शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

चामाेर्शी तालुक्यात कृषी संशाेधन केंद्र स्थापन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:37 IST

जिल्हा विकासाचा आराखडा तयार करताना जिल्हा मुख्यालयाला केंद्रस्थानी ठेवून निर्णय घेतले जातात. त्यामुळे विद्यापीठ असो वा शासकीय महाविद्यालये, अभियांत्रिकी ...

जिल्हा विकासाचा आराखडा तयार करताना जिल्हा मुख्यालयाला केंद्रस्थानी ठेवून निर्णय घेतले जातात. त्यामुळे विद्यापीठ असो वा शासकीय महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये, वैद्यकीय महाविद्यालये, कृषी महाविद्यालये, राष्ट्रीय संस्था, संशोधन संस्था, महत्त्वाची कार्यालये ही जिल्हा मुख्यालयातच स्थापन केली जातात. त्यामुळे विकासात्मक संस्था जरी जिल्ह्यात स्थापन झाल्या तरी तालुका मुख्यालये प्रत्यक्ष विकासापासून दूरच असतात. एक महाविद्यालय वा संस्था स्थापन झाल्यानंतर त्याचा फायदा संपूर्ण जिल्ह्याला जरी झाला तरी त्यापासून निर्माण होणाऱ्या अप्रत्यक्ष रोजगाराच्या फायदा फक्त जिल्हा मुख्यालयालाच होताे. अशा प्रकारे सर्वच महाविद्यालये वा संस्था एकाच ठिकाणी निर्माण होत असल्यामुळे जिल्हा मुख्यालयाचा विकास होतो व उर्वरित तालुकास्थळे विकासापासून मागासच राहतात. शिवाय रोजगाराकरिता लोकांचा ओढा जिल्हा ठिकाणी वाढतो. त्यातून नागरीकरणाची समस्या निर्माण होते व अतिरिक्त लोकसंख्येचा भार सहन करावा लागतो. त्यामुळे मूलभूत सोयीसुविधा तोकडी पडते. चामोर्शी तालुका कृषिप्रधान तालुका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मार्गदर्शन व संशाेधनासाठी कृषी संशोधन संस्था शासनाने तालुक्यात स्थापन करावी, अशी मागणी विवेक सहारे यांनी केली.

बाॅक्स

चामाेर्शीत वैद्यकीय महाविद्यालय निर्माण करा

आरोग्याच्या दृष्टीने गडचिरोलीनंतर पर्यायी वैद्यकीय केंद्र म्हणून चामोर्शी तालुक्याला विकसित करण्याची आवश्यकता आहे. शासनाच्या नवीन धोरणानुसार जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालये चामाेर्शी तालुक्यात निर्माण करावी. वैनगंगा नदीवरील चिचडोह बॅरेजचा उपयोग फक्त प्रेक्षणीय स्थळ वा सहलीचे ठिकाण इतक्यापुरतेच मर्यादित न ठेवता चामोर्शी तालुक्यातच नव्हे तर इतरही तालुक्यांना बॅरेजचे पाणी उपलब्ध करावे. वैनगंगा नदीतील पाण्याचा उपयाेग शेतीवर आधारित उद्याेगांसाठी करता येईल काय, याचाही अभ्यास करावा, असे सहारे यांनी म्हटले आहे.