शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मलेरिया नियंत्रणासाठी कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 23:14 IST

जंगलाचा प्रदेश असल्यामुळे डासजन्य आजारांसाठी प्रसिद्ध असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी मलेरियाचा प्रकोप टाळण्यासाठी जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी जानेवारी ते जून या सहा महिन्यात हिवतापाचे रुग्ण कमी झाले असले तरी भामरागड तालुक्यात एक बालक दगावल्याने हा विभाग अधिक सतर्क झाला आहे.

ठळक मुद्देसहा महिन्यांत ४३४ रुग्ण : गेल्यावर्षीपेक्षा स्थितीत सुधारणा, भामरागडात मात्र बालकाचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जंगलाचा प्रदेश असल्यामुळे डासजन्य आजारांसाठी प्रसिद्ध असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी मलेरियाचा प्रकोप टाळण्यासाठी जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी जानेवारी ते जून या सहा महिन्यात हिवतापाचे रुग्ण कमी झाले असले तरी भामरागड तालुक्यात एक बालक दगावल्याने हा विभाग अधिक सतर्क झाला आहे.गेल्यावर्षी जानेवारी ते जून २०१७ या दरम्यान २ लाख ३९ हजार ४०९ रुग्णांचे रक्तनमुने तपासण्यात आले. त्यापैकी १३३८ नमुन्यात मलेरिया आढळला. यावर्षी जानेवारी ते जून यादरम्यान २ लाख ३ हजार १७८ नमुने तपासण्यात आले. त्यापैकी केवळ ४३४ जणांना मलेरिया आढळला.पावसाळ्याला सुरूवात होताच डासांची उत्पत्ती वाढते. साचलेल्या पाण्यात डास अंडी टाकतात. नुकत्याच झालेल्या पावसानंतर ठिकठिकाणी डबकी साचली आहेत. या अस्वच्छ पाण्यात डेंग्युचा डास राहात नसला तरी हिवताप किंवा जपानी ज्वराच्या डासांची उत्पत्ती होऊ शकते. त्यामुळे जिल्ह्यात डासनाशक औषधांची फवारणी केली जात आहे. पण अनेक लोक फवारणीलाही विरोध करतात.हिवतापाचा प्रसार अ‍ॅनोफिलीस डासांच्या मादीमार्फत होतो. भात शेती, स्वच्छ पाण्याची डबकी, नदी, नाले, पाण्याच्या टाक्या, कालवे इत्यादीमध्ये हिवताप प्रसारक अ‍ॅनोफिलीस डासाची मादी अंडे देते. त्यामुळे डासांची पैदास वाढते. डास चावल्यानंतर निरोगी मनुष्याच्या शरीरात हे जंतू यकृतामध्ये जातात व त्यांची वाढ होऊन १० ते १२ दिवसांनी हिवतापाची लक्षणे दिसून येतात. डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून पाण्याच्या टाक्यांना झाकण बसवावे, असे हिवताप नियंत्रण विभागाने कळविले.६६ हंगामी कर्मचाऱ्यांची भरती होणारजिल्ह्यात मलेरियाचा प्रकोप झाल्यास पुरेसा औषधीसाठा उपलब्ध व्हावा म्हणून स्थानिक स्तरावरच औषधींची खरेदी आरोग्य प्रशासनाकडून केली जाणार आहे. त्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत औषध खरेदीची निविदा प्रक्रिया झाली आहे.जंगलालगतच्या गावांमध्ये डासांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे त्या गावांमध्ये डासनाशक फवारणी करण्यासाठी हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. ६६ कर्मचाºयांच्या भरतीला मंजुरी मिळाली असल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.कुणाल मोडक यांनी सांगितले.गेल्या दोन वर्षात जिल्ह्यातील हिवतापाचे रुग्ण आढळणाऱ्या गावांमध्ये प्रति दोन माणसांमिळून एक मच्छरदाणी वाटण्यात आली आहे. यावर्षी ज्या भागात मलेरियाचा प्रकोप दिसेल त्या भागात मच्छरदाण्यांचे वाटप होणार असून त्यासाठी ४१ हजार ७३२ मच्छरदाण्यात तयार आहेत.हिवतापाची लक्षणे आणि उपायथंडी वाजून ताप येणे, एक दिवसाआड ताप येणे, ताप आल्यानंतर घाम येऊन अंग गार पडणे, डोके दुखणे, उलट्या होणे आदी लक्षणे दिसून येतात. अशा लक्षणे दिसताच कोणतेही घरगुती इलाज न करता जवळच्या रुग्णालयात, आरोग्य केंद्रात घेऊन जावे.हिवतापदुषित डासांनी चावल्यानंतर १० दिवस ते चार आठवड्यात हिवतापाची लक्षणे दिसून येतात. संसर्गानंतर लवकरात लवकर सात दिवसात व उशीरात उशिरा एक वर्षापर्यंत हिवतापाची लक्षणे आढळतात. काही जंतू आपल्या यकृतामध्ये सुप्तावस्थेत राहतात. पोषक परिस्थिती निर्माण झाल्यानंतर लाल रक्तपेशींवर हल्ला करून आजाराची लागण होते.झोपताना हातपाय झाकले जातील अशा पायघोळ कपड्यांचा वापर करावा. डास प्रतिबंधक क्रीम वापरावे. झोपताना मच्छरदानीचा वापर करणे हा सर्वाधिक चांगला उपाय आहे,अधिकाऱ्यांना खटारा वाहनजिल्हा हिवताप नियंत्रण अधिकाऱ्यांना जिल्हाभर फिरण्यासाठी खटारा वाहन उपलब्ध आहे. चांगले वाहन मिळाल्यास अधिक चांगले काम होऊ शकेल असे ते सांगतात.