शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: नगरपरिषदेत चुरशीची लढाई: ठाकरेंच्या शिवसेनेने खाते उघडले, काँग्रेसही आघाडीवर; पहा लेटेस्ट अपडेट
2
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
3
Nagar Parishad Election Result: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
4
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
5
नात्याला काळीमा! विमा पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
6
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
7
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
8
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
9
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
10
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
11
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
12
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
13
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
14
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
15
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
16
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
17
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
18
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
19
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
20
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पुरामुळे वैरागड-मानापूर मार्ग बंद

By admin | Updated: August 30, 2015 01:01 IST

गेल्या चार-पाच दिवसांपासून वैरागड परिसरात पाऊस बरसत आहे.

यंदा प्रथमच वाहतूक ठप्प : जीव धोक्यात घालून नागरिक करीत आहेत प्रवासवैरागड : गेल्या चार-पाच दिवसांपासून वैरागड परिसरात पाऊस बरसत आहे. शुक्रवारी रात्री झालेल्या संततधार पावसामुळे वैरागड-मानापूर मार्गावरील वैलाचना नदीच्या पुलावर पाणी वाढले. त्यामुळे शनिवारी सकाळपासूनच सदर मार्ग बंद असून वाहतूक ठप्प आहे. दरम्यान काही नागरिक जीव धोक्यात घालून पाण्यातूनच प्रवास करीत आहेत. वैरागडजवळील वैलोचना नदी पात्रातील पुलाची उंची अतिशय कमी आहे. यामुळे जोरदार पाऊस झाल्यास वैरागड-मानापूर मार्गावरील वाहतूक ठप्प होतो. ही समस्या लक्षात घेऊन या पुलाची उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी अनेकदा प्रशासनाकडे लावून धरली. मात्र या पुलाची उंची वाढविण्यास प्रशासनाने पावले उचलली नाही. आघाडी सरकारच्या काळात या पुलाची उंची वाढवून नवीन बांधकाम करण्यासाठी महिनाभर सर्वेक्षण करण्यात आले होते. मात्र त्यानंतर पुढची कार्यवाही झाली नाही. आरमोरीचे आमदार क्रिष्णा गजबे यांनी या मार्गावरील पुलाचे काम मंजूर झाले असल्याची माहिती नागरिकांना दिली होती. गतवर्षी अतिवृष्टीमुळे नऊ वेळा या मार्गावरील वाहतूक बंद होती.मजूर परतल्याने रोवणीचे काम खोळंबलेवैरागड गावात राहणाऱ्या अनेक शेतकऱ्यांची मानापूर भागात शेती आहे. तर पुलापलिकडील काही शेतकऱ्यांची पुलाच्या अलिकडील भागात शेती आहे. नेहमीप्रमाणे अनेक शेतमालक मजूर घेऊन रोवणीसाठी निघाले मात्र वैलोचना नदीच्या पुलावर पूर असल्याने दोन्हीकडील शेतमालक मजुरांसह घरी परतले. परिणामी रोवणीचे काम खोळंबले.