शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
2
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
3
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
4
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
5
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
6
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
7
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
8
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
9
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
10
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
11
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
12
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
13
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
14
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
16
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
17
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
18
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
19
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
20
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट

जिल्हाभरातील अर्थचक्र पुन्हा थांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 05:00 IST

लाॅकडाऊन असल्याने प्रवासी मिळणार नाही, असा अंदाज बांधून एसटी प्रशासनाने बसचेे शेड्यूल्ड कमी करण्याच्या दृष्टीने अगाेदरच नियाेजन केले हाेते. ग्रामीण भागातील संपूर्ण बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या. चंद्रपूर, नागपूर, अहेरी मार्गावर काही बसफेऱ्या साेडण्यात आल्या. चंद्रपूरला जाणारे बरेच प्रवासी मिळाल्याने चंद्रपूरसाठी काही बसफेऱ्या साेडल्या. ग्रामीण भागातील काही प्रवासी बसस्थानकावर बसची प्रतीक्षा करीत हाेते.

ठळक मुद्देसर्वच शहरांमधील बाजारपेठ बंद; दिवसभर रस्ते पडले ओस; अनेक ठिकाणी पाेलीस बंदाेबस्त

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : काेराेनाची साखळी ताेडण्यासाठी शासनाने शनिवारी व रविवारी कडक लाॅकडाऊन लागू केले आहे. त्याचे पालन करीत जिल्हाभरातील बाजारपेठ शनिवारी बंद ठेवण्यात आली.  शासकीय कार्यालये, बॅंकाना असलेली सुटी यामुळे नागरिकही घराच्या बाहेर पडले नाही. त्यामुळे गडचिराेलीसह तालुकास्तरावरील रस्त्यांवरील वाहने व नागरिकांची वर्दळ थांबली हाेती. अधूनमधून एखादेच वाहन रस्त्यावर दिसत हाेते. 

एसटीचे १५ टक्केच शेड्यूल्ड सुटले लाॅकडाऊन असल्याने प्रवासी मिळणार नाही, असा अंदाज बांधून एसटी प्रशासनाने बसचेे शेड्यूल्ड कमी करण्याच्या दृष्टीने अगाेदरच नियाेजन केले हाेते. ग्रामीण भागातील संपूर्ण बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या. चंद्रपूर, नागपूर, अहेरी मार्गावर काही बसफेऱ्या साेडण्यात आल्या. चंद्रपूरला जाणारे बरेच प्रवासी मिळाल्याने चंद्रपूरसाठी काही बसफेऱ्या साेडल्या. ग्रामीण भागातील काही प्रवासी बसस्थानकावर बसची प्रतीक्षा करीत हाेते. मात्र ग्रामीण भागातील मार्गांवर बसफेऱ्या साेडण्यात आल्या नाहीत. तसेच खासगी वाहतूकही बंद असल्याने या प्रवाशांची चांगलीच गाेची झाली.

भामरागड

भामगरागड शहरातील भाजीपाला, मेडिकल, काेल्ड्रिंक दुकाने व पेट्राेल पंप वगळता, इतर सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आली हाेती. भामरागडच्या सभाेवताल असलेल्या गावांमध्येही लाॅकडाऊनचे पालन करण्यात आले. दुर्गम भागातील गावांमध्ये दुकानांसह सर्वच व्यवहार सुरळीत सुरू हाेते. लाॅकडाऊनचा फारसा प्रभाव या गावांमध्ये दिसून आला नाही. 

चामाेर्शी

चामाेर्शी शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद हाेती. बहुतांश ग्रामीण भागातील दुकानेही बंद ठेवण्यात आली हाेती. बाजारपेठ व शासकीय कार्यालये बंद असल्याने, ग्रामीण भागातील नागरिक चामाेर्शी शहराकडे फिरकले नाहीत. त्यामुळे दिवसभर रस्ते ओस पडले हाेते. एखादे वाहन रस्त्याने फिरकत असल्याचे दिसून येत हाेते. 

आष्टी

शनिवारी आष्टी येथील चहा टपरी, पानठेले, जनरल स्टोअर, कापड दुकाने, सराफा दुकाने, सिमेंट, लोहा आदी दुकाने पूर्ण बंद होती. फक्त  दवाखाना व मेडिकल सुरू होते. रस्त्यावर नागरिकांची गर्दीही कमी होती.  आंबेडकर चौकात पोलीस तैनात होते. कामाशिवाय फिरणाऱ्या व मास्क न लावलेल्या लोकांना पोलीस अडवून विचारपूस करीत होते. शुक्रवारी मास्क न लावलेल्या वाहनधारकांकडून दंड वसूल करण्यात आला. त्यामुळे आज नागरिकांची वर्दळ कमी दिसत होती. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेले नियम पोलीस विभागाकडून राबविले जात आहे. पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड हे सुद्धा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावात फिरत असून, परिस्थितीचा आढावा घेत आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या