शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

दलित असल्यानेच नक्षलवाद्यांकडून आपण टार्गेट

By admin | Updated: June 30, 2016 01:33 IST

कोरची तालुक्याच्या अलोंडी येथील आपण रहिवासी आहोत. आपचे गाव ९० टक्के नक्षल समर्थक आहे. आम्ही सुशिक्षित दलित कुटुंबीय आहोत.

पत्रकार परिषद : वालदे व टेंभुर्णे कुटुंबीयांचा आरोपगडचिरोली : कोरची तालुक्याच्या अलोंडी येथील आपण रहिवासी आहोत. आपचे गाव ९० टक्के नक्षल समर्थक आहे. आम्ही सुशिक्षित दलित कुटुंबीय आहोत. वारंवार आम्ही नक्षलवाद्यांचा विरोध करीत असल्याने नक्षलवाद्यांनी आमच्या दलित कुटुंबांना टार्गेट करून आमच्या घरातील सामानांची नासधूस केली. कुटुंबीयांना ओलीस धरून ठेवले. रोखरक्कम, दागदागिने नक्षलवाद्यांनी पळवून नेलेत, असा आरोप अलोंडी येथील हरिराम वालदे व उत्तम टेंभुर्णे व त्यांच्या कुटुंबीयांनी बुधवारी गडचिरोली येथे पत्रकार परिषदेत केला. पत्रकार परिषदेला गौतम हरिराम वालदे, हरिराम वालदे, सोनू रवींद्र वालदे, बायजाबाई टेंभुर्णे आदी उपस्थित होते. २२ जून रोजी बुधवारला ललिता, सोनू वालदे या दोन बहिणी आपल्या आजीसोबत घरी होत्या. रात्री १२.३० वाजताच्या सुमारास बंदूकधारी नक्षलवादी व गावातील काही नक्षलसंघटनेचे काम करणाऱ्या युवकांनी घराच्या दाराला बळजबरीने ठोकून प्रवेश केला. यावेळी ३० ते ४० नक्षलवाद्यांनी आमच्या घराला पूर्णत: घेराव केला. ललिता, सोनू व त्यांच्या आजीला मारहाण करून घराबाहेर काढले. त्यानंतर गावाच्या बाहेर एका झाडाखाली थांबविले. तर याचदरम्यान दुसरीकडे आमचे नातेवाईक असलेल्या बायजाबाई टेंभुर्णे यांच्या घरीसुद्धा काही नक्षली गेले व त्यांनी तेथील सामानाची नासधूस केली. त्यानंतर ललिता व सोनू या दोन बहिणींला छत्तीसगड राज्याच्या सीमेवरील मिसपिरी गावाजवळ ओलीस ठेवले. येथून त्यांनी कशीबशी सुटका करून मोहला येथे पोहोचले. त्यानंतर ललिता व सोनू यांनी राजनांदगाव गाठले. तिथे त्यांचा भाऊ शालिक वालदे आल्यावर आम्ही कोटगुल पोलीस ठाण्यात २३ जून रोजी जाऊन या घटनेची तक्रार दाखल केली. या सर्व घटनाक्रमात अलोंडी येथील दुधराम सहारे, लखम कुंजाम, सुनील वालदे हे तिघेजण तोंडावर काळे दुपट्टे बांधून बंदूका घेऊन होते. हे तिघेजण घराशेजारीच राहत असल्याने आम्ही त्यांना आवाजावरून ओळखलो, असे ललिता व सोनू वालदे यांनी सांगितले. नक्षलवादी व गावातील त्यांच्या समर्थकांनी आमच्या दोन्ही कुटुंबाच्या घरून धान्य, तांदूळ, रोख रक्कम व सोन्याचे दागिने गावातीलच दोन ट्रॅक्टरद्वारे घेऊन गेले, असे त्यांनी सांगितले. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी कुटुंबीयांनी केली. (प्रतिनिधी)