शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

वनालगत शेती कसणाऱ्यांना वाघांपासून धाेका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 05:00 IST

गडचिराेली जिल्ह्यातील जंगलात जवळपास ३० वर्षांपूर्वी वाघांचा वावर हाेता. यामध्ये प्रामुख्याने देसाईगंज, कुरखेडा, गडचिराेली, धानाेरा आदी तालुक्यांचा समावेश आहे. त्यानंतर जिल्ह्यातील जंगलात वाघ स्थायी हाेत नव्हते. हिवाळा व उन्हाळ्यात वास्तव्य केल्यानंतर पावसाळ्यापूर्वी पुन्हा चंद्रपूर जिल्ह्यात स्थलांतरित व्हायचे, परंतु गेल्या तीन वर्षांत वाघांचा वावर वाढला व ते स्थायी झाले. वडसा वनविभाग व गडचिराेली वनविभागातील धानाेरा तालुक्यातील चातगाव वनपरिक्षेत्रात वाघांचा वावर आहे.

ठळक मुद्देवनविभागाकडून इशारा : खरीप हंगामात हल्ले वाढण्याची शक्यता; अनेकांची शेती जंगलालगत

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : तालुक्यातील पाेर्ला वनपरिक्षेत्रात सर्वाधिक वाघांचा वावर आहे. तालुक्यातील बहुतांश शेती जंगलाला लागून असल्याने पावसाळ्यात शेती कसणाऱ्यांना वाघांपासून धाेका हाेण्याची शक्यता आहे. मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी पाेर्ला वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयातर्फे क्षेत्रातील ग्रामपंचायतींना पत्र पाठवून नागरिकांनी जंगलात जाऊ नये यासाठी दवंडीद्वारे सूचित करण्यास सांगितले आहे. तरीसुद्धा वनालगत शेती कसणारे शेतकरी जंगलाच्या परिसरातूनच जाणार आहेत. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना सर्वाधिक धाेका आहे.गडचिराेली जिल्ह्यातील जंगलात जवळपास ३० वर्षांपूर्वी वाघांचा वावर हाेता. यामध्ये प्रामुख्याने देसाईगंज, कुरखेडा, गडचिराेली, धानाेरा आदी तालुक्यांचा समावेश आहे. त्यानंतर जिल्ह्यातील जंगलात वाघ स्थायी हाेत नव्हते. हिवाळा व उन्हाळ्यात वास्तव्य केल्यानंतर पावसाळ्यापूर्वी पुन्हा चंद्रपूर जिल्ह्यात स्थलांतरित व्हायचे, परंतु गेल्या तीन वर्षांत वाघांचा वावर वाढला व ते स्थायी झाले. वडसा वनविभाग व गडचिराेली वनविभागातील धानाेरा तालुक्यातील चातगाव वनपरिक्षेत्रात वाघांचा वावर आहे. याशिवाय अहेरी, एटापल्ली तालुक्यातही वाघांचे दर्शन अनेकांना झाले आहे, परंतु गडचिराेली तालुक्यात वाघांची दहशत माेठ्या प्रमाणावर आहे.  ६ नाेव्हेंबर २०२० राेजी वाघाच्या हल्ल्यात राजगाटा चक येथील शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही पहिली घटना हाेती.  तर १८ मे राेजी दिभना येथील महिलेला वाघाने   ठार केले, ही शेवटची घटना घडली.  पहिल्या हल्ल्यानंतर या वनक्षेत्रात वाघांचे मानवावरील हल्ले वाढतच राहिले. आतापर्यंत ८ महिन्याच्या कालावधीत गडचिराेली तालुक्यातील सहा महिला व २ पुरुषांचा मृत्यू वाघांच्या हल्ल्यात झाला आहे. यामध्ये राजगाटा चक, इंदिरानगर, गाेगाव, धुंडेशिवणी, अडपल्ली, महादवाडी, कुऱ्हाडी व राजगाटा माल येथील महिला व पुरुषांचा समावेश आहे. तर दिभना व कुऱ्हाडी येथील पुरुष व कळमटाेला चक येथील एक महिला वाघाच्या हल्ल्यापासून बचावल्या. त्यांना वाघाने केवळ जखमी केले. पाेर्ला वनपरिक्षेत्रातील जंगल जवळपास १५ ते २० किमी चारही दिशांनी व्याप्त आहे. याशिवाय जंगलात वन्यप्राणी बऱ्याच प्रमाणात आहेत. डाेंगरदऱ्या व लहान ओढे असल्याने पाणी व त्यांना शिकार करता येईल, अशी भाैगाेलिक स्थिती आहे. त्यामुळे वनपरिक्षेत्रात वाघ स्थिरावले आहेत. तालुक्यातील बहुतांश गावातील शेती जंगलालगत आहे. त्यामुळे शेतकरी खरीप हंगामात शेती कसण्याकरिता जाणार आहेत. अशास्थितीत त्यांना वाघांपासून धाेका हाेण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, अस्वलींसह बिबट्यांचाही वावर पाेर्ला वनपरिक्षेत्रात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना धाेका हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

ग्रामपंचायतींना पाठविले पत्रपाेर्ला वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयाच्या वतीने पाेर्ला, चुरचुरा, सिर्सी, मरेगाव आदी क्षेत्रसहायक कार्यालयांतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतींना पत्र पाठवून नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी दवंडी देण्यास सूचित केले आहे. विशेष म्हणजे, चुरचुरा, महादवाडी, कुऱ्हाडी, अडपल्ली, गाेगाव, दिभना, राजगाटा, कळमटाेला, आंबेटाेला, आंबेशिवणी, देशपूर, कुरंझा, देलाेडा, धुंडेशिवणी मरेगाव, टेंभा, चांभार्डा, बाेथेडा, मुरमबाेडी आदी गावे जंगलाला लागून आहेत. सदर गावांच्या परिसरात वाघांचा वावर आहे. यापैकी पाेर्ला वनपरिक्षेत्रातील ग्रामपंचायतींना पत्र पाठविण्यात आले आहे.

 

टॅग्स :Tigerवाघagricultureशेती