शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींमुळे राज्यकर्त्यांचे पानिपत

By admin | Updated: May 18, 2014 23:36 IST

राज्यकर्त्यांनी ओबीसी समाजावर सातत्याने अन्याय केल्याने हा वर्ग राज्यकर्त्यांवर बराच संतापला होता. निवडणुकीच्या माध्यमातून आपला संताप दाखवून दिल्याने राज्यकर्त्यांचे लोकसभा

 गडचिरोली : राज्यकर्त्यांनी ओबीसी समाजावर सातत्याने अन्याय केल्याने हा वर्ग राज्यकर्त्यांवर बराच संतापला होता. निवडणुकीच्या माध्यमातून आपला संताप दाखवून दिल्याने राज्यकर्त्यांचे लोकसभा निवडणुकीमध्ये पानिपत झाले असल्याचा आरोप ओबीसी कर्मचारी असोसीएशनचे जिल्हाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर यांनी केला आहे. ओबीसींची जनगणना, गडचिरोली जिल्ह्यासह चंद्रपूर, यवतमाळ, ठाणे, नंदूरबार, नाशिक, धुळे या जिल्ह्यात ओबीसींचे आरक्षण कमी करण्यात आले. ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क प्रतिपूर्तीचा प्रश्न, ओबीसी, शेतकरी, शेतमजून यांना नाकारण्यात आलेले वनहक्काचे पट्टे, घरकूल योजना, विशेष घटक योजना आरक्षण कमी झाल्यामुळे वाढलेली बेरोजगारी, पदोन्नतीमध्ये ओबीसी कर्मचार्‍यांवर होणार अन्याय यामुळे ओबीसी समाजावर मोठ्या प्रमाणात आघात झाला आहे. या समस्या सोडविण्यासाठी ओबीसी संघटनांनी १२ वर्षापासून वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने केलीत. मात्र केंद्र व राज्य शासनाने याकडे सातत्याने दुर्लक्ष केले. या आंदोलनांची खिल्ली उडविण्यात आली. सदर आंदोलन एका विशिष्ट वर्गापूरत्याच मर्यादित असून ग्रामीण भागातील ओबीसी जनता आपल्या पाठीशी असल्याच्या अर्विभावात राज्यकर्ते मंडळी वावरत होती. मात्र ग्रामीण भागातील नागरिकसुध्दा आता जागृत झाले आहेत. शासनाने केलेल्या अन्यायाचे दुष्परिणाम ते भोगत असल्याने राज्यकर्त्यांना मत देणे शक्यच नव्हते. शासनाच्या विरोधात असलेला संताप सुप्त स्वरूपात असल्याने राज्यकर्त्यांना तो दिसला नाही. ५० टक्के लोकसंख्या असलेल्या ओबीसी समाजाने राज्यकर्त्यांच्या विरोधात मतदान केल्याने लोकसभा निवडणुकीमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. येत्या सहा महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. यापूर्वी ओबीसींचे प्रश्न मार्गी न लावल्यास विधानसभेतसुध्दा पानिपत होण्याची शक्यता प्रा. शेषराव येलेकर यांनी व्यक्त केली आहे. (नगर प्रतिनिधी)