शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

काेराेनाकाळात पाणपोईकडे सामाजिक संस्थांचा कानाडोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:28 IST

दरवर्षी उन्हाळा सुरू होताच गावोगावी सार्वजनिक ठिकाणी सामाजिक संस्थांकडून पाणपोया सुरू केल्या जात होत्या. वाटसरूंची तृष्णा तृप्ती व्हावी, ...

दरवर्षी उन्हाळा सुरू होताच गावोगावी सार्वजनिक ठिकाणी सामाजिक संस्थांकडून पाणपोया सुरू केल्या जात होत्या. वाटसरूंची तृष्णा तृप्ती व्हावी, ही यामागची चांगली भावना होती म्हणूनच सार्वजनिक ठिकाणी प्याऊ लावताना दिसत होते. मात्र, गेल्या वर्षीपासून कोरोनाचा शिरकाव झाल्याने लॉकडाऊन, संचारबंदी आदींमुळे रहदारी, नागरिकांची संख्या कमी झाली आहे. मात्र, इतर कालावधीत नागरिकांची बसस्टॅण्ड, कार्यालये आदी ठिकाणी नागरिक ये-जा करत असतात. त्यावेळी नागरिकांना तहान भागविण्यासाठी पाणपोईची नितांत गरज असते. काही वेळा उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या असते, तरी पण पाणपोया लागायच्या. आता मात्र पाणपोया शहरासह तालुक्यात दिसेनाशा झाल्या आहेत. काही वेळा राजकारणी मंडळी फोटोसेशनपुरती पाणपोई सुरू करायचे, नंतर पाणपोईकडे दुर्लक्ष करायचे. असे अनेकदा घडले. कारण काय तर पाणपोईसाठी एक मजूर, माठ, ग्लास आदींचा खर्च येतो. यामुळे पाठ फिरवली जात आहे. सामाजिक भावनेतून पाणपोई लावणे आता लुप्त होत आहे. सार्वजनिक ठिकाणी असलेले हॉटेलसुद्धा बंद आहेत, त्यामुळे पाण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे.