शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

पहिल्याच पावसात आरमोरीतील नाली चोख

By admin | Updated: June 19, 2014 00:05 IST

स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाची मान्सूनपूर्व तयारी मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाने फोल ठरविली आहे. शहरातील निम्म्यापेक्षा अधिक वार्डातील नाल्यांची साफसफाई करण्यात न आल्याने

आरमोरी : स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाची मान्सूनपूर्व तयारी मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाने फोल ठरविली आहे. शहरातील निम्म्यापेक्षा अधिक वार्डातील नाल्यांची साफसफाई करण्यात न आल्याने अनेक वार्डातील नाल्या तुंबलेल्या स्थितीत आढळून आले. त्यामुळे अनेक तास पाणी रस्त्यावर जमा झाले होते. त्यामुळे ग्रामपंचायतीची मान्सूनपूर्व तयारी शून्य असल्याचे निदर्शनास आले आहे.शहरातील नेहरू चौक, टिळक चौक, भगतसिंग चौक, मार्केट लाईन, सराफा लाईन, गजानन मंदिर, विठ्ठल मंदिर, ताडूरवारनगर, शक्तीनगर, गायकवाड चौक, बर्डी आदी वार्डातील निम्म्यापेक्षा अधिक नाल्यांची सफाई उन्हाळ्यात करण्यात आली नाही. शिवाय काही वार्डातील नाल्यांचा उपसा मागील २ वर्षापासून करण्यात आला नाही, असे वार्डातील नागरिकांचे म्हणणे आहे. शारदा कॉलनीतील रहिवाशांनी वार्डातील नाल्यांचा उपसा करण्याकरिता वारंवार ग्रामपंचायतकडे तक्रार व निवेदन दिले होते. परंतु ग्रामपंचायतने नागरिकांच्या मागणीकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले. नागरिकांनी केलेल्या एकाही तक्रारीची दखल घेतली नाही. त्यामुळे शारदा कॉलनीतील काही नागरिकांनी घराशेजारील नालींचा उपसा करण्याचे काम स्वत:च हाती घेतले. शहरातील काही वार्डातील नाल्यांमधील साफसफाई वर्षातून एकदाही करण्यात येत नाही. यामुळे नाल्यांमधील सांडपाणी पावसाळ्यात रस्त्यावरून वाहत असते. याचा सर्वाधिक त्रास नागरिकांनाच सहन करावा लागतो. शहरात बांधण्यात आलेल्या नाल्या सांडपाणी वाहून नेण्याकरिता असल्या तरी काही नागरिकांनी नाल्यांवर अतिक्रमण केले आहे तर काही नागरिक घरातील व दुकानातील केरकचरा नालीत आणून टाकतात असे चित्र असतांनाही नाल्यांवरील अतिक्रमणधारकांवर ग्रामपंचायत प्रशासन कुठलीही कारवाई करीत नाही. शिवाय दुकानातील केरकचरा नालीत टाकणाऱ्या नागरिकांवर पायबंदही घालत नाही. त्यामुळे ग्रामपंचायतचे पदाधिकारी वार्डाच्या विकासाकडे लक्ष देण्यापेक्षा केवळ मतांचे राजकारण करण्यात व्यस्त आहेत, असे नागरिकांचे म्हणणे आहे. मंगळवारी झालेल्या जोरदार पावसामुळे मार्केटलाईन, पंचायत समिती व काही वार्डातील नाल्यांमधील पाणी पूर्णत: रस्त्यावर आले होते. त्यामुळे रस्त्याला तलावाचे स्वरूप आले होते. जोरदार पाऊस झाल्यास शहरातील पाणी झोपड्यांमध्ये पाणी शिरून अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंची हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरात झालेल्या जोरदार पाऊसामुळे अनेक वार्डात रस्ते पाण्याने फुलून गेले होते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. ग्रामपंचायतमार्फत मान्सूनपूर्व तयारी केली जाते. मात्र आरमोरी ग्रामपंचायतीने शहरातील निम्म्यापेक्षा जास्त वार्डातील नाल्यांचा उपसाच उन्हाळ्यात न केल्याने तसेच नाल्यांवरील अतिक्रमण न हटविल्याने शहरात जलमय स्थिती निर्माण झाली होती. (प्रतिनिधी)