शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
5
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
6
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
7
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
8
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
9
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
10
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
11
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
12
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
13
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
14
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
15
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
16
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
17
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
18
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
19
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
20
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर

शोषित, पीडितांनी संघटीत होण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2016 02:16 IST

जातीवादी व्यवस्थेला खतपाणी घालून काही लोक आपला स्वार्थ साधून घेत आहेत. त्यामुळे आदिवासी, दलित, बहुजन व इतर शोषित, पीडितांचे प्रश्न कायम आहेत.

मान्यवरांचा सूर : गडचिरोलीत बहुजनांच्या समस्यांवर विचारमंथनगडचिरोली : जातीवादी व्यवस्थेला खतपाणी घालून काही लोक आपला स्वार्थ साधून घेत आहेत. त्यामुळे आदिवासी, दलित, बहुजन व इतर शोषित, पीडितांचे प्रश्न कायम आहेत. शोषित, पीडितांना न्याय मिळण्यासाठी जातीवादी व्यवस्था नष्ट करून बहुजन समाजातील शोषित, पीडितांनी संघटीत व्हावे, असा सूर उपस्थित साहित्यीक व मान्यवरांनी काढला. आदिवासी साहित्य आणि संस्कृती संवर्धन संस्था बल्लारपूरच्या वतीने प्रा. डॉ. विनायक तुमराम लिखीत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर व आदिवासी चळवळ : चर्चा आणि चिंतन’ या वैचारिक ग्रंथाचा विमोचन समारंभ रविवारी येथील गोंडवाना कलादालनात पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत वाहरू सोनवने होते. विशेष अतिथी म्हणून कोर्ट चित्रपटाचे अभिनेते विरा साथीदार, नागपूर विद्यापीठाच्या हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. विणा दाढे तर प्रमुख अतिथी म्हणूून ज्येष्ठ पत्रकार रोहिदास राऊत, शिक्षक भारती संघटनेचे विभागीय अध्यक्ष प्राचार्य राजेंद्र झाडे, डॉ. विजय मेश्राम, प्रा. वसंत कन्नाके, प्रा. चंद्रशेखर बांबोळे, बी. डी. आडे, डॉ. पीतांबर कोडापे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रा. डॉ. विनायक तुमराम म्हणाले, आदिवासींचा स्वतंत्र धर्म आहे. अनेक धर्मियांनी आदिवासींना वाटेल तसे आपल्या धर्मात खेचून घेतले. अशा आदिवासींना एकसंघ धर्मात बांधण्याची गरज आहे. १६ नोव्हेंबर २०१६ रोजी गडचिरोलीनजीकच्या दिभना येथे आदिवासी धर्माची स्थापना करण्यात येणार असून या ठिकाणी आदिवासींना दीक्षा देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.वाहरू सोनवने म्हणाले, अतिप्राचीन काळापासून आदिवासी समाजाला नागविण्यात आले आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासींचा इतिहास अधोरेखीत करण्यात आला नाही. जाती, धर्मात तेढ निर्माण न करता सर्वत्र मानव धर्म स्थापन करण्याची गरज आहे, यातून वैैचारिक क्रांती घडल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी उपस्थित इतर मान्यवरांनी आदिवासी, दलित, शोषित, पीडित बहुजन समाजातील प्रश्नांवर आपले मत मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील कुमरे, संचालन प्रा. नरेंद्र आरेकर यांनी केले तर आभार वनिशाम येरमे यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)