शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
7
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
8
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
9
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
10
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
11
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
12
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
13
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
14
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
15
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
16
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
19
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
20
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?

देसाईगंज तालुक्यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:36 IST

देसाईगंज : संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना महामारीमुळे हाहाकार माजला असताना शहरात व तालुक्यात शासनाच्या मार्गदर्शक ...

देसाईगंज : संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना महामारीमुळे हाहाकार माजला असताना शहरात व तालुक्यात शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करताना दिसून येत नाही. सर्वसामान्यांवर कारवाईचा बडगा उगारणाऱ्या प्रशासनाला अद्याप जाग आली नसल्याने शहरात ठिकठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे.

व्यापारीदृष्ट्या देसाईगंज शहर हे तालुक्यातील अति महत्त्वाचे शहर आहे. तालुक्यासह लगतच्या जिल्ह्यातील नागरिक खरेदी, विक्रीच्या संबंधाने देसाईगंज शहरात अवागमन करीत आहेत. सध्या सर्वच व्यापार उद्दीम ज्या ठिकाणाहून चालओ. ते नागपूर शहर हे कोरोनाचे हॉटस्पाॅट ठरलेले आहे. दररोज त्या ठिकाणाहून भाजीपालापासून अनेक ट्रान्सपोर्टने माल देसाईगंजात पोहोचत आहे. शहरातील मोठी व्यापारी प्रतिष्ठाने, गुजरी बाजार, बसस्टॉप परिसर या ठिकाणी विद्यार्थीवर्गापासून, तर आबाल वृद्धापर्यंत तोबा गर्दी होताना दिसून येत आहे. विशेष बाब अशी की, या कालावधीत एखाद्याची मयत झाल्यासही २० पेक्षा अधिक नागरिकांना अंत्यविधीला उपस्थित राहता येणार नाही. लग्न संभारंभात ५० पेक्षा अधिक नागरिकांना भाग घेता येणार नाही. मास्कचा वापर केल्याशिवाय दुकानात प्रवेश घेता येणार नाही. खरेदी करताना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे अनिवार्य केले आहे. मात्र, देसाईगंज तालुक्यात नियम धाब्यावर बसवत लग्नकार्य, सामूहीक भोजनाचे कार्यक्रम, अंत्यविधीला शेकडो नागरिकांची उपस्थिती हे प्रकार सुरु आहेत. प्रशासकीय यंत्रणा मूग गिळून हे सगळे बघत आहे. जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाला मार्गदर्शक नियमावली देऊनही त्याची अमलबजावणी होताना दिसत नाही. नागरिक नियमांना बगल देत स्वैरपणे वागत असल्याने शहरासह तालुक्यात कोरोनाचा उद्रेक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे.