शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

दलित असल्यानेच नक्षलवाद्यांकडून आपण टार्गेट

By admin | Updated: June 30, 2016 01:33 IST

कोरची तालुक्याच्या अलोंडी येथील आपण रहिवासी आहोत. आपचे गाव ९० टक्के नक्षल समर्थक आहे. आम्ही सुशिक्षित दलित कुटुंबीय आहोत.

पत्रकार परिषद : वालदे व टेंभुर्णे कुटुंबीयांचा आरोपगडचिरोली : कोरची तालुक्याच्या अलोंडी येथील आपण रहिवासी आहोत. आपचे गाव ९० टक्के नक्षल समर्थक आहे. आम्ही सुशिक्षित दलित कुटुंबीय आहोत. वारंवार आम्ही नक्षलवाद्यांचा विरोध करीत असल्याने नक्षलवाद्यांनी आमच्या दलित कुटुंबांना टार्गेट करून आमच्या घरातील सामानांची नासधूस केली. कुटुंबीयांना ओलीस धरून ठेवले. रोखरक्कम, दागदागिने नक्षलवाद्यांनी पळवून नेलेत, असा आरोप अलोंडी येथील हरिराम वालदे व उत्तम टेंभुर्णे व त्यांच्या कुटुंबीयांनी बुधवारी गडचिरोली येथे पत्रकार परिषदेत केला. पत्रकार परिषदेला गौतम हरिराम वालदे, हरिराम वालदे, सोनू रवींद्र वालदे, बायजाबाई टेंभुर्णे आदी उपस्थित होते. २२ जून रोजी बुधवारला ललिता, सोनू वालदे या दोन बहिणी आपल्या आजीसोबत घरी होत्या. रात्री १२.३० वाजताच्या सुमारास बंदूकधारी नक्षलवादी व गावातील काही नक्षलसंघटनेचे काम करणाऱ्या युवकांनी घराच्या दाराला बळजबरीने ठोकून प्रवेश केला. यावेळी ३० ते ४० नक्षलवाद्यांनी आमच्या घराला पूर्णत: घेराव केला. ललिता, सोनू व त्यांच्या आजीला मारहाण करून घराबाहेर काढले. त्यानंतर गावाच्या बाहेर एका झाडाखाली थांबविले. तर याचदरम्यान दुसरीकडे आमचे नातेवाईक असलेल्या बायजाबाई टेंभुर्णे यांच्या घरीसुद्धा काही नक्षली गेले व त्यांनी तेथील सामानाची नासधूस केली. त्यानंतर ललिता व सोनू या दोन बहिणींला छत्तीसगड राज्याच्या सीमेवरील मिसपिरी गावाजवळ ओलीस ठेवले. येथून त्यांनी कशीबशी सुटका करून मोहला येथे पोहोचले. त्यानंतर ललिता व सोनू यांनी राजनांदगाव गाठले. तिथे त्यांचा भाऊ शालिक वालदे आल्यावर आम्ही कोटगुल पोलीस ठाण्यात २३ जून रोजी जाऊन या घटनेची तक्रार दाखल केली. या सर्व घटनाक्रमात अलोंडी येथील दुधराम सहारे, लखम कुंजाम, सुनील वालदे हे तिघेजण तोंडावर काळे दुपट्टे बांधून बंदूका घेऊन होते. हे तिघेजण घराशेजारीच राहत असल्याने आम्ही त्यांना आवाजावरून ओळखलो, असे ललिता व सोनू वालदे यांनी सांगितले. नक्षलवादी व गावातील त्यांच्या समर्थकांनी आमच्या दोन्ही कुटुंबाच्या घरून धान्य, तांदूळ, रोख रक्कम व सोन्याचे दागिने गावातीलच दोन ट्रॅक्टरद्वारे घेऊन गेले, असे त्यांनी सांगितले. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी कुटुंबीयांनी केली. (प्रतिनिधी)