शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

एटापल्लीत रानभाज्या महोत्सव उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:42 IST

या महोत्सवाचे उद्‌घाटन पंचायत समितीचे उपसभापती जनार्दन नल्लावार, तहसीलदार प्रदीप शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी डॉ. ...

या महोत्सवाचे उद्‌घाटन पंचायत समितीचे उपसभापती जनार्दन नल्लावार, तहसीलदार प्रदीप शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर गव्हाणे, तालुका कृषी अधिकारी संजयकुमार गायकवाड, दौलतराव दहागावकर, रवी रामगुंडेवार, लक्ष्मण नरोटी, रामजी कत्तीवार, अभय पुण्यमूर्तिवार उपस्थित हाेते.

नैसर्गिकरीत्या जंगलात तसेच शेतामध्ये उगवलेल्या विषमुक्त रानभाज्या निसर्गाची अपूर्व भेट असून, रानभाज्या, कंद व पालेभाज्यांचा समावेश नागरिकांनी रोजच्या आहारामध्ये करावा. यामुळे शरीराला पोषणमूल्य मिळून प्रतिकारशक्ती वाढविण्यास उपयुक्त आहे, असे प्रतिपादन तहसीलदार प्रदीप शेवाळे यांनी यावेळी केले. तालुका कृषी अधिकारी संजयकुमार गायकवाड यांनी महोत्सवाचे महत्त्व उपस्थितांना विशद करून सांगितले. तसेच उपस्थित मान्यवरांनी शेतकरी गटामार्फत जंगलातील रानभाज्या शहरी भागापर्यंत पोहोचवून विक्रीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

यावेळी शेतकरी गटांनी विविध प्रकारच्या ३० रानभाज्या प्रदर्शनी व विक्रीसाठी ठेवल्या होत्या. याकरिता महोत्सवात सहभागी गटांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एच. के. राऊत यांनी केले. आभार अरविंद भरडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तंत्रज्ञान व्यवस्थापक समीर पेदापल्लीवार, तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील सर्व कार्यालयीन व क्षेत्रीय कर्मचारी तसेच उमेदच्या वंदना गावडे, हर्षा कुमरे यांनी सहकार्य केले.