शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

ई-पीक नोंदणी ठरताहेत शेतकऱ्यांना डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:41 IST

शेतकऱ्यांना दगाफटका होऊ नये म्हणून यंदा प्रथमच ई-पीक नोंदणी प्रयोग राबविण्यात येत आहे; परंतु खरीप व रब्बी हंगामात विविध ...

शेतकऱ्यांना दगाफटका होऊ नये म्हणून यंदा प्रथमच ई-पीक नोंदणी प्रयोग राबविण्यात येत आहे; परंतु खरीप व रब्बी हंगामात विविध पीक घेणारे शेतकरी सामान्यतः ग्रामीण भागात आहेत, याचा महसूल विभागाला विसर पडल्याचे जाणवते. कोणते पीक, कोणत्या रकान्यात भरावे आणि त्याचे क्षेत्र किती दाखवावे तसेच ॲपवर माहिती सादर केल्यास माहिती चुकीची भरली की खरी हे शोधणे कठीण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे. मोहीम चांगली असली तरी पिकासंदर्भात माहिती भरणे, सर्व्हर मंदगतीने चालणे, कव्हरेज न मिळणे आदींमुळे ॲपवर माहिती अपलोड करण्यास बराच वेळ लागत आहे. त्यातच विजेच्या लपंडावाची समस्या कायम आहे. शिवाय भरलेली माहिती अचूक आहे अथवा नाही याची खातरजमा करण्यासाठी पर्याय नसल्याची ओरड शेतकऱ्यांकडून हाेत आहे.

शेतकऱ्यांना स्मार्टफोनच्या मदतीने आपल्या शेतशिवारातील पिकांची नोंदणी करता येणार आहे. स्मार्टफोन शेतात नेऊन पिकाचा फोटो शेतातून पाठविता येणार आहे. मात्र, स्मार्टफोन हाताळणी कोण शिकविणार? असा सवाल ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून होत आहे. शासनाच्या निकषानुसार, ३० सप्टेंबरपर्यंत ई - पीक नोंदणी करावयाची आहे. सर्व कृषी सहायकांना तशा सूचना व निर्देश दिले आहेत, तसेच तलाठी, पोलीसपाटील, कोतवाल यांनासुद्धा यासाठी मदत करण्याचे निर्देश आहेत.

बाक्स:

अनेक शेतकऱ्यांकडे स्मार्टफोनच नाही

ई- पीक नोंदणी योजना चांगली असली तरी ती योजना डोकेदुखी ठरत आहे. शेती उद्योग हा ग्रामीण भागात असल्याने या नोंदणीसाठी त्या शेतकऱ्यांजवळ स्मार्टफोनच नाही तर हे काम कुणाकडून करून घ्यायचे, असा प्रश्न पडला आहे. शासनाने महसूल व कृषी व इतर शासकीय यंत्रणेला याकामी लावून ही कामे झाली असती तर शेतकऱ्यांवर हतबल होण्याची वेळ आली नसती. शासनाने शासकीय यंत्रणेमार्फत ही कामे करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

बॉक्स : तलाठ्यांमार्फत व्हावी ई-पीक नोंदणी

चार्मोशी येथील शेतकरी दिलीप लटारे यांना विचारणा केली असता माझ्याकडे ५ एकर शेती असून धानपिकांचे उत्पादन घेत असतो. यावर्षी शासन ई -पीक नोंदणी यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पिकांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. उपक्रम चांगला असला तरी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांजवळ स्मार्टफोन व तो हाताळणे निरक्षर शेतकऱ्यांना कठीण काम आहे. त्यामुळे ही कामे महसूल विभागाकडे सोपवून तलाठ्यांच्या मार्फत ई -पीक नोंदणी केल्यास सोयीचे ठरू शकते.