शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शोषित, पीडितांनी संघटीत होण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2016 02:16 IST

जातीवादी व्यवस्थेला खतपाणी घालून काही लोक आपला स्वार्थ साधून घेत आहेत. त्यामुळे आदिवासी, दलित, बहुजन व इतर शोषित, पीडितांचे प्रश्न कायम आहेत.

मान्यवरांचा सूर : गडचिरोलीत बहुजनांच्या समस्यांवर विचारमंथनगडचिरोली : जातीवादी व्यवस्थेला खतपाणी घालून काही लोक आपला स्वार्थ साधून घेत आहेत. त्यामुळे आदिवासी, दलित, बहुजन व इतर शोषित, पीडितांचे प्रश्न कायम आहेत. शोषित, पीडितांना न्याय मिळण्यासाठी जातीवादी व्यवस्था नष्ट करून बहुजन समाजातील शोषित, पीडितांनी संघटीत व्हावे, असा सूर उपस्थित साहित्यीक व मान्यवरांनी काढला. आदिवासी साहित्य आणि संस्कृती संवर्धन संस्था बल्लारपूरच्या वतीने प्रा. डॉ. विनायक तुमराम लिखीत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर व आदिवासी चळवळ : चर्चा आणि चिंतन’ या वैचारिक ग्रंथाचा विमोचन समारंभ रविवारी येथील गोंडवाना कलादालनात पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत वाहरू सोनवने होते. विशेष अतिथी म्हणून कोर्ट चित्रपटाचे अभिनेते विरा साथीदार, नागपूर विद्यापीठाच्या हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. विणा दाढे तर प्रमुख अतिथी म्हणूून ज्येष्ठ पत्रकार रोहिदास राऊत, शिक्षक भारती संघटनेचे विभागीय अध्यक्ष प्राचार्य राजेंद्र झाडे, डॉ. विजय मेश्राम, प्रा. वसंत कन्नाके, प्रा. चंद्रशेखर बांबोळे, बी. डी. आडे, डॉ. पीतांबर कोडापे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रा. डॉ. विनायक तुमराम म्हणाले, आदिवासींचा स्वतंत्र धर्म आहे. अनेक धर्मियांनी आदिवासींना वाटेल तसे आपल्या धर्मात खेचून घेतले. अशा आदिवासींना एकसंघ धर्मात बांधण्याची गरज आहे. १६ नोव्हेंबर २०१६ रोजी गडचिरोलीनजीकच्या दिभना येथे आदिवासी धर्माची स्थापना करण्यात येणार असून या ठिकाणी आदिवासींना दीक्षा देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.वाहरू सोनवने म्हणाले, अतिप्राचीन काळापासून आदिवासी समाजाला नागविण्यात आले आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासींचा इतिहास अधोरेखीत करण्यात आला नाही. जाती, धर्मात तेढ निर्माण न करता सर्वत्र मानव धर्म स्थापन करण्याची गरज आहे, यातून वैैचारिक क्रांती घडल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी उपस्थित इतर मान्यवरांनी आदिवासी, दलित, शोषित, पीडित बहुजन समाजातील प्रश्नांवर आपले मत मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील कुमरे, संचालन प्रा. नरेंद्र आरेकर यांनी केले तर आभार वनिशाम येरमे यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)