शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

१० महिन्यांपासून मानधन थकीत

By admin | Updated: October 20, 2016 02:42 IST

सामाजिक न्याय विभागाच्या वतीने १०० टक्के अनुदानावर चालविल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील ६० वसतिगृहातील १८० कर्मचाऱ्यांचे मानधन मागील दहा महिन्यांपासून

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : १८० वसतिगृह कर्मचाऱ्यांचा उपोषणाचा इशारागडचिरोली : सामाजिक न्याय विभागाच्या वतीने १०० टक्के अनुदानावर चालविल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील ६० वसतिगृहातील १८० कर्मचाऱ्यांचे मानधन मागील दहा महिन्यांपासून प्रलंबित ठेवण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागात सदर कर्मचाऱ्यांच्या मानधनाचे २ कोटी ३५ लाख रूपये अनुदान आले असतानाही कर्मचाऱ्यांना ते मानधन स्वरूपात देण्यात आले नाही. वर्षातील सर्वात मोठा सण तोंडावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे समाजकल्याण विभागाने वसतिगृह कर्मचाऱ्यांचे वेतन दिवाळीपूर्वी द्यावे, अन्यथा २६ आॅक्टोबरपासून आमरण उपोषण करू, असा इशारा महाराष्ट्र मागासवर्गीय अनुदानित वसतिगृह संघटना शाखा गडचिरोलीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी, समाजकल्याण अधिकारी यांना निवेदनातून दिला आहे. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात मागासवर्गीय अनुदानित वसतिगृह निर्माण करण्यात आले असून वसतिगृहातील अधीक्षक, स्वयंपाकी, चौकीदार व मदतनिस २४ तास सेवा बजावून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला साद घालत आहेत. शिवाय अधीक्षक ८ हजार, स्वयंपाकी ६ हजार व चौकीदार ५ हजार अशा तोकड्या मानधनावर काम करीत आहेत. तोकडे मानधन अशातच महिन्याला मानधन मिळत नसल्याने वसतिगृह कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटाना सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यातील ६० वसतिगृहातील १८० कर्मचाऱ्यांचे मानधन मागील १० महिन्यांपासून थकीत ठेवण्यात आले असल्याने वारंवार जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे याबाबत कर्मचाऱ्यांकडून पाठपुरावा केला जात आहे. परंतु तीन महिन्यांपासून २ कोटी ३४ लाख रूपयांचे अनुदान कार्यालयाकडे जमा असतानाही वाटप झाले नाही, असेही कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. मागणी न मान्य केल्यास उपोषण करू, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष आर. डी. बावनथडे, उपाध्यक्ष सुरेश इन्कणे, सचिव लेखराज झलके, कोषाध्यख वर्षा शेडमाके, सहसचिव आर. डी. लोनगाडगे, आर. एम. कोतपल्लीवार, पी. आर. आवारी, चित्ररेखा सहारे यांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकारी यांना निवेदनातून दिला आहे.