शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

महामारीत हजाराे लाेकांचे पाेट भरले; अनुदानाअभावी शिवभाेजन केंद्रचालक उपाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:24 IST

गडचिराेली : लाॅकडाऊनच्या कालावधीत शिवभाेजन केंद्रांनी हजाराे नागरिकांच्या पाेटाची भूक शांत केली आहे. मात्र, मागील तीन महिन्यांपासून अनुदान मिळाले ...

गडचिराेली : लाॅकडाऊनच्या कालावधीत शिवभाेजन केंद्रांनी हजाराे नागरिकांच्या पाेटाची भूक शांत केली आहे. मात्र, मागील तीन महिन्यांपासून अनुदान मिळाले नसल्याने शिवभाेजन केंद्र चालक अडचणीत आले आहेत.

शहरात आलेल्या नागरिकाला कमी खर्चात जेवणाची व्यवस्था व्हावी, यासाठी राज्य शासनाने शिवभाेजन केंद्र सुरू केले आहे. गडचिराेली जिल्ह्यात बाराही तालुक्यांमध्ये हे केंद्र सुरू आहेत. काेराेना काळात अगदी माेफत शिवभाेजन थाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. सद्य:स्थितीत तालुकास्तरावर ११० व जिल्हास्तरावर ३०० शिवभाेजन थाळ्या अगदी माेफत दिल्या जात आहेत. यावर शासन संबंधित केंद्रचालकाला अनुदान देते. मात्र, मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांचे अनुदान थकले आहे, तसेच जून महिनासुद्धा आता संपण्याच्या मार्गावर आहे. दर महिन्याचा जेवणाचा खर्च लाखाे रुपयांचा आहे. मात्र, अनुदान मिळाले नसल्याने हा लाखाे रुपयांचा खर्च कसा करावा, असा प्रश्न केंद्रचालक बचत गटांसमाेर निर्माण झाला आहे. आणखी काही दिवस अनुदान मिळाले नाही तर केंद्र चालविणे कठीण हाेईल, अशी प्रतिक्रिया जिल्हाभरातील केंद्रचालकांनी दिली आहे.

बाॅक्स ....

प्रती थाळी ५० रुपये अनुदान

गडचिराेली शहरात एकच केंद्र आहे. या केंद्राला सद्य:स्थितीत प्रति दिवस ३०० थाळी एवढ्या शिवभाेजन वितरणाची मर्यादा दिली आहे. १० रुपयात शिवभाेजन द्यायचे आहे. मात्र, सध्या काेराेनामुळे माेफत शिवभाेजन दिले जात आहे. शासन प्रत्येक थाळीवर केंद्र चालविणाऱ्या बचत गटाला ५० रुपयांचे अनुदान देते. भाजीपाला, किराणा, मजुरांची मजुरी, खाेलीचा भाडे या बाबींवरील खर्च लक्षात घेतला तर प्रती थाळी अनुदान वाढविण्याची गरज आहे.

बाॅक्स ......

अनुदान रखडले; थाळी संख्या घटली

- गडचिराेली शहरात एकच केंद्र आहे. या केंद्राला दरदिवशी केवळ २०० थाळी वितरणाची मर्यादा दिली आहे. गडचिराेली हे जिल्हास्थळ असल्याने ग्रामीण भागातील अनेक नागरिक या ठिकाणी येत असतात. त्यामुळे थाळींची संख्या वाढवून देण्याची गरज आहे.

- सध्या काेराेनामुळे गडचिराेली शहरातील केंद्राला २०० ऐवजी ३०० थाळी वितरणाची मर्यादा दिली आहे. मात्र, एवढ्या थाळी २ वाजताच संपतात. २०० थाळी तर १२ वाजताच संपण्याची शक्यता आहे.

- तीन महिन्यांपासून अनुदान रखडल्याने केंद्रचालक अडचणीत आले आहेत. शासनाने केंद्र चालविणाऱ्या बचत गटांना अनुदान देण्याची गरज आहे.

बाॅक्स .....

काेट ...

केंद्र चालविणे झाले कठीण

दर दिवशीचा भाजीपाला, किराणा, मजुरांची मजुरी, गॅस, घरभाडे यावर महिन्याला लाखाे रुपये खर्च हाेतात. पूर्वी प्रत्येक नागरिकाकडून १० रुपये घेण्याची परवानगी हाेती. त्यामुळे थाेडेफार पैसे गाेळा हाेत हाेते. आता मात्र शासनाच्या आदेशानुसार माेफत जेवण उपलब्ध करून द्यायचे आहे. त्यामुळे एकही पैसा मिळत नाही. अशातच अनुदान मिळत नसल्याने केंद्र चालविणे कठीण झाले आहे. - उमा बन्साेड, शिवभाेजन केंद्रचालक, गडचिराेली.

बाॅक्स ...

काेट.....

शिवभाेजन केंद्रावरील थाळ्या व वेळ वाढविण्याची गरज

गडचिराेली येथील शिवभाेजन केंद्रावरील जेवण चांगले राहते, तसेच बाजूला टेबल, खुर्च्या ठेवल्या आहेत. यावर बसून आरामदायीपणे जेवण करता येते. शासनाच्या आदेशानुसार केंद्र सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहते. मात्र, बऱ्याचवेळा थाळींची मर्यादा संपल्याने जेवण मिळत नाही. शासनाने थाळींची संख्या वाढवून देण्याची गरज आहे. - संजय कुसनाके, लाभार्थी.

काेट ......

गडचिराेलीचे शिवभाेजन केंद्र मुख्य चाैकात आहे. येथून जिल्हा रुग्णालय तीन किमी अंतरावर आहे. जिल्हा रुग्णालयात ग्रामीण भागातील अनेक रुग्ण भरती राहतात. त्यांच्या नातेवाइकांना जेवणाची गरज राहते. मात्र, या परिसरात शिवभाेजन केंद्र नाही, तसेच सायंकाळीसुद्धा जेवणाची गरज राहत असल्याने रात्री ८ वाजेपर्यंत शिवभाेजन केंद्र सुरू असणे गरजेचे आहे. - प्रशांत उंदीरवाडे, लाभार्थी.