शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

ई-पीक नोंदणी ठरताहेत शेतकऱ्यांना डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:41 IST

शेतकऱ्यांना दगाफटका होऊ नये म्हणून यंदा प्रथमच ई-पीक नोंदणी प्रयोग राबविण्यात येत आहे; परंतु खरीप व रब्बी हंगामात विविध ...

शेतकऱ्यांना दगाफटका होऊ नये म्हणून यंदा प्रथमच ई-पीक नोंदणी प्रयोग राबविण्यात येत आहे; परंतु खरीप व रब्बी हंगामात विविध पीक घेणारे शेतकरी सामान्यतः ग्रामीण भागात आहेत, याचा महसूल विभागाला विसर पडल्याचे जाणवते. कोणते पीक, कोणत्या रकान्यात भरावे आणि त्याचे क्षेत्र किती दाखवावे तसेच ॲपवर माहिती सादर केल्यास माहिती चुकीची भरली की खरी हे शोधणे कठीण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे. मोहीम चांगली असली तरी पिकासंदर्भात माहिती भरणे, सर्व्हर मंदगतीने चालणे, कव्हरेज न मिळणे आदींमुळे ॲपवर माहिती अपलोड करण्यास बराच वेळ लागत आहे. त्यातच विजेच्या लपंडावाची समस्या कायम आहे. शिवाय भरलेली माहिती अचूक आहे अथवा नाही याची खातरजमा करण्यासाठी पर्याय नसल्याची ओरड शेतकऱ्यांकडून हाेत आहे.

शेतकऱ्यांना स्मार्टफोनच्या मदतीने आपल्या शेतशिवारातील पिकांची नोंदणी करता येणार आहे. स्मार्टफोन शेतात नेऊन पिकाचा फोटो शेतातून पाठविता येणार आहे. मात्र, स्मार्टफोन हाताळणी कोण शिकविणार? असा सवाल ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून होत आहे. शासनाच्या निकषानुसार, ३० सप्टेंबरपर्यंत ई - पीक नोंदणी करावयाची आहे. सर्व कृषी सहायकांना तशा सूचना व निर्देश दिले आहेत, तसेच तलाठी, पोलीसपाटील, कोतवाल यांनासुद्धा यासाठी मदत करण्याचे निर्देश आहेत.

बाक्स:

अनेक शेतकऱ्यांकडे स्मार्टफोनच नाही

ई- पीक नोंदणी योजना चांगली असली तरी ती योजना डोकेदुखी ठरत आहे. शेती उद्योग हा ग्रामीण भागात असल्याने या नोंदणीसाठी त्या शेतकऱ्यांजवळ स्मार्टफोनच नाही तर हे काम कुणाकडून करून घ्यायचे, असा प्रश्न पडला आहे. शासनाने महसूल व कृषी व इतर शासकीय यंत्रणेला याकामी लावून ही कामे झाली असती तर शेतकऱ्यांवर हतबल होण्याची वेळ आली नसती. शासनाने शासकीय यंत्रणेमार्फत ही कामे करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

बॉक्स : तलाठ्यांमार्फत व्हावी ई-पीक नोंदणी

चार्मोशी येथील शेतकरी दिलीप लटारे यांना विचारणा केली असता माझ्याकडे ५ एकर शेती असून धानपिकांचे उत्पादन घेत असतो. यावर्षी शासन ई -पीक नोंदणी यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पिकांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. उपक्रम चांगला असला तरी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांजवळ स्मार्टफोन व तो हाताळणे निरक्षर शेतकऱ्यांना कठीण काम आहे. त्यामुळे ही कामे महसूल विभागाकडे सोपवून तलाठ्यांच्या मार्फत ई -पीक नोंदणी केल्यास सोयीचे ठरू शकते.