शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

ओबीसींमुळे राज्यकर्त्यांचे पानिपत

By admin | Updated: May 18, 2014 23:36 IST

राज्यकर्त्यांनी ओबीसी समाजावर सातत्याने अन्याय केल्याने हा वर्ग राज्यकर्त्यांवर बराच संतापला होता. निवडणुकीच्या माध्यमातून आपला संताप दाखवून दिल्याने राज्यकर्त्यांचे लोकसभा

 गडचिरोली : राज्यकर्त्यांनी ओबीसी समाजावर सातत्याने अन्याय केल्याने हा वर्ग राज्यकर्त्यांवर बराच संतापला होता. निवडणुकीच्या माध्यमातून आपला संताप दाखवून दिल्याने राज्यकर्त्यांचे लोकसभा निवडणुकीमध्ये पानिपत झाले असल्याचा आरोप ओबीसी कर्मचारी असोसीएशनचे जिल्हाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर यांनी केला आहे. ओबीसींची जनगणना, गडचिरोली जिल्ह्यासह चंद्रपूर, यवतमाळ, ठाणे, नंदूरबार, नाशिक, धुळे या जिल्ह्यात ओबीसींचे आरक्षण कमी करण्यात आले. ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क प्रतिपूर्तीचा प्रश्न, ओबीसी, शेतकरी, शेतमजून यांना नाकारण्यात आलेले वनहक्काचे पट्टे, घरकूल योजना, विशेष घटक योजना आरक्षण कमी झाल्यामुळे वाढलेली बेरोजगारी, पदोन्नतीमध्ये ओबीसी कर्मचार्‍यांवर होणार अन्याय यामुळे ओबीसी समाजावर मोठ्या प्रमाणात आघात झाला आहे. या समस्या सोडविण्यासाठी ओबीसी संघटनांनी १२ वर्षापासून वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने केलीत. मात्र केंद्र व राज्य शासनाने याकडे सातत्याने दुर्लक्ष केले. या आंदोलनांची खिल्ली उडविण्यात आली. सदर आंदोलन एका विशिष्ट वर्गापूरत्याच मर्यादित असून ग्रामीण भागातील ओबीसी जनता आपल्या पाठीशी असल्याच्या अर्विभावात राज्यकर्ते मंडळी वावरत होती. मात्र ग्रामीण भागातील नागरिकसुध्दा आता जागृत झाले आहेत. शासनाने केलेल्या अन्यायाचे दुष्परिणाम ते भोगत असल्याने राज्यकर्त्यांना मत देणे शक्यच नव्हते. शासनाच्या विरोधात असलेला संताप सुप्त स्वरूपात असल्याने राज्यकर्त्यांना तो दिसला नाही. ५० टक्के लोकसंख्या असलेल्या ओबीसी समाजाने राज्यकर्त्यांच्या विरोधात मतदान केल्याने लोकसभा निवडणुकीमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. येत्या सहा महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. यापूर्वी ओबीसींचे प्रश्न मार्गी न लावल्यास विधानसभेतसुध्दा पानिपत होण्याची शक्यता प्रा. शेषराव येलेकर यांनी व्यक्त केली आहे. (नगर प्रतिनिधी)