शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

रोवणी खर्चात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:36 IST

पूर्वी धान रोवणीचे काम मजुरीने केल्या जात होते यात आठवडाप्रमाणे मजूर धान्य घेत असत त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात रोवणी ...

पूर्वी धान रोवणीचे काम मजुरीने केल्या जात होते यात आठवडाप्रमाणे मजूर धान्य घेत असत त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात रोवणी काम करताना सोयीचे होत होते. मात्र गेल्या सात आठ वर्षांपासून ही पद्धत बंद होऊन याऐवजी ठेका पद्धतीने रोवणी काम करण्याकडे मजुरांचा कल वाढला आहे. दरवर्षी रोवणी कामासाठी लागणारा खर्च वाढत चालला आहे. उत्पादित मालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेती व्यवसाय तोट्यात करावा लागत आहे. रोवणी, चिखलणी, नांगरणी आदींचा वाढता खर्च शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागत असला तरी शेतकरी हा व्यवसाय अनेक वर्षांपासून टिकवून ठेवत आहे. निसर्गाच्या दुष्टचक्रात सापडलेल्या या व्यवसायातून शेतकऱ्यांना आर्थिक उन्नती साधण्यास मोठी अडचण जात आहे.

रोवणी कामासाठी मजूर एकरी ४ हजार रुपये प्रमाणे मजूर ठेका धरून रोवणी करीत आहेत यासाठी महिला मजूर सुद्धा याकामी चारपैसे अधिक मिळतील या आशेने सकाळी ७ वाजतापासून शेतात रोवणी काम करताना दिसून येत आहे. साधारण १० महिला मजूर एका दिवशी २ एकर रोवणी काम करीत असल्याची माहिती मजुरांनी दिली.

(बॉक्स)

सकाळी ६ वाजताच शेतात

काही शेतकरी रोवणी कामाला मजूर मिळत नसल्याने सकाळ पाळीत रोवणी काम करताना दिसून येत आहेत यासाठी मजूर सकाळी ६ वाजता शेतात जाऊन ८.३० वाजेपर्यंत काम करीत असतात. यासाठी १०० रुपये प्रति मजूर द्यावा लागत आहे तर दिवसभरासाठी २५० रुपये मजुरी मजुरांना दिली जात आहे. मजुरीचा दर वाढूनही रोवणी कामासाठी मजूर तुटवडा भासत आहे त्यामुळे रोवणी काम योग्य वेळी करण्यास शेतकऱ्यांना अडचणीचे होत आहे.

280721\1652-img-20210728-wa0112.jpg

शेतकऱ्यांना रोवणी कामाचा आर्थिक फटका फोटो