो रूपयांचा तेंदूपत्ता खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धन्नूर येथे वीज पडून दीपक कुसनाके, आकाश कुसनाके, रमेश कुसनाके, लक्ष्मण तुरे, विलास आत्राम, लचमा कन्नाके, दिवाकर तलांडे हे जखमी झाले. मात्र शासनाने त्यांना किरकोळ मदत दिली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी गावातील नागरिकांची भेट घेतली असता, या दोन प्रमुख समस्या नागरिकांनी सांगितल्या. तेंदूपत्ता वाहतुकीसाठी टीपी द्यावी, अन्यथा काँग्रेसच्या नेतृत्वात आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. यावेळी माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी, तालुका अध्यक्ष शंकरराव सालोटकर, प्रभाकर वासेकर, किसन शेट्ये, संजय पंदिलवार, शंकर आकरेड्डीवार, दिलीप शेख, शंकर आत्राम, मोतीराम कुसनाके, तुकाराम शेडमाके, नामदेव कुसनाके, जानकीराम कुसनाके, वसंत तोरे, कालिदास कुसनाके, जयराम कन्नाके, सदाशिव पेंदाम, सखाराम पेंदाम, मानिक मडावी व गावकरी उपस्थित होते.