शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
5
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
6
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
7
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
8
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
9
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
10
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
11
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
12
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
13
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
14
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
15
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
16
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
17
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
18
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
19
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
20
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!

मलेरिया नियंत्रणासाठी कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 23:14 IST

जंगलाचा प्रदेश असल्यामुळे डासजन्य आजारांसाठी प्रसिद्ध असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी मलेरियाचा प्रकोप टाळण्यासाठी जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी जानेवारी ते जून या सहा महिन्यात हिवतापाचे रुग्ण कमी झाले असले तरी भामरागड तालुक्यात एक बालक दगावल्याने हा विभाग अधिक सतर्क झाला आहे.

ठळक मुद्देसहा महिन्यांत ४३४ रुग्ण : गेल्यावर्षीपेक्षा स्थितीत सुधारणा, भामरागडात मात्र बालकाचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जंगलाचा प्रदेश असल्यामुळे डासजन्य आजारांसाठी प्रसिद्ध असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी मलेरियाचा प्रकोप टाळण्यासाठी जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी जानेवारी ते जून या सहा महिन्यात हिवतापाचे रुग्ण कमी झाले असले तरी भामरागड तालुक्यात एक बालक दगावल्याने हा विभाग अधिक सतर्क झाला आहे.गेल्यावर्षी जानेवारी ते जून २०१७ या दरम्यान २ लाख ३९ हजार ४०९ रुग्णांचे रक्तनमुने तपासण्यात आले. त्यापैकी १३३८ नमुन्यात मलेरिया आढळला. यावर्षी जानेवारी ते जून यादरम्यान २ लाख ३ हजार १७८ नमुने तपासण्यात आले. त्यापैकी केवळ ४३४ जणांना मलेरिया आढळला.पावसाळ्याला सुरूवात होताच डासांची उत्पत्ती वाढते. साचलेल्या पाण्यात डास अंडी टाकतात. नुकत्याच झालेल्या पावसानंतर ठिकठिकाणी डबकी साचली आहेत. या अस्वच्छ पाण्यात डेंग्युचा डास राहात नसला तरी हिवताप किंवा जपानी ज्वराच्या डासांची उत्पत्ती होऊ शकते. त्यामुळे जिल्ह्यात डासनाशक औषधांची फवारणी केली जात आहे. पण अनेक लोक फवारणीलाही विरोध करतात.हिवतापाचा प्रसार अ‍ॅनोफिलीस डासांच्या मादीमार्फत होतो. भात शेती, स्वच्छ पाण्याची डबकी, नदी, नाले, पाण्याच्या टाक्या, कालवे इत्यादीमध्ये हिवताप प्रसारक अ‍ॅनोफिलीस डासाची मादी अंडे देते. त्यामुळे डासांची पैदास वाढते. डास चावल्यानंतर निरोगी मनुष्याच्या शरीरात हे जंतू यकृतामध्ये जातात व त्यांची वाढ होऊन १० ते १२ दिवसांनी हिवतापाची लक्षणे दिसून येतात. डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून पाण्याच्या टाक्यांना झाकण बसवावे, असे हिवताप नियंत्रण विभागाने कळविले.६६ हंगामी कर्मचाऱ्यांची भरती होणारजिल्ह्यात मलेरियाचा प्रकोप झाल्यास पुरेसा औषधीसाठा उपलब्ध व्हावा म्हणून स्थानिक स्तरावरच औषधींची खरेदी आरोग्य प्रशासनाकडून केली जाणार आहे. त्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत औषध खरेदीची निविदा प्रक्रिया झाली आहे.जंगलालगतच्या गावांमध्ये डासांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे त्या गावांमध्ये डासनाशक फवारणी करण्यासाठी हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. ६६ कर्मचाºयांच्या भरतीला मंजुरी मिळाली असल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.कुणाल मोडक यांनी सांगितले.गेल्या दोन वर्षात जिल्ह्यातील हिवतापाचे रुग्ण आढळणाऱ्या गावांमध्ये प्रति दोन माणसांमिळून एक मच्छरदाणी वाटण्यात आली आहे. यावर्षी ज्या भागात मलेरियाचा प्रकोप दिसेल त्या भागात मच्छरदाण्यांचे वाटप होणार असून त्यासाठी ४१ हजार ७३२ मच्छरदाण्यात तयार आहेत.हिवतापाची लक्षणे आणि उपायथंडी वाजून ताप येणे, एक दिवसाआड ताप येणे, ताप आल्यानंतर घाम येऊन अंग गार पडणे, डोके दुखणे, उलट्या होणे आदी लक्षणे दिसून येतात. अशा लक्षणे दिसताच कोणतेही घरगुती इलाज न करता जवळच्या रुग्णालयात, आरोग्य केंद्रात घेऊन जावे.हिवतापदुषित डासांनी चावल्यानंतर १० दिवस ते चार आठवड्यात हिवतापाची लक्षणे दिसून येतात. संसर्गानंतर लवकरात लवकर सात दिवसात व उशीरात उशिरा एक वर्षापर्यंत हिवतापाची लक्षणे आढळतात. काही जंतू आपल्या यकृतामध्ये सुप्तावस्थेत राहतात. पोषक परिस्थिती निर्माण झाल्यानंतर लाल रक्तपेशींवर हल्ला करून आजाराची लागण होते.झोपताना हातपाय झाकले जातील अशा पायघोळ कपड्यांचा वापर करावा. डास प्रतिबंधक क्रीम वापरावे. झोपताना मच्छरदानीचा वापर करणे हा सर्वाधिक चांगला उपाय आहे,अधिकाऱ्यांना खटारा वाहनजिल्हा हिवताप नियंत्रण अधिकाऱ्यांना जिल्हाभर फिरण्यासाठी खटारा वाहन उपलब्ध आहे. चांगले वाहन मिळाल्यास अधिक चांगले काम होऊ शकेल असे ते सांगतात.