गडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत ५० टक्के ग्राम पंचायत व ५० टक्के यंत्रणा स्तरावर जिल्ह्यात ४६७ ग्राम पंचायतीमध्ये रोजगार हमी योजनेची ६३४ कामे सुरू आहेत. त्यातून जिल्ह्यातील ३३ हजार १२० मजुरांना रोजगार मिळाला आहे. सुरू असलेल्या ६३४ रोहयोच्या कामांमध्ये रस्त्यांची ८४, बोळीची ३१, मजगी २९१, शेततळी ९, सिंचन विहिर २६, वृक्षलागवड ८१, राजीव गांधी सेवा केंद्राचे ७, माजी मालगुजारी तलाव २, सिमेंट बंधारा १, भात खाचर १ इतर ३ व शौचालय बांधकामाचे ९८ कामे बाराही तालुक्यात सुरू आहेत. रस्त्याच्या कामावर ९ हजार २४, बोळीच्या कामावर १ हजार ३१६, मजगीच्या कामावर १५ हजार २६४, शेततळ्याच्या कामावर २४०, सिंचन विहिरीच्या कामावर ३०१, वृक्ष लागवडीच्या कामावर ७३१, राजीव गांधी सेवा केंद्राच्या कामावर ८५, माजी मालगुजारी तलावाच्या कामावर १६७, सिमेंट बंधाऱ्याच्या कामावर ६०६, भात खाचराच्या कामावर ३८, शौचालयाच्या बांधकामावर १४३ व इतर कामावर २० मजूर काम करीत असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे. जिल्ह्यात ५० टक्के ग्रामपंचायत व ५० टक्के यंत्रणा स्तरावरील मिळून रोजगार हमी योजनेची सध्य:स्थितीत गडचिरोली तालुक्यात ५०, धानोरा तालुक्यात १३६, चामोर्शीत १७६, मुलचेरा ८३, देसाईगंज ५६, आरमोरी ४८, कुरखेडा ५९, कोरची १००, अहेरी १७३, एटापल्ली ९, भामरागड तालुक्यात २८ व सिरोंचा तालुक्यात २० कामे सुरू आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)
९३८ कामांमधून ३३ हजार मजुरांना रोजगार
By admin | Updated: February 2, 2015 23:05 IST