शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

शेतकरी अपघात विमा याेजनेची प्रभावी अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:37 IST

गडचिराेली : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना याेजनेंतर्गत गडचिराेली तालुक्यासह जिल्हाभरात दाखल केलेल्या प्रस्तावांपैकी अर्धेअधिक प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत ...

गडचिराेली : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना याेजनेंतर्गत गडचिराेली तालुक्यासह जिल्हाभरात दाखल केलेल्या प्रस्तावांपैकी अर्धेअधिक प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती आहे. या याेजनेत किचकट अटी समाविष्ट करण्यात आल्या असून, मंजुरीची प्रक्रियाही दिरंगाईची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठीची ही अपघात विमा याेजना केवळ मृगजळ ठरत आहे.

शासनाच्या वतीने शेतकरी कुटुंबाला आधार देण्यासाठी सन २००५-०६ पासून शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू अथवा अपंगत्व आल्यास शेतकरी अपघात विमा योजना सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, या योजनेचे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना असे नामकरण करण्यात आले. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कृषी विभागाकडे प्रस्ताव दाखल करावा लागतो. मात्र योजनेसाठी ढीगभर कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागते तसेच विमा कंपनीकडून सातत्याने त्रुटी काढण्यात येत असल्याने अनेक प्रस्ताव प्रलंबित राहत आहेत.

किचकट प्रणालीमुळे या योजनेचा लाभ मिळत नसल्याचे दिसून येत आहे. शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात अशा अपघातग्रस्त राज्यातील सर्व वहितीधारक शेतकरी व शेतकऱ्याच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेला एक सदस्य अशा दोन जणांना या योजनेचा लाभ दिला जातो. विम्यासाठी वारसा हक्क प्रपत्र क व व्हिसेरा ही महत्त्वपूर्ण बाब आहे. परंतु ही प्रमाणपत्रे सहा-सहा महिने मिळत नाही. त्यामुळे साहजिकच प्रस्ताव सादर करण्यास व तो मंजूर करण्यास विलंब होतो. योजनेचा लाभ घेण्यासाठी विविध कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. त्यात दमछाक होते. त्यामुळे अनेक कुटुंब या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे येत नसल्याचे दिसून येते.

बाॅक्स...

..अशी आहे देय मदत

गाेपीनाथ मुंडे शेतकरी याेजनेंतर्गत शेतकऱ्याचा अपघातात मृत्यू झाल्यास अथवा दोन डोळे अथवा दोन हात अथवा दोन पाय अथवा एकाच वेळी एक हात, एक पाय, एक डोळा निकामी झालेल्या शेतकऱ्यांना दाेन लाखांची मदत देण्यात येते. तसेच एक डोळा, एक हात अथवा एक पाय निकामी झाल्यास एक लाख रुपये मदत दिली जाते.