शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी अपघात विमा याेजनेची प्रभावी अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:37 IST

गडचिराेली : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना याेजनेंतर्गत गडचिराेली तालुक्यासह जिल्हाभरात दाखल केलेल्या प्रस्तावांपैकी अर्धेअधिक प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत ...

गडचिराेली : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना याेजनेंतर्गत गडचिराेली तालुक्यासह जिल्हाभरात दाखल केलेल्या प्रस्तावांपैकी अर्धेअधिक प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती आहे. या याेजनेत किचकट अटी समाविष्ट करण्यात आल्या असून, मंजुरीची प्रक्रियाही दिरंगाईची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठीची ही अपघात विमा याेजना केवळ मृगजळ ठरत आहे.

शासनाच्या वतीने शेतकरी कुटुंबाला आधार देण्यासाठी सन २००५-०६ पासून शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू अथवा अपंगत्व आल्यास शेतकरी अपघात विमा योजना सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, या योजनेचे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना असे नामकरण करण्यात आले. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कृषी विभागाकडे प्रस्ताव दाखल करावा लागतो. मात्र योजनेसाठी ढीगभर कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागते तसेच विमा कंपनीकडून सातत्याने त्रुटी काढण्यात येत असल्याने अनेक प्रस्ताव प्रलंबित राहत आहेत.

किचकट प्रणालीमुळे या योजनेचा लाभ मिळत नसल्याचे दिसून येत आहे. शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात अशा अपघातग्रस्त राज्यातील सर्व वहितीधारक शेतकरी व शेतकऱ्याच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेला एक सदस्य अशा दोन जणांना या योजनेचा लाभ दिला जातो. विम्यासाठी वारसा हक्क प्रपत्र क व व्हिसेरा ही महत्त्वपूर्ण बाब आहे. परंतु ही प्रमाणपत्रे सहा-सहा महिने मिळत नाही. त्यामुळे साहजिकच प्रस्ताव सादर करण्यास व तो मंजूर करण्यास विलंब होतो. योजनेचा लाभ घेण्यासाठी विविध कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. त्यात दमछाक होते. त्यामुळे अनेक कुटुंब या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे येत नसल्याचे दिसून येते.

बाॅक्स...

..अशी आहे देय मदत

गाेपीनाथ मुंडे शेतकरी याेजनेंतर्गत शेतकऱ्याचा अपघातात मृत्यू झाल्यास अथवा दोन डोळे अथवा दोन हात अथवा दोन पाय अथवा एकाच वेळी एक हात, एक पाय, एक डोळा निकामी झालेल्या शेतकऱ्यांना दाेन लाखांची मदत देण्यात येते. तसेच एक डोळा, एक हात अथवा एक पाय निकामी झाल्यास एक लाख रुपये मदत दिली जाते.