शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
3
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
4
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
5
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
6
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
7
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
8
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
9
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
10
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
11
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
12
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
13
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
14
छत्रपतींच्या किल्ल्यांकडे पाहण्याची नजर आता बदलेल?
15
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
16
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
17
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
18
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
19
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
20
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर

बाेनसची रक्कम न मिळाल्याने शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:35 IST

२०२० ते २०२१ या सत्रात हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेऊन खरीप हंगाम पूर्ण करण्यात आला. दुष्काळाशी सामना करून शेतकऱ्यांनी ...

२०२० ते २०२१ या सत्रात हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेऊन खरीप हंगाम पूर्ण करण्यात आला. दुष्काळाशी सामना करून शेतकऱ्यांनी काही उत्पादन घेतले. शेतकऱ्याच्या शेतमालाची खरेदी-विक्री करण्यासाठी जिल्ह्यात आदिवासी महामंडळ, फेडरेशनमार्फत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात येऊन शेतकऱ्यांच्या शेतमालाची खरेदी करण्यात आली. डिसेंबर ते ३१ मार्चपर्यंत शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करण्यात आला. मात्र, अद्यापही बोनसची रक्कम मिळाली नाही. महाराष्ट्र शासनाने प्रतिक्विंटल धान खरेदीवर ७०० रुपये बोनस जाहीर केला आहे. ३१ मार्चपर्यंत धान खरेदी झाल्यानंतर सर्वसाधारणपणे एप्रिल महिन्यात बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत होती. मात्र, एप्रिल महिना लोटून गेला तरी शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेतच आहेत. सध्या कोरोना महामारी सुरू असल्यामुळे कामधंदे बंद पडून शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे आणि सरकारने शेतकऱ्यांची थट्टा चालविल्यामुळे यावर्षी बोनस मिळणार की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. आधीच शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात असून, शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांवर गदा येऊ न देता शासनाने गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्यांना बोनसची रक्कम तात्काळ द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.