शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
6
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
8
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
9
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
10
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
11
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
12
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
13
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
14
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
15
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
16
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
17
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
18
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
19
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
20
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला

योग्य वापराने होईल विजेची बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:20 IST

उन्हाची तिव्रता वाढण्याबरोबरच एसी, कुलर, वॉटर कुलर, फ्रिज आदी साधनांचा वापर वाढत चालला आहे. या साधनांच्या वापरामुळे वीज मोठ्या प्रमाणात खर्च होते. तरीही या साधनांचा योग्य वापर केल्यास विजेची बचत शक्य आहे.

ठळक मुद्देमहावितरणचा सल्ला : विजेच्या अपव्ययामुळे निर्माण होते पाणीटंचाई; प्रमाणित उपकरणेच वापरा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : उन्हाची तिव्रता वाढण्याबरोबरच एसी, कुलर, वॉटर कुलर, फ्रिज आदी साधनांचा वापर वाढत चालला आहे. या साधनांच्या वापरामुळे वीज मोठ्या प्रमाणात खर्च होते. तरीही या साधनांचा योग्य वापर केल्यास विजेची बचत शक्य आहे. विजेचा वापर कमी झाल्यास भरमसाठ बिल आल्याची ओरडही कमी होण्यास मदत होईल.नियोजन न केल्यास काही गोष्टींची तूट मोठ्या प्रमाणात भासते. त्यामुळे विकासालाच नव्हे तर साध्या दैनंदिन व्यवहारालाही खीळ बसू शकते. अशा दोन गोष्टी म्हणजे वीज व पाणी. वीज निर्माण करताना पावसाच्या पाण्याचे संचय करून त्याला वाहते करावे लागते. या दोन्हीमध्ये त्यांचा योग्य वापर हीच त्यांची निर्मिती होत असते. जर अती वापर झाल्यास पाण्याची भीषण टंचाई निर्माण होते म्हणून पाणी व विजेचा वापर हा योग्यच व्हायला पाहिजे. याची समज प्रत्येकाला होणे गरजेचे आहे. वीजेचा वापर करण्याकरिता साहित्य, उपकरणे यांची निवड करताना त्यांचा दर्जा व चांगल्या कंपनीची आहे किंवा नाही हे तपासलेच पाहिजे. या कामासाठी विजेसंबंधीची कामे तज्ज्ञांकडून करून घेतली पाहिजेत.कित्येक खेडेगावात आजही विजेची सुविधा उपलब्ध झाली नाही. त्या गावांना आजही अंधारात जीवन जगावे लागत आहे. शहरी भागात राहणारी मंडळी बऱ्याचदा विजेचा अपव्यय करतात. तो अपव्यय कमी केला आणि वीजेची बचत केली तर अंधारात जीवन जगणाºयांनासुद्धा वीज मिळेल. वीज साठवून ठेवण्याच्या यंत्रणा महागड्या आहेत. विजेचे उत्पादन व वहन यासाठी लाखो मीटरच्या वाहिन्यांचे जाळे आणि उपकेंद्र निर्माण करावी लागतात. ज्या धातूमधून वीज वाहून नेली जाते त्या धातूमुळे काही प्रमाणात विजेची घट होते. याचाच अर्थ असा की, विजेचे वहन होत असताना, काही प्रमाणात वीज वाया जाते. यासाठी सगळ्यांनी विजेचा योग्य वापर केला तर विजेची बचत होईल.घरात विजेचा वापर करताना आयएसआय प्रमाणित तारांचा तसेच ऊर्जा बचतीचे प्रमाणपत्र लाभलेल्या उपकरणांचाच वापर करावा. भारतात सूर्यप्रकाशाचे प्रमाण भरपूर आहे. त्यामुळे सूर्य प्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करता येईल. विजेची उपकरणे स्वच्छ असतील तर जास्त ऊर्जा मिळेल आणि विजेचा वापर कमी होईल. इस्त्रीची निवड करताना, आॅटोमॅटिक इस्त्री खरेदी करावी. जेणेकरून विशिष्ट तापमानाला इस्त्री बंद होईल.कित्येक जण सायंकाळी दिवे लावतात आणि गरज नसतानासुद्धा रात्रभर ते चालू असतात. ज्या खोलीत कमी वावर असेल किंवा कोणीही नसेल त्या खोलीचे दिवे बंद करावेत. अनावश्यक दिवे गरज नसल्यास बंद करावेत. अनेक ठिकाणी विद्युतपंपाने टाकीत पाणी चढवावे लागते. बºयाचदा टाकी भरून वाहत असतानासुद्धा विद्युतपंप बंद केला जात नाही. यामुळे पाण्याचा आणि विजेचा अपव्यय होतो. यासाठी बाजारात स्वयंचलित यंत्रणा उपलब्ध आहे. या यंत्रणेत पाण्याची टाकी भरली की विद्युतपंप बंद होतो. या यंत्रणेचा वापर केला तर हजारो युनीट वीज सहज वाचेल. वॉशिंग मशीन, ओव्हन, रोटीमेकर यांसारख्या वस्तू वापरताना टायमरचा वापर करावा.फ्रिज नियमितपणे डिफ्रॉस्ट कराफ्रिजमधून वस्तू काढताना आवश्यक वस्तू एकदाच काढाव्यात, फ्रिज वारंवार उघडू नये. सतत फ्रिज उघडल्याने फ्रिजचे तापमान बिघडून वीजेचा वापर वाढतो. ज्या फ्रिजमध्ये डीफ्रॉस्टची सुविधा आहे, तो फ्रिज नियमितपणे डिफ्रॉस्ट करावेत, बर्फ जमा झाल्यास मोटर चालू ठेवण्यासाठी फ्रीजला जास्त ऊर्जा लागते. रेफ्रिजरेटर आणि भिंत यांच्यामधे पुरेशी जागा ठेवावी, जेणेकरून रेफ्रिजरेटरच्या भोवती हवा सहजपणे खेळती राहील. रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेले पदार्थ झाकून ठेवावेत. झाकण न ठेवल्यामुळे अन्नातील बाष्प उडून जाते आणि कॉम्प्रेसरला अधिक काम करावे लागते.उपकरणे मेन स्वीचवरून बंद कराएसी, टीव्ही रिमोटने बंद केले जातात, पण त्याचा मेन स्विच बंद करण्यासाठी आळस केला जातो. असे न करता रिमोटने टीव्ही, एसी बंद केल्यानंतर लगेचच मेन स्विच बंद करावा. काही जण एकदा एसी बसवल्यानंतर तो खराब होईपर्यंत त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. एसीकडे दुर्लक्ष न करता दर महिन्याला एसीचा फिल्टर तपासून स्वच्छ करावा. यामुळे थंडावा वाढेल आणि विजेचा वापर कमी होईल. एसीची सर्व्हिसिंग वेळोवेळी करावी, प्रमाणित दर्जाचा एसी खरेदी केल्यास सदर एसीला विजेचा वापर कमी लागतो.