शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
2
धावत्या बसमध्येच प्रसूती, नंतर बाळाला बाहेर फेकलं; कथित पती-पत्नीचा अमानुष प्रकार
3
अमेरिकेने भारताला दिले गिफ्ट, पाकिस्तानचा थयथयाट; घातक फायटर जेटसाठी पाठवले खास इंजिन
4
SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! या तारखेला ATM, UPI, IMPS, NEFT सेवा राहणार बंद; पाहा डिटेल्स
5
Ganpati Extra Buses for Konkan : गुड न्यूज! चाकरमान्यांना बाप्पा पावला; गणेशोत्सवासाठी कोकणात STच्या जादा ५ हजार बस धावणार
6
Air India Plane Crash : मोठा दावा! विमान अपघातापूर्वीच इंधन नियंत्रण स्विच खराब असल्याचा इशारा'CAA'ने दिला होता
7
Raigad Heavy Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
8
पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी पतीला अटक, पण ती प्रियकरासोबत सापडली जिवंत, सोलापूरातील धक्कादायक प्रकार
9
Accident Video: मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद! दोन तरुणांना कारने उडवले, एकाचा जागीच मृत्यू
10
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
11
Ramayana : तब्बल ४ हजार कोटींमध्ये बनतोय रणबीरचा 'रामायण'; निर्माते म्हणाले, "हॉलिवूडच्या जवळपासही..."
12
संपत्तीवरून वाढला वाद, पत्नीने अवघी १० लाख लावली पतीच्या जीवाची बोली! सुपारी दिली अन्...  
13
नवजात बाळाला मालिश करणं का महत्त्वाचं, कोणतं तेल आहे सर्वात बेस्ट?
14
Bitcoin Return Chart: ५ वर्षांत बनवलं राजा! तुम्हीही १००-२०० रुपयांत खरेदी करू शकता बिटकॉईन
15
जयशंकर यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना दिला पीएम मोदींचा संदेश; पाकिस्तानला लागणार मिरची..!
16
सरकार बदलणार MRP चा फॉर्म्युला; वस्तूंच्या किंमती कमी होणार की महागणार? ग्राहकांवर होणार परिणाम
17
धक्कादायक! हरवलेला क्रिकेटचा बॉल शोधत होता, बंद घरात मानवी सांगाडा पाहून हादरला
18
Video - जीवघेणा प्रवास! शाळेत जाण्यासाठी चिमुकलीची धडपड; पाय घसरून चिखलात पडली अन्...
19
व्रत-वैकल्यांचा राजा श्रावणमास, प्रत्येक दिवसाचे महत्त्व खास; पाहा, सण-उत्सवांचे महात्म्य
20
वय ३५? काळजी करू नका! 'या' ३ सोप्या स्टेप्सने कमवू शकता १ कोटीचा फंड, गुंतवणुकीचा सिक्रेट रोडमॅप!

ई-पीक नोंदणी ठरताहेत शेतकऱ्यांना डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:41 IST

शेतकऱ्यांना दगाफटका होऊ नये म्हणून यंदा प्रथमच ई-पीक नोंदणी प्रयोग राबविण्यात येत आहे; परंतु खरीप व रब्बी हंगामात विविध ...

शेतकऱ्यांना दगाफटका होऊ नये म्हणून यंदा प्रथमच ई-पीक नोंदणी प्रयोग राबविण्यात येत आहे; परंतु खरीप व रब्बी हंगामात विविध पीक घेणारे शेतकरी सामान्यतः ग्रामीण भागात आहेत, याचा महसूल विभागाला विसर पडल्याचे जाणवते. कोणते पीक, कोणत्या रकान्यात भरावे आणि त्याचे क्षेत्र किती दाखवावे तसेच ॲपवर माहिती सादर केल्यास माहिती चुकीची भरली की खरी हे शोधणे कठीण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे. मोहीम चांगली असली तरी पिकासंदर्भात माहिती भरणे, सर्व्हर मंदगतीने चालणे, कव्हरेज न मिळणे आदींमुळे ॲपवर माहिती अपलोड करण्यास बराच वेळ लागत आहे. त्यातच विजेच्या लपंडावाची समस्या कायम आहे. शिवाय भरलेली माहिती अचूक आहे अथवा नाही याची खातरजमा करण्यासाठी पर्याय नसल्याची ओरड शेतकऱ्यांकडून हाेत आहे.

शेतकऱ्यांना स्मार्टफोनच्या मदतीने आपल्या शेतशिवारातील पिकांची नोंदणी करता येणार आहे. स्मार्टफोन शेतात नेऊन पिकाचा फोटो शेतातून पाठविता येणार आहे. मात्र, स्मार्टफोन हाताळणी कोण शिकविणार? असा सवाल ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून होत आहे. शासनाच्या निकषानुसार, ३० सप्टेंबरपर्यंत ई - पीक नोंदणी करावयाची आहे. सर्व कृषी सहायकांना तशा सूचना व निर्देश दिले आहेत, तसेच तलाठी, पोलीसपाटील, कोतवाल यांनासुद्धा यासाठी मदत करण्याचे निर्देश आहेत.

बाक्स:

अनेक शेतकऱ्यांकडे स्मार्टफोनच नाही

ई- पीक नोंदणी योजना चांगली असली तरी ती योजना डोकेदुखी ठरत आहे. शेती उद्योग हा ग्रामीण भागात असल्याने या नोंदणीसाठी त्या शेतकऱ्यांजवळ स्मार्टफोनच नाही तर हे काम कुणाकडून करून घ्यायचे, असा प्रश्न पडला आहे. शासनाने महसूल व कृषी व इतर शासकीय यंत्रणेला याकामी लावून ही कामे झाली असती तर शेतकऱ्यांवर हतबल होण्याची वेळ आली नसती. शासनाने शासकीय यंत्रणेमार्फत ही कामे करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

बॉक्स : तलाठ्यांमार्फत व्हावी ई-पीक नोंदणी

चार्मोशी येथील शेतकरी दिलीप लटारे यांना विचारणा केली असता माझ्याकडे ५ एकर शेती असून धानपिकांचे उत्पादन घेत असतो. यावर्षी शासन ई -पीक नोंदणी यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पिकांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. उपक्रम चांगला असला तरी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांजवळ स्मार्टफोन व तो हाताळणे निरक्षर शेतकऱ्यांना कठीण काम आहे. त्यामुळे ही कामे महसूल विभागाकडे सोपवून तलाठ्यांच्या मार्फत ई -पीक नोंदणी केल्यास सोयीचे ठरू शकते.