शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
3
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
4
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
5
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
6
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
7
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
8
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
9
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
10
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
11
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
12
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
13
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
14
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
15
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
16
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
17
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
18
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
19
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
20
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात

पाच हजार मेट्रिक टन खत पोहोचले

By admin | Updated: June 5, 2017 00:34 IST

२०१७-१८ च्या खरीप हंगामात गडचिरोली जिल्ह्यात सुमारे दोन लाख हेक्टरवर धान पिकाची लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

बियाणेही दाखल : ११ हजार ८६६ मेट्रिक टन साठा उपलब्ध लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : २०१७-१८ च्या खरीप हंगामात गडचिरोली जिल्ह्यात सुमारे दोन लाख हेक्टरवर धान पिकाची लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. धान पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र गडचिरोली जिल्ह्यात १ लाख ५३ हजार हेक्टर आहे. मागील वर्षी १ लाख ८४ हजार हेक्टरवर धान पिकाची लागवड करण्यात आली होती. खरीप हंगामात शेतकऱ्यांची खते व बियाण्यांसाठी ऐनवेळी धावपळ होऊ नये, या उद्देशाने जि.प. च्या कृषी विभागाने नियोजन केले आहे. त्यानुसार शनिवारी गडचिरोली जिल्ह्यात ५ हजार ६६५ मेट्रीक टन खत पोहोचला आहे. याशिवाय धान बियाणेही उपलब्ध झाली आहेत. धान हे गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे. एकूण लागवड क्षेत्राच्या सुमारे ९० टक्के क्षेत्रावर धान पिकाची लागवड केली जाते. विशेष करून गडचिरोली जिल्ह्यात खरीपामध्ये धान पिकाची लागवड करण्याचा ओढा कायम आहे. गडचिरोली जिल्ह्यातील वातावरण व जमीन धान पिकासाठी पोषक आहे. धान पिकाच्या दृष्टीने प्रत्येक गावात मामा तलाव, बोड्यांची बांधणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात भात पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ५३ हजार हेक्टर आहे. असे असतानाही दरवर्षी धान पिकाच्या लागवडीमध्ये वाढ होत आहे. २०१६-१७ मध्ये १ लाख ८४ हजार हेक्टरवर धान पिकाची लागवड झाली होती. सर्वसाधारण क्षेत्राच्या हे प्रमाण १२१ टक्के आहे. २०१७ च्या खरीप हंगामात दोन लाख हेक्टरवर धान पिकाची लागवड करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. जिल्हा परिषद कृषी विभागाच्या माहितीनुसार, जिल्ह्यातील कृषी केंद्राकडे जवळपास सहा हजार ४०० मेट्रीक टन खत गतवर्षीचा शिल्लक होता. आता जुना व नवा मिळून एकूण ११ हजार ८६६ मेट्रीक टन इतका खतसाठा जिल्ह्यात उपलब्ध झाला आहे. यामध्ये युरीया, डीएपी, एसएसपी, एमओपी, संयुक्त खते आदींचा समावेश आहे. सन २०१७ च्या खरीप हंगामासाठी जि.प.च्या कृषी विभागाने कृषी आयुक्तालय कार्यालयाकडे एकूण ५० हजार १४० मेट्रीक टन खताची मागणी केली आहे. शासनाकडून ५४ हजार ७०० मेट्रीक टन खताचे आवंटन मंजूर करण्यात आली आहे. गतवर्षीचा ६ हजार ४०० मेट्रीक टन खतसाठा उपलब्ध आहे व यंदा नव्याने पहिल्या टप्प्यात शनिवारी ५ हजार ६६२ मेट्रीक टन खत पोहोचला आहे. त्यामुळे आता गडचिरोली जिल्ह्यात जिल्हाभरातील कृषी केंद्रांकडे एकूण ११ हजार ८६६ मेट्रीक टन खताचा साठा उपलब्ध झाला आहे. येत्या दोन ते तीन दिवसात चंद्रपूर येथून खताची दुसरी रॅक पोहोचणार आहे. येत्या १०-१२ दिवसात संपूर्ण ५४ हजार ७०० मेट्रीक टन खताचा साठा गडचिरोली जिल्ह्यासाठी उपलब्ध होणार आहे. त्या दृष्टीने जि.प.च्या कृषी विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. कृषी केंद्रातून खत व बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहेत.७ हजार ७६६ क्विंटल बियाणे उपलब्धयंदाच्या खरीप हंगामासाठी जि.प.च्या कृषी विभागाने १६ हजार ७३९ बियाणे आवश्यक असल्याचे नियोजन केले आहे. कृषी आयुक्तामार्फत बियाण्यांचे आवंटन मंजूर करण्यात आले आहे. सार्वजनिक खासगी मिळून आतापर्यंत धान व इतर सर्व पिकांचे मिळून एकूण ७७६६.९३ क्विंटल बियाणे जिल्ह्यात उपलब्ध झाले आहेत. यामध्ये ७६९०.५० क्विंटल धान बियाण्यांचा पुरवठा झाला आहे. याशिवाय सोयाबिन ५० क्विंटल, तूर २२ क्विंटल, कापूस ४.२३ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. आणखी धान बियाण्यांचा पुरवठा जिल्ह्यातील कृषी केंद्रात लवकरच होणार आहे. आवश्यकत्या सूचना कृषी विभागाने कृषी केंद्र संचालकांना दिल्या आहेत.बियाणे व खतांचा तुटवडा पडणार नाहीयंदाच्या खरीप हंगामासाठी धान व इतर पिकांची बियाणे पुरेशा प्रमाणात जिल्ह्यात कृषी केंद्रामार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच पुरेशा प्रमाणात खताचा पुरवठाही विहीत वेळेत जिल्ह्यात होणार आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात बियाणे व खतांचा तुटवडा जाणवणार नाही, अशी माहिती जि.प.चे कृषी अधिकारी एस. टी. पठाण यांनी दिली आहे.