शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
4
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
5
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
6
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
7
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
8
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
9
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
10
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
11
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
12
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
13
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
14
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
15
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
16
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
17
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
18
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
19
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
20
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी

अहेरी उपविभागातील समस्या सोडवा

By admin | Updated: July 16, 2016 01:46 IST

७ ते १३ जुलैदरम्यान झालेल्या संततधार पावसामुळे अहेरी उपविभागातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.

अहेरी उपविभागातील समस्या सोडवारस्ते, वीज दुरूस्त करा : धर्मराव आत्राम यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी गडचिरोली : ७ ते १३ जुलैदरम्यान झालेल्या संततधार पावसामुळे अहेरी उपविभागातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. शिवाय बऱ्याच गावांचा वीज पुरवठा अद्यापही बंद आहे. अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीचा अहेरी उपविभागाला प्रचंड फटका बसला. रस्ते व वीज पुरवठा दुरूस्त करण्यात यावा, अशी मागणी माजी राज्यमंत्री तथा राकाँचे ज्येष्ठ नेते धर्मरावबाबा आत्राम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात धर्मरावबाबा आत्राम यांनी म्हटले आहे की, संततधार व मुसळधार पावसामुळे अहेरी उपविभागात पूर परिस्थिती निर्माण झाली. अनेक ठिकाणच्या रस्त्यांची दुरवस्था झाली. शिवाय वीज पुरवठाही बंद झाला. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. अहेरी उपविभागातील अडचणीत सापडलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असेही आत्राम यांनी म्हटले आहे. दरम्यान धर्मरावबाबा आत्राम यांनी जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांच्याशी अहेरी उपविभागातील विविध समस्या संदर्भात सखोल चर्चा केली. या आहेत मागण्या आष्टी- आलापल्ली, आलापल्ली- भामरागड, आलापल्ली- मुलचेरा, आलापल्ली- सिरोंचा मार्गाची दुरूस्ती करावी, भामरागड नजीकच्या पर्लकोटा नदीवरील पुलाचे काम सुरू करावे, लहान रपट्याऐवजी मोठे पूल बांधावे, सिरोंचा- आलापल्ली वाहिनीवरील वीज पुरवठ्याच्या देखभालीचे महावितरणला निर्देश द्यावे, एटापल्ली, भामरागड तालुक्यातील गावांचा वीज पुरवठा सुरू करावा, नुकसानग्रस्त शेतीचे सर्वेक्षण करावे, येर्रावागू नाल्यावरील रस्ता वाहून गेल्याने येथे पर्यायी रस्ता तयार करावा.