शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
3
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
4
अलास्कामध्ये ट्रम्प-पुतिन भेटीनंतर एका अमेरिकन नागरिकाला मिळाले १९ लाखांचे गिफ्ट; नेमकं प्रकरण काय?
5
Nashik Crime: 'तुझ्या आईने आपले लग्न जमवलंय'; भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीवर घरातच सुरू केले...
6
"जन्मदात्यांना नकोशी होती, गर्भातच मारण्याचा प्रयत्न", भारती सिंगची हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट
7
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
8
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
9
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
10
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
11
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
12
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
13
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
14
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
15
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
16
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
17
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
18
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
19
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
20
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!

ओबीसींमुळे राज्यकर्त्यांचे पानिपत

By admin | Updated: May 18, 2014 23:36 IST

राज्यकर्त्यांनी ओबीसी समाजावर सातत्याने अन्याय केल्याने हा वर्ग राज्यकर्त्यांवर बराच संतापला होता. निवडणुकीच्या माध्यमातून आपला संताप दाखवून दिल्याने राज्यकर्त्यांचे लोकसभा

 गडचिरोली : राज्यकर्त्यांनी ओबीसी समाजावर सातत्याने अन्याय केल्याने हा वर्ग राज्यकर्त्यांवर बराच संतापला होता. निवडणुकीच्या माध्यमातून आपला संताप दाखवून दिल्याने राज्यकर्त्यांचे लोकसभा निवडणुकीमध्ये पानिपत झाले असल्याचा आरोप ओबीसी कर्मचारी असोसीएशनचे जिल्हाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर यांनी केला आहे. ओबीसींची जनगणना, गडचिरोली जिल्ह्यासह चंद्रपूर, यवतमाळ, ठाणे, नंदूरबार, नाशिक, धुळे या जिल्ह्यात ओबीसींचे आरक्षण कमी करण्यात आले. ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क प्रतिपूर्तीचा प्रश्न, ओबीसी, शेतकरी, शेतमजून यांना नाकारण्यात आलेले वनहक्काचे पट्टे, घरकूल योजना, विशेष घटक योजना आरक्षण कमी झाल्यामुळे वाढलेली बेरोजगारी, पदोन्नतीमध्ये ओबीसी कर्मचार्‍यांवर होणार अन्याय यामुळे ओबीसी समाजावर मोठ्या प्रमाणात आघात झाला आहे. या समस्या सोडविण्यासाठी ओबीसी संघटनांनी १२ वर्षापासून वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने केलीत. मात्र केंद्र व राज्य शासनाने याकडे सातत्याने दुर्लक्ष केले. या आंदोलनांची खिल्ली उडविण्यात आली. सदर आंदोलन एका विशिष्ट वर्गापूरत्याच मर्यादित असून ग्रामीण भागातील ओबीसी जनता आपल्या पाठीशी असल्याच्या अर्विभावात राज्यकर्ते मंडळी वावरत होती. मात्र ग्रामीण भागातील नागरिकसुध्दा आता जागृत झाले आहेत. शासनाने केलेल्या अन्यायाचे दुष्परिणाम ते भोगत असल्याने राज्यकर्त्यांना मत देणे शक्यच नव्हते. शासनाच्या विरोधात असलेला संताप सुप्त स्वरूपात असल्याने राज्यकर्त्यांना तो दिसला नाही. ५० टक्के लोकसंख्या असलेल्या ओबीसी समाजाने राज्यकर्त्यांच्या विरोधात मतदान केल्याने लोकसभा निवडणुकीमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. येत्या सहा महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. यापूर्वी ओबीसींचे प्रश्न मार्गी न लावल्यास विधानसभेतसुध्दा पानिपत होण्याची शक्यता प्रा. शेषराव येलेकर यांनी व्यक्त केली आहे. (नगर प्रतिनिधी)