शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

अहेरी उपविभागातील समस्या सोडवा

By admin | Updated: July 16, 2016 01:46 IST

७ ते १३ जुलैदरम्यान झालेल्या संततधार पावसामुळे अहेरी उपविभागातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.

अहेरी उपविभागातील समस्या सोडवारस्ते, वीज दुरूस्त करा : धर्मराव आत्राम यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी गडचिरोली : ७ ते १३ जुलैदरम्यान झालेल्या संततधार पावसामुळे अहेरी उपविभागातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. शिवाय बऱ्याच गावांचा वीज पुरवठा अद्यापही बंद आहे. अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीचा अहेरी उपविभागाला प्रचंड फटका बसला. रस्ते व वीज पुरवठा दुरूस्त करण्यात यावा, अशी मागणी माजी राज्यमंत्री तथा राकाँचे ज्येष्ठ नेते धर्मरावबाबा आत्राम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात धर्मरावबाबा आत्राम यांनी म्हटले आहे की, संततधार व मुसळधार पावसामुळे अहेरी उपविभागात पूर परिस्थिती निर्माण झाली. अनेक ठिकाणच्या रस्त्यांची दुरवस्था झाली. शिवाय वीज पुरवठाही बंद झाला. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. अहेरी उपविभागातील अडचणीत सापडलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असेही आत्राम यांनी म्हटले आहे. दरम्यान धर्मरावबाबा आत्राम यांनी जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांच्याशी अहेरी उपविभागातील विविध समस्या संदर्भात सखोल चर्चा केली. या आहेत मागण्या आष्टी- आलापल्ली, आलापल्ली- भामरागड, आलापल्ली- मुलचेरा, आलापल्ली- सिरोंचा मार्गाची दुरूस्ती करावी, भामरागड नजीकच्या पर्लकोटा नदीवरील पुलाचे काम सुरू करावे, लहान रपट्याऐवजी मोठे पूल बांधावे, सिरोंचा- आलापल्ली वाहिनीवरील वीज पुरवठ्याच्या देखभालीचे महावितरणला निर्देश द्यावे, एटापल्ली, भामरागड तालुक्यातील गावांचा वीज पुरवठा सुरू करावा, नुकसानग्रस्त शेतीचे सर्वेक्षण करावे, येर्रावागू नाल्यावरील रस्ता वाहून गेल्याने येथे पर्यायी रस्ता तयार करावा.