शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच पावसात आरमोरीतील नाली चोख

By admin | Updated: June 19, 2014 00:05 IST

स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाची मान्सूनपूर्व तयारी मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाने फोल ठरविली आहे. शहरातील निम्म्यापेक्षा अधिक वार्डातील नाल्यांची साफसफाई करण्यात न आल्याने

आरमोरी : स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाची मान्सूनपूर्व तयारी मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाने फोल ठरविली आहे. शहरातील निम्म्यापेक्षा अधिक वार्डातील नाल्यांची साफसफाई करण्यात न आल्याने अनेक वार्डातील नाल्या तुंबलेल्या स्थितीत आढळून आले. त्यामुळे अनेक तास पाणी रस्त्यावर जमा झाले होते. त्यामुळे ग्रामपंचायतीची मान्सूनपूर्व तयारी शून्य असल्याचे निदर्शनास आले आहे.शहरातील नेहरू चौक, टिळक चौक, भगतसिंग चौक, मार्केट लाईन, सराफा लाईन, गजानन मंदिर, विठ्ठल मंदिर, ताडूरवारनगर, शक्तीनगर, गायकवाड चौक, बर्डी आदी वार्डातील निम्म्यापेक्षा अधिक नाल्यांची सफाई उन्हाळ्यात करण्यात आली नाही. शिवाय काही वार्डातील नाल्यांचा उपसा मागील २ वर्षापासून करण्यात आला नाही, असे वार्डातील नागरिकांचे म्हणणे आहे. शारदा कॉलनीतील रहिवाशांनी वार्डातील नाल्यांचा उपसा करण्याकरिता वारंवार ग्रामपंचायतकडे तक्रार व निवेदन दिले होते. परंतु ग्रामपंचायतने नागरिकांच्या मागणीकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले. नागरिकांनी केलेल्या एकाही तक्रारीची दखल घेतली नाही. त्यामुळे शारदा कॉलनीतील काही नागरिकांनी घराशेजारील नालींचा उपसा करण्याचे काम स्वत:च हाती घेतले. शहरातील काही वार्डातील नाल्यांमधील साफसफाई वर्षातून एकदाही करण्यात येत नाही. यामुळे नाल्यांमधील सांडपाणी पावसाळ्यात रस्त्यावरून वाहत असते. याचा सर्वाधिक त्रास नागरिकांनाच सहन करावा लागतो. शहरात बांधण्यात आलेल्या नाल्या सांडपाणी वाहून नेण्याकरिता असल्या तरी काही नागरिकांनी नाल्यांवर अतिक्रमण केले आहे तर काही नागरिक घरातील व दुकानातील केरकचरा नालीत आणून टाकतात असे चित्र असतांनाही नाल्यांवरील अतिक्रमणधारकांवर ग्रामपंचायत प्रशासन कुठलीही कारवाई करीत नाही. शिवाय दुकानातील केरकचरा नालीत टाकणाऱ्या नागरिकांवर पायबंदही घालत नाही. त्यामुळे ग्रामपंचायतचे पदाधिकारी वार्डाच्या विकासाकडे लक्ष देण्यापेक्षा केवळ मतांचे राजकारण करण्यात व्यस्त आहेत, असे नागरिकांचे म्हणणे आहे. मंगळवारी झालेल्या जोरदार पावसामुळे मार्केटलाईन, पंचायत समिती व काही वार्डातील नाल्यांमधील पाणी पूर्णत: रस्त्यावर आले होते. त्यामुळे रस्त्याला तलावाचे स्वरूप आले होते. जोरदार पाऊस झाल्यास शहरातील पाणी झोपड्यांमध्ये पाणी शिरून अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंची हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरात झालेल्या जोरदार पाऊसामुळे अनेक वार्डात रस्ते पाण्याने फुलून गेले होते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. ग्रामपंचायतमार्फत मान्सूनपूर्व तयारी केली जाते. मात्र आरमोरी ग्रामपंचायतीने शहरातील निम्म्यापेक्षा जास्त वार्डातील नाल्यांचा उपसाच उन्हाळ्यात न केल्याने तसेच नाल्यांवरील अतिक्रमण न हटविल्याने शहरात जलमय स्थिती निर्माण झाली होती. (प्रतिनिधी)