शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी स्थितीमुळे कर्जवसुलीवर संक्रांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2016 01:49 IST

गडचिरोली जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात पाऊस अतिशय अनियमित व कमी प्रमाणात झाला.

१३९८ गावे दुष्काळग्रस्त : वसुलीच्या टक्केवारीतही घसरणगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात पाऊस अतिशय अनियमित व कमी प्रमाणात झाला. त्यामुळे खरीप हंगामात उत्पन्नाचा उताराही घसरला. शेतकरी आर्थिक अडचणीत आलेत. त्यातच १३९८ गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाला दिला आहे. या सर्व बाबीचा थेट परिणाम बँकांनी खरीप हंगामात केलेल्या कर्ज वाटपाच्या वसुलीवर झाला असून यावर्षी कर्ज वसुलीचे मोठे संकट बँकांसमोरही उभे ठाकले आहे. १५ डिसेंबर २०१५ पर्यंत जिल्ह्यात ११२ कोटी २५ लाख रूपयांचे कर्ज १० बँकांनी वितरित केलेले आहे. त्यात सर्वाधिक ५२ कोटी ६४ लाखांचे कर्ज गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने वितरित केले आहे. सदर कर्ज हे खरीप व रबी या दोन्ही हंगामासाठी वर्षभर वितरित केले जाते. धान, सोयाबिन, कापूस या पिकांना पीक कर्ज दिले जात असते. यावर्षी खरीप हंगामात गडचिरोली जिल्ह्यात सरासरी एवढा पाऊस झाला असला तरी खरीप हंगामातील शेतीसाठी हा पाऊस काहीही उपयोगाचा झाला नाही. त्यामुळे पेरणी उशीरा झाल्याने धान पिकाच्या उत्पादनावरही प्रचंड परिणाम झाला आहे. गतवर्षी एका एकरात १५ ते २० क्विंटल धानाचे उत्पादन झाले होते. तेथेच यंदा केवळ आठ क्विंटल धानाचे उत्पादन झाले. अंतिम पैसेवारी जाहीर करून जिल्हा प्रशासनाने १३९८ गावांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती असल्याचे शासनाला कळविले आहे. ३१ मार्च २०१६ पर्यंत खरीप पिकाची कर्ज वसुली बँका करीत असतात. अनेक बँकांकडून शेतकऱ्यांना व्याजावर सवलतही दिली जाते. यंदा मात्र दुष्काळी परिस्थिती त्यातच शासनाच्या एकाधिकार व हमीभाव खरेदी केंद्रांची कमतरता याचा थेट परिणाम बँकांच्या कर्ज वसुलीवर होत आहे. बरेच वेळा हमी भाव खरेदी केंद्रावर तसेच एकाधिकार धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा माल आल्यावर चुकारे देताना त्यातून बँकांच्या कर्जाची कपात सेवा सहकारी संस्थामार्फत करून घेण्यात येत होती. यंदा ज्या गावात गोदामाची व्यवस्था आहे, अशाच गावात शासनाने खरेदी केंद्र सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे अनेक मोठ्या गावांमध्ये खरेदी केंद्र सुरू झाले नाही. शेतकऱ्यांनी आपला माल व्यापाऱ्यांना विकला. त्यामुळे बँकांना शेतकऱ्यांकडून कर्ज वसुली करणे अडचणीचे ठरत आहे. गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने डिसेंबरपर्यंत केवळ ५० लाख रूपयांचीच चालू कर्जाची वसुली केलेली आहे. यापेक्षाही बिकट परिस्थिती इतर बँकांची आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने चालू व थकीत कर्जाची वसुली केली असून ५४ कोटी रूपयांचे कर्ज त्यांनी खरीप हंगामात वाटप केले होते. त्यापैकी केवळ ५० लाख रूपयांचीच वसुली होऊ शकली. बँकेशी २५९ सेवा सहकारी संस्था जुळलेल्या आहे. मात्र या सर्व सेवा सहकारी संस्थांकडे खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. केवळ २० ते २४ ठिकाणच्या केंद्रांवर धान खरेदी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे बँकांच्या वसुलीवरही याचा परिणाम होत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)राज्य शासनाने दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देण्याची गरज आहे. यंदा धान उत्पादक शेतकऱ्यांची प्रचंड दानादान उडाली असून ९० टक्के शेतकऱ्यांनी आपला माल व्यापाऱ्यांना विकला आहे. शासनाचे खरेदी केंद्र सुरू झाले नाही. मातीमोल भावात धान विकावा लागला. कर्ज फेडण्याची क्षमता यावर्षी शेतकऱ्यांमध्ये राहिलेली नाही. शासनाने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची गरज आहे. परंतु याबाबत लोकप्रतिनिधी उदासीन आहेत.- रामचंद्र सिडाम, शेतकरी, अहेरी