शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी स्थितीमुळे कर्जवसुलीवर संक्रांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2016 01:49 IST

गडचिरोली जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात पाऊस अतिशय अनियमित व कमी प्रमाणात झाला.

१३९८ गावे दुष्काळग्रस्त : वसुलीच्या टक्केवारीतही घसरणगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात पाऊस अतिशय अनियमित व कमी प्रमाणात झाला. त्यामुळे खरीप हंगामात उत्पन्नाचा उताराही घसरला. शेतकरी आर्थिक अडचणीत आलेत. त्यातच १३९८ गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाला दिला आहे. या सर्व बाबीचा थेट परिणाम बँकांनी खरीप हंगामात केलेल्या कर्ज वाटपाच्या वसुलीवर झाला असून यावर्षी कर्ज वसुलीचे मोठे संकट बँकांसमोरही उभे ठाकले आहे. १५ डिसेंबर २०१५ पर्यंत जिल्ह्यात ११२ कोटी २५ लाख रूपयांचे कर्ज १० बँकांनी वितरित केलेले आहे. त्यात सर्वाधिक ५२ कोटी ६४ लाखांचे कर्ज गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने वितरित केले आहे. सदर कर्ज हे खरीप व रबी या दोन्ही हंगामासाठी वर्षभर वितरित केले जाते. धान, सोयाबिन, कापूस या पिकांना पीक कर्ज दिले जात असते. यावर्षी खरीप हंगामात गडचिरोली जिल्ह्यात सरासरी एवढा पाऊस झाला असला तरी खरीप हंगामातील शेतीसाठी हा पाऊस काहीही उपयोगाचा झाला नाही. त्यामुळे पेरणी उशीरा झाल्याने धान पिकाच्या उत्पादनावरही प्रचंड परिणाम झाला आहे. गतवर्षी एका एकरात १५ ते २० क्विंटल धानाचे उत्पादन झाले होते. तेथेच यंदा केवळ आठ क्विंटल धानाचे उत्पादन झाले. अंतिम पैसेवारी जाहीर करून जिल्हा प्रशासनाने १३९८ गावांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती असल्याचे शासनाला कळविले आहे. ३१ मार्च २०१६ पर्यंत खरीप पिकाची कर्ज वसुली बँका करीत असतात. अनेक बँकांकडून शेतकऱ्यांना व्याजावर सवलतही दिली जाते. यंदा मात्र दुष्काळी परिस्थिती त्यातच शासनाच्या एकाधिकार व हमीभाव खरेदी केंद्रांची कमतरता याचा थेट परिणाम बँकांच्या कर्ज वसुलीवर होत आहे. बरेच वेळा हमी भाव खरेदी केंद्रावर तसेच एकाधिकार धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा माल आल्यावर चुकारे देताना त्यातून बँकांच्या कर्जाची कपात सेवा सहकारी संस्थामार्फत करून घेण्यात येत होती. यंदा ज्या गावात गोदामाची व्यवस्था आहे, अशाच गावात शासनाने खरेदी केंद्र सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे अनेक मोठ्या गावांमध्ये खरेदी केंद्र सुरू झाले नाही. शेतकऱ्यांनी आपला माल व्यापाऱ्यांना विकला. त्यामुळे बँकांना शेतकऱ्यांकडून कर्ज वसुली करणे अडचणीचे ठरत आहे. गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने डिसेंबरपर्यंत केवळ ५० लाख रूपयांचीच चालू कर्जाची वसुली केलेली आहे. यापेक्षाही बिकट परिस्थिती इतर बँकांची आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने चालू व थकीत कर्जाची वसुली केली असून ५४ कोटी रूपयांचे कर्ज त्यांनी खरीप हंगामात वाटप केले होते. त्यापैकी केवळ ५० लाख रूपयांचीच वसुली होऊ शकली. बँकेशी २५९ सेवा सहकारी संस्था जुळलेल्या आहे. मात्र या सर्व सेवा सहकारी संस्थांकडे खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. केवळ २० ते २४ ठिकाणच्या केंद्रांवर धान खरेदी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे बँकांच्या वसुलीवरही याचा परिणाम होत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)राज्य शासनाने दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देण्याची गरज आहे. यंदा धान उत्पादक शेतकऱ्यांची प्रचंड दानादान उडाली असून ९० टक्के शेतकऱ्यांनी आपला माल व्यापाऱ्यांना विकला आहे. शासनाचे खरेदी केंद्र सुरू झाले नाही. मातीमोल भावात धान विकावा लागला. कर्ज फेडण्याची क्षमता यावर्षी शेतकऱ्यांमध्ये राहिलेली नाही. शासनाने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची गरज आहे. परंतु याबाबत लोकप्रतिनिधी उदासीन आहेत.- रामचंद्र सिडाम, शेतकरी, अहेरी