शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
4
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
5
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
6
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
7
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
8
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
9
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
10
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
11
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
12
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
13
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
14
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
15
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
16
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
17
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
18
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
19
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
20
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...

पुरामुळे वैरागड-मानापूर मार्ग बंद

By admin | Updated: August 30, 2015 01:01 IST

गेल्या चार-पाच दिवसांपासून वैरागड परिसरात पाऊस बरसत आहे.

यंदा प्रथमच वाहतूक ठप्प : जीव धोक्यात घालून नागरिक करीत आहेत प्रवासवैरागड : गेल्या चार-पाच दिवसांपासून वैरागड परिसरात पाऊस बरसत आहे. शुक्रवारी रात्री झालेल्या संततधार पावसामुळे वैरागड-मानापूर मार्गावरील वैलाचना नदीच्या पुलावर पाणी वाढले. त्यामुळे शनिवारी सकाळपासूनच सदर मार्ग बंद असून वाहतूक ठप्प आहे. दरम्यान काही नागरिक जीव धोक्यात घालून पाण्यातूनच प्रवास करीत आहेत. वैरागडजवळील वैलोचना नदी पात्रातील पुलाची उंची अतिशय कमी आहे. यामुळे जोरदार पाऊस झाल्यास वैरागड-मानापूर मार्गावरील वाहतूक ठप्प होतो. ही समस्या लक्षात घेऊन या पुलाची उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी अनेकदा प्रशासनाकडे लावून धरली. मात्र या पुलाची उंची वाढविण्यास प्रशासनाने पावले उचलली नाही. आघाडी सरकारच्या काळात या पुलाची उंची वाढवून नवीन बांधकाम करण्यासाठी महिनाभर सर्वेक्षण करण्यात आले होते. मात्र त्यानंतर पुढची कार्यवाही झाली नाही. आरमोरीचे आमदार क्रिष्णा गजबे यांनी या मार्गावरील पुलाचे काम मंजूर झाले असल्याची माहिती नागरिकांना दिली होती. गतवर्षी अतिवृष्टीमुळे नऊ वेळा या मार्गावरील वाहतूक बंद होती.मजूर परतल्याने रोवणीचे काम खोळंबलेवैरागड गावात राहणाऱ्या अनेक शेतकऱ्यांची मानापूर भागात शेती आहे. तर पुलापलिकडील काही शेतकऱ्यांची पुलाच्या अलिकडील भागात शेती आहे. नेहमीप्रमाणे अनेक शेतमालक मजूर घेऊन रोवणीसाठी निघाले मात्र वैलोचना नदीच्या पुलावर पूर असल्याने दोन्हीकडील शेतमालक मजुरांसह घरी परतले. परिणामी रोवणीचे काम खोळंबले.