शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणत्याही महापालिकेत युती तुटलेली नाही, पुढच्या दोन दिवसात...", उदय सामंतांचे विधान, पुणे-संभाजीनगरचं काय?
2
Mamata Banerjee : "I Don't Care", अमित शाह यांच्या टीकेला ममता बॅनर्जींचं प्रत्युत्तर; केंद्र सरकारवर गंभीर आरोप
3
निष्ठवंतांनंतर संभाजीनगर भाजप कार्यालयात रिपाइंचा 'रुद्रावतार'! कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
4
काका-पुतण्याची आघाडी; परभणीत राष्ट्रवादी अ.प. ५७ तर राष्ट्रवादी श.प. ८ जागा लढणार
5
व्लादिमीर पुतिन यांच्या घरावरील हल्ल्याच्या दाव्यांवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
लक्ष्मी नारायण विपरीत राजयोग: ‘या’ राशी ठरतील लकी, मनासारखे घडेल; सुबत्ता-कल्याण-मंगळ काळ!
7
३१ डिसेंबरला स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट आणि झेप्टोचे डिलिव्हरी बॉईज संपावर? कंपन्यांना किती फटका बसू शकतो
8
२०२६ वर्षारंभ गुरुवारी: एका पैशाचा खर्च नाही, कुठेही जायची गरज नाही; ‘अशी’ स्वामी सेवा करा!
9
गांधी कुटुंब एकत्र भेटते, तेव्हा काय गप्पा रंगतात? प्रियंकांचा मुलगा रेहान वाड्रा म्हणतो...
10
बीएलएफने पाकिस्तानी सैन्यावर केला मोठा हल्ला; १० सैनिकांना मारल्याचा दावा
11
नाशकात भाजपा कार्यकर्त्यांचा राडा, पैसे घेऊन तिकीट वाटल्याचा आरोप; महाजन म्हणाले, "चौकशी करू..."
12
Pranjal Dahiya : Video - "ओ काका, मी तुमच्या मुलीच्या वयाची..."; गैरवर्तनावर भडकली प्रसिद्ध गायिका
13
Aquarius Yearly Horoscope 2026: कुंभ राशीसाठी नवीन वर्ष 2026: आर्थिक चणचण संपणार! प्रवासातून भाग्योदय आणि सुखद बातम्यांचे वर्ष
14
'बॅटल ऑफ गलवान'च्या टीझरमुळे चीन संतापला; म्हणाले,'भारतीय सैन्याने आधी सीमा ओलांडली...
15
Tiger Attack: वाघ गावात शिरला, तरुणावर हल्ला केला अन् पलंगावर आरामात झोपी गेला, पाहा Video...
16
'या' मेटल शेअरमध्ये सलग आठव्या दिवशी विक्रमी तेजी; पाहा काय आहे या ऐतिहासिक तेजीचं कारण
17
NMMC Election 2026: ...तर आमदारकीचा राजीनामा देईन; आमदार मंदा म्हात्रेंचं गणेश नाईकांना चॅलेंज, भाजपात वाद पेटला
18
दोघांनी संसाराची स्वप्न बघितली, प्रेमविवाह केला पण भयंकर घडलं; पती-पत्नीमध्ये काय बिनसलं?
19
२०२५ मध्ये भारतीय अब्जाधीशांच्या संपत्तीत मोठी उलथापालथ; मुकेश अंबानी कमाईत अव्वल
20
मराठवाड्यात युतीत फूट; संभाजीनगरनंतर जालना, नांदेड अन् परभणीत भाजप-शिंदेसेना-NCP स्वतंत्र लढणार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सुकन्या योजनेला ग्रहण

By admin | Updated: May 31, 2014 23:29 IST

नवजात मुलींची होणारी हत्या थांबवून मोठे झाल्यानंतर त्यांना चांगले शिक्षण घेता यावे, यासाठी राज्य शासनाने १ जानेवारी २0१४ पासून राज्यभरात सुकन्या योजना सुरू केली असली तरी या योजनेची

देसाईगंज : नवजात मुलींची होणारी हत्या थांबवून मोठे झाल्यानंतर त्यांना चांगले शिक्षण घेता यावे, यासाठी राज्य शासनाने १ जानेवारी २0१४ पासून राज्यभरात सुकन्या योजना सुरू केली असली तरी या योजनेची जनजागृती करण्यात प्रशासनाला अपयश आल्याने अजूनही बहुसंख्य मुलींच्या नावाने सुकन्या योजनेचे पैसे टाकण्यात आले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुलींबाबत समाजात सकारात्मक विचार निर्माण करणे, बालविवाह नियंत्रणात ठेवणे, मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींना शिक्षण व आरोग्याची सुविधा मिळण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने १ जानेवारीपासून सुकन्या योजना सुरू केली आहे. सदर योजना महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत जन्मताच मुलीच्या नावे राज्य शासनाकडून २१ हजार २00 रूपये आयुर्विमा महामंडळाकडे जमा करण्यात येतात. वयाच्या १८ व्या वर्षी सदर मुलीच्या नावाने एक लाख रूपये जमा होत असून सदर पैसे वयाच्या १८ वर्षानंतरच काढता येते. यासाठी वयाच्या १८ वर्षापूर्वी लग्न न करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. योजनेचा लाभ दारिद्रय़रेषेखालील नागरिकांना देण्यात येतो. या योजनेसाठी केवळ दोन अपत्यांवर कुटुंब नियोजन करण्याचे अट टाकण्यात आली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी शहरी किंवा ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविकेकडे किंवा बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे अर्ज करावा लागतो. अर्जासोबत आईवडीलांचा रहिवासी दाखला, जन्म नोंदणी प्रमाणपत्र, दारिद्रय़रेषेखाली असल्याचा दाखला, दुसरे अपत्य असल्यास कुटुंब नियोजनाचे प्रमाणपत्र सादर करावे लागते. वयाच्या १८ व्या वर्षी रक्कम मिळणार असल्याने ही रक्कम मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. मात्र या योजनेबाबत प्रशासनाने नागरिकांमध्ये फारशी जनजागृती केली नाही. त्यामुळे या योजनेबाबत बहुतांश नागरिकांना माहिती नसल्याने योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिक अर्ज करीत नसल्याची माहिती पुढे आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात दारिद्रय़रेषेखालील लाखो कुटुंबे आहेत. यातील मुलींना या योजनेचा लाभ झाला असता. मात्र शासनाने व प्रशासनानेही योजनेच्या जनजागृतीबाबत फारशी दखल घेतली नाही. त्यामुळे आजपर्यंत अनेक मुलींचा या योजनेत समावेश झाला नाही. योजनेचा लाभ देण्यासाठी अंगणवाडी सेविका व बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी विशेष जनजागृती करावी, असे आदेश शासनाने द्यावे,  जेणेकरून पालकवर्ग स्वत: अर्ज करतील. जनजागृतीसाठी शासनाने स्वत: मोहीम सुरू करावी. अर्ज भरून घेण्याविषयी टाळाटाळ करणार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी पालक वर्गाकडून केली जात आहे. सुकन्या योजनेसारख्या शेकडो योजना राज्य व केंद्र शासनाकडून राबविल्या जातात. मात्र आपल्यामागे कटकट नको, असा चुकीचा विचार करून अनेक योजनांची माहितीच दिली जात नाही. लाभार्थी मिळत नसल्याचे कारण अधिकारी व कर्मचारी वर्गाकडून केले जाते. हीच स्थिती सुकन्या योजनेबाबतही झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)