शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
2
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
3
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
4
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
5
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी
6
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
7
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
8
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
9
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
10
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
11
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
12
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
13
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
14
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
15
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
16
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
17
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
18
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
19
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
20
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी

ठेंगणे, अरूंद पूल डोकेदुखीचेच

By admin | Updated: August 5, 2016 01:07 IST

ब्रिटीश काळात बांधलेला एकही पूल गडचिरोली जिल्ह्यात नसला तरी देशाच्या स्वातंत्र्यानंतर तयार करण्यात आलेला...

आष्टीच्या पुलाला झाले ५६ वर्ष : ग्रामीण भागाच्या दळणवळणाला पावसाळ्यात त्रास गडचिरोली : ब्रिटीश काळात बांधलेला एकही पूल गडचिरोली जिल्ह्यात नसला तरी देशाच्या स्वातंत्र्यानंतर तयार करण्यात आलेला चंद्रपूर-आलापल्ली मार्गावरील आष्टीचा पूल ठेंगणा व अरूंद असल्यामुळे या पुलावरून आजवर अनेकांचा वाहन कोसळून बळी गेला आहे. हा पूल आता कालबाह्यच झाला असल्याने नवीन पूल बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून आहे. गडचिरोली जिल्ह्यातील ठेंगणे व अरूंद पूल हे वाहतुकीसाठी ग्रामीण भागात नेहमीच अडचणीचे ठरलेले आहे. गडचिरोली जिल्ह्यात ८.३६ किमी लांबीचे प्रमुख जिल्हा मार्ग आहे. याशिवाय १०३५.५५ किमीचे राज्य महामार्ग आहेत. याशिवाय ८६१ किमी लांबीचे प्रमुख राज्य मार्ग आहेत. या मार्गावर २ हजार १८३ छोटे पूल असून ३३८ मध्यम व ४४ मोठे पूल आहेत. याशिवाय २५० मीटरपेक्षा अधिक लांबीचे सहा लाँगब्रिज असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रदीप खवले यांनी लोकमतशी बोलताना दिली. दरवर्षी प्री मान्सून व मान्सूननंतर या पुलाची तपासणी केली जाते व त्याचा अहवाल तयार केला जातो. जिल्ह्यातील सर्व पूल हे मागील २० ते २५ वर्षात तयार झालेले आहेत. त्यामुळे ते सुस्थितीत आहे. असे सार्वजनिक बांधकाम विभाग सांगत असला तरी भामरागड तालुक्यात पर्लकोटा नदीचा पूल, अहेरी-आष्टी मार्गावर दिना नदीचा पूल, गडचिरोली-नागपूर मार्गावर आरमोरी तालुक्यात गाढवी नदीचा पूल, आष्टी-चंद्रपूरला जोडणारा वैनगंगा नदीचा पूल तसेच वैरागड-मानापूर रस्त्यावरील वैलोचना नदीवरील पूल हे पूल ठेंगणे, अरूंद व जुने असल्याने या ठिकाणी वारंवार अपघात वाहन पुलावरून पडून होतात. मागील १० वर्षात १५ ते १८ लोकांचे बळी या अपघातात गेलेले आहेत. मात्र या पुलाची उंची वाढविण्याचे काम अजुनही झालेले नाही. दिना नदीवरील पुलामुळे अहेरी, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा तालुक्याच्या वाहतुकीचा मार्ग बंद होत असतो, गडअहेरी नाल्यावरचाही ठेंगणा पूल असल्याने दरवर्षी पावसाळ्यात हा मार्ग बंद होतो. त्यामुळे हे पूल उंच करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात ब्रिटीशकालीन एकही पूल नसला तरी जिल्ह्यातील नागपूर-आरमोरी मार्गावरील पुलावरूनही दररोज तीन ते साडेतीन हजार वाहनांचे आवागमन आहे. अशा अवस्थेतही सरकारी यंत्रणेचे पूल उंच करण्याच्या कामाकडे सातत्याने दुर्लक्ष आहे. (जिल्हा प्रतिनिधी) अप्रोच रस्ते वाहून जाऊ शकतात, मात्र पूल नाही! गडचिरोली जिल्ह्यात जुने व ठेंगणे पूल असले तरी ते वाहून जाण्याची शक्यता नाही. अनेकदा या पुलावर पुराचे पाणी दोन-दोन दिवस राहते. अशा स्थितीतही पुलाला काहीही होत नाही. ठेंगणे पूल हे नेहमीच अतिवृष्टीच्या परिस्थितीत धोकादायक नसतात. मात्र उंच पूल अशा स्थितीत नेहमीच धोकादायक ठरू शकतात. याच्या कमानीपर्यंत पाणी आल्यास या पुलाचे दगड खचून पूल वाहून जाण्याची शक्यता अधिक असते. गडचिरोली जिल्ह्यात मात्र माती मृदू असल्याने पुलाच्या बाजुला टाकलेल्या पिचिंग जवळील माती वाहून जाण्याच्या घटना घडलेल्या आहेत. अशा वेळी सर्वसामान्य नागरिक पूल वाहून गेला, असे समजतात. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील जुने पूल जरी असले तरी ते सर्वदृष्टीने सुरक्षित आहे. बऱ्याचवेळा पिचिंग जवळची माती वाहून जाऊ शकते, असे मत अधीक्षक अभियंता प्रदीप खवले यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.