शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
7
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
8
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
9
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
10
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
11
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
12
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
13
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
14
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
15
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
16
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
17
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
18
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
19
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
20
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल

खाद्यतेलाने महागाईत ‘तेल’ ओतले, ७० रुपयांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:33 IST

गडचिराेली : काेराेना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनमुळे तेलाच्या कंपन्या तीन ते चार महिने बंद हाेत्या. काेराेना लाॅकडाऊनपासून खाद्यतेलाचे भाव सतत ...

गडचिराेली : काेराेना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनमुळे तेलाच्या कंपन्या तीन ते चार महिने बंद हाेत्या. काेराेना लाॅकडाऊनपासून खाद्यतेलाचे भाव सतत वाढत आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस सर्वच खाद्यतेलाचे भाव प्रतिकिलाे ७० ते ७५ रुपयांनी वाढले आहेत. खाद्यतेल महागल्याने सर्वसामान्य कुटुंबप्रमुख व गृहिणी हैराण झाले आहेत.

गेल्या महिनाभरापासून काेराेना संसर्गाची दुसरी लाट विदर्भासह राज्यात आली आहे. नागपूर शहरात काेराेना पाॅझिटिव्ह रुग्ण वाढल्याने येथे बरेच निर्बंध घालण्यात आले आहेत. परिणामी मालाच्या वाहतुकीवरही नियंत्रण आले आहे. याचा परिणाम नागपूरच्या बाजारपेठेतील सर्वच किराणा खाद्यतेल व इतर मालांचे भाव वाढले आहेत. याचा परिणाम गडचिराेली शहरातील बाजारपेठेवर झाला आहे. गडचिराेली शहर व जिल्ह्यात नागपूर येथून ठाेक स्वरूपात किराणा व इतर माल येताे. काेराेना संसर्गामुळे काही महिने कंपन्या बंद राहिल्याने त्या ताेट्यात गेल्या. परिणामी त्यावेळचा ताेटा भरून काढण्यासाठी व कंपनी पूर्वपदावर आणण्यासाठी उद्याेजकांनी खाद्यतेलाच्या भावात वाढ केली. परिणामी किरकाेळ व ठाेक स्वरूपाच्या सर्वच प्रकारच्या खाद्यतेलाच्या किमती मागील वर्षीच्या तुलनेत ७० रुपयांनी वाढल्या आहेत.

काेट...

काेराेना संकटामुळे सर्वसामान्य कुटुंब अडचणीत आली आहेत. त्यात महागाई प्रचंड वाढल्याने सर्वसामान्य गृहिणींचे आर्थिक बजेट काेलमडले आहे. अत्यावश्यक असलेल्या खाद्य तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने दरराेज लागणाऱ्या भाजीची फाेडणी आता महागली आहे.

- शुभांगी बाेरकुटे, गृहिणी

.......

राेजच्या भाजीसाठी तसेच देवाच्या दिव्यासाठी लागणाऱ्या तेलाचे भाव वाढले आहेत. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी तेलाचे भाव प्रचंड वाढले आहेत. पूर्वी आमचा महिनाभराचा किराणा सामान अडीच हजार रुपयांमध्ये हाेत हाेता. आता साडेतीन ते चार हजार रुपयांवर हा आकडा पाेहाेचला आहे. खाद्यतेल व इतर साहित्याचे भाव वधारल्याने अडचण जाणवत आहे.

- गाेपिका मुनघाटे, गृहिणी

...............

अत्यावश्यक वस्तू व किराणा मालाच्या किमतीवर सरकारचे मुळीच नियंत्रण नसल्याचे सध्याच्या भडकलेल्या महागाईवरून दिसून येत आहे. सामान्य लाेकांच्या उदरनिर्वाहाचा विचार करून अत्यावश्यक व स्वयंपाकगृहात लागणाऱ्या सर्व वस्तूंच्या किमती कमी हाेणे आवश्यक आहे.

- जया बांगरे, गृहिणी

............

काेराेना लाॅकडाऊनमुळे किराणा मालाच्या वाहतुकीवर निर्बंध आले. काेराेनामुळे नागपुरात बरीच बंधने आली आहेत. तेथील बाजारपेठेवर परिणाम झाल्याने खाद्य तेलासह किराणा मालाच्या किमती भडकल्या आहेत.

- इकबाल सुराणी, किराणा व्यापारी